विधानसभा निवडणुकीसाठी 1हजार 188 मदत केंद्रे मुंबई दि. 28: राज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी 1 हजार 188 सहाय्यकारी मतदान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची एकूण संख्या 96 हजार 661 एवढी असणार आहे. पुण्यात 249 सहाय्यकारी मतदान केंद्रे विशेष म्हणजे पुण्यात 249 सहाय्यकारी मतदान केंद्रे असणार आहेत. तर त्यानंतर ठाणे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये 133 सहाय्यकारी मतदान केंद्रे असतील. मुंबई उपनगर मध्ये 100 तर पालघरमध्ये 73 सहाय्यकारी मतदान केंद्रे असणार आहेत.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना विधानसभा उमेदवारीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून AB form दिला. शर्मा हे नालासोपारा येथून शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहेत. विरार नालासोपारा चा कायापालट, गैरकारभारा चा अंत हा माझा शब्द शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाल्यावर प्रदीप शर्मा यांची भावना
एलआयसी भरती परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हिंदीची भाषा सक्तीच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कडाडून विरोध दर्शवला आहे. 'इतरांची भाषा, संस्कृती डावलण्याचा उत्तर भारतीयांचा डाव आहे. पण महाराष्ट्रात आम्ही हे खपवून घेणार नाही. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांची भरती झाल्यास गंभीर परिणाम होतील,' असा इशारा मनसेनं दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना सरचिटणीस # नितीन # नांदगावकर यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
गेल्या निवडणुकीतील जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता कशी झाली, याचा अहवाल जनतेला सादर करत वचनपूर्तीच्या राजकारणाची नवीन प्रथा भारतीय जनता पार्टीने शनिवारी सुरू केली. भाजपाच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यातील बहुतेक आश्वासने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने पूर्ण केली किंवा त्यासाठी महत्त्वाचे काम सुरू केले, असे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी मुंबईत सांगितले.
राज्यात विधानसभेच्या निवडणूका होत असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे, सत्ताधारी पक्ष निवडून येण्यासाठी सर्व पर्याय शोधत असून ईव्हीएम बरोबरच आता 43 लाख बोगस मतदार तयार केले असून या कामात सत्ताधारी पक्षाचा हात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी केला,
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी ९ प्रचार सभा घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
भारत निवडूनक आयोगाने जाहीर केलेल्या राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान इजा झाल्यास अथवा आजारी पडल्यास तातडीने निःशुल्क औषधोपचार मिळणार.
स्मार्ट एशिया 2019, हा स्मार्ट सिटी पर्याय, स्मार्ट टेक्नोलॉजी अॅप्लिकेशन्स आणि शहर विकास उत्पादने व सेवांसंबंधी लक्ष केंद्रित करणारा एक उपक्रम आहे. ज्याचे उद्घाटन आज बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे झाले.
राज्यात ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान तज्ञ किरणकुमार जोहरे यांनी दिला असून शेतकऱ्यांनी आपली पिके सांभाळावी.
विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला 99 तर शिवसेनेला 58 जागा मिळत असून सत्तेच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असल्याचे अिाण इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना दावेदार असल्याचे संकेतही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल अशी अपेक्षा होती, पण जनतेने दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारत आहोत. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱया इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्याचे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचना राज्यपालांना सादर केली.
लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव असणाऱ्या निवडणुकांत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी जाणीवजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने भारत निवडणूक आयोगातर्फे गौरविले जाणार आहे.
उपस्थित सर्व आमदाराचे सौ. रश्मी ठाकरे यांनी औक्षण केले याप्रसंगी
वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत चांगल्या पद्धतीने लढत दिली असून आगामी काळात वंचित बहुजन आघाडी राज्याच्या राजकारणात याच ताकदीने उभी राहील, असा विश्वास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या आमदारांची 'मातोश्री'वरील बैठक संपली असून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीय.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा येत्या दोन तीन दिवसांत होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. विधीमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी भाजपने आज विधीमंडळात सर्व नवनिर्वाचित आमदार (१०५) आणि भाजप नेत्यांची बैठक बोलावली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असे पक्षाचे नेते शरद पवार सांगत असतानाच विधिमंडळपक्षाचे नेते म्हणून निवड होत असताना अजित पवार यांनी ‘सध्या तरी आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत.
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याकरिता त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानभरपाईची मागणी करण्यासाठी घेणार भेट
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संकल्पनेतील भारत निर्माण करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या उच्चाटनाला प्राधान्य द्यावे लागेल,असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
राज्यातील मतदारांनी भाजपा शिवसेना महायुतीला स्पष्ट जनादेश दिला असून महायुतीचे सरकार लवकरच स्थापन करण्यात येईल आणि गेल्या पाच वर्षांत राज्याच्या विकासासाठी जे काम केले त्यापेक्षा अधिक काम आगामी पाच वर्षांत करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना धुळ चारणारे अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड निवड झाली आहे. दरम्यान याआधी आदित्य ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची येत्या बुधवारी पाहणी करणार आहेत.
जे ठरलंय तेवढंच द्या… सुईच्या टोकाएवढंही अधिक नको, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमच्या आघाडीची मागणी राहणार असून त्यासाठी एक - दोन दिवसात राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
ख्यातनाम मराठी साहित्यिक श्रीमती गिरिजा कीर यांचे आज दि.३१ रोजी सायंकाळी पाच च्या सुमारास कर्करोगाने वयाच्या ८६व्या वर्षी दु:खद निधन झाले.
मुंबईत आज सकाळी एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर परफार्मिंग आर्ट्स) येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौडचा आरंभ करण्यात आला.
वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस ठाणे कोठडीतील तरुणाच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराला भेट दिली
राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येणार असून पीक नुकसानीच्या भरपाईसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय
राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे
स्नुपिंग प्रकरणी सरकारने एसआयटी स्थापन करावी. आणि सर्व प्रकरणाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा उप सल्लागारपदी राज्याचे उपलोकायुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांची नियुक्ती झाली असल्याने त्यांना आज लोक आयुक्त आणि उप लोकायुक्त कार्यालय, मुंबई यांच्या वतीने निरोप देण्यात आला.
अरबी समुद्रात 'महा'नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्यामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.
अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामांना गती देऊन 6 नोव्हेंबरपर्यंत मिशन मोडमध्ये ते पूर्ण करण्याचे निर्देश,
राज्यात रब्बीच्या क्षेत्रामध्ये 22 टक्के वाढ अपेक्षित असून सुमारे 69.72 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यात अवकाळी व परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान केले असून सरकारने हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तात्काळ द्यावी अशी मागणी संयुक्त पुरोगामी आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज राज्यपालांकडे केल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन येथे‘स्वयंचिकित्सेतून विकारांचे व्यवस्थापन’ या विषयावरील प्रशिक्षण व आरोग्य शिबिर संपन्न झाले.
इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात आजपासून सुरु झालेल्या ‘वर्ल्ड ट्रेड मार्ट’ प्रदर्शनामध्ये सहभागी होत महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने राज्यातील विविध पर्यटन संधींची माहिती जगभरातील पर्यटन व्यावसायिकांना उपलब्ध करुन दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईतील यशवंराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत देश व राज्य पातळीवरील विविध प्रश्नांचा परामर्श घेतला.
पाच वर्षे होऊन गेली तरी देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यास केंद्रातील भाजपचे सरकार पुर्णत: अपयशी ठरले आहे. सरकारचे हे अपयश नागरिकांपुढे मांडण्यासाठी देशभर 5 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत कॉंग्रेस कार्यकर्ते निदर्शने करणार आहेत. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुरुवारी (दि. 7 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात केंद्र सरकार विरोधात निदर्शने करणार आहेत.
हॉटेल कोहिनूर कॉंटिनेंटलमधील ६ नोव्हेंबरपासून अवतरणार सुंदर समुद्रकिनाऱ्यांचं कारवार –'कारवारी फूड फेस्टिव्हल' मध्ये.
राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उभे करणं आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीत ज्या सवलती दिल्या जातात त्या ओल्या दुष्काळातही द्याव्यात, रोजगार हमी योजनेद्वारे नुकसानग्रस्त शेताच्या सफाई कामाचा समावेश करून शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केल्या.
कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नामोल्लेख केल्याच्या निषेधार्थ मोर्चा...
निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि शांतता व सलोखा राखण्यास मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे रुग्णालयात दाखल.
हॅटल ट्राईडेंट मध्ये झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून सर्वांनी सहमती दिली आहे.
महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे श्री. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या श्री. ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे, आई स्व. मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे.
मुंबई, दि. 29 : राज्य शासनाचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही. मात्र, वैभव गमावून विकास कामे होणार नाहीत. त्यामुळे आरेमधील मेट्रोच्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असून या कामाचा पूर्णपणे आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.
मुंबई दि. ३० : विधानसभेत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने १६९ विरूध्द शून्य मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. चार सदस्य त टस्थ राहिले तर मतमोजणीची घोषणा होताच भाजप आणि त्यांच्या सहयोगी सदस्यानी सभात्याग केला.
इतरमागास प्रवर्गासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत बदल करण्याची छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे मागणी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात इतर मागासवर्गीय प्रवर्गास डावलण्यात आल्यामुळे योजनेत बदल करा- मंत्री छगन भुजबळ
दुधाला दर द्या... शेतकऱ्यांना न्याय द्या... अन्यथा पुन्हा उग्र आंदोलन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ठाकरे-पवार सरकारला इशारा
अण्णाभाऊ साठे यांची जयंतीे आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी प्रदेश कार्यालयात साजरी... राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले अभिवादन...
वीज मंडळाला 6 हजार कोटींचे अनुदान देऊन भरमसाठ वीज बिल प्रश्न सोडवा भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांची मागणी
पलूस शहराच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई, दि. ४ अॉगस्ट - पलूस शहरासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानामधून प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता द्यावी, त्याआधारे नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता द्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
प्रभू श्री रामाच्या मंदिराचा शुभारंभ तमाम भारतीयांसाठी आनंदाचा क्षण - जयंत पाटील
गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केले.
दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील 6 लाख 51 हजार मुलांना आणि 1 लाख 21 हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला
दैनिक 'पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांचे आज सहा ऑगस्ट २०२० रोजी दुपारी एक वाजता त्यांच्या गायमुख वाडी, तालुका जुन्नर येथील राहत्या घरी निधन झाले.
सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असताना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली.
शांततेत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर महाविकास आघाडी सरकारने कारवाई करून मोगलाईचे दर्शन घडविले
राज्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात करण्यात आल्या आहे.
राज्यात आज देखील १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे आहे.
अनुसूचित जातीतील परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत होता आता हा अडसर दूर केला आहे.
राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत.
महावितरणने राज्य सरकारच्या मान्यतेने भरमसाठ रकमेची बिले पाठवून सामान्य माणसाच्या पैशावर डल्ला मारला आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या चौकशी प्रकरणात मुंबई पोलिस विरूद्ध बिहार पोलिस आमनेसामने आले होते
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता तंत्रशिक्षण ( पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया दिनांक १० ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.39 % महाराष्ट्र शासन रोखे, 2020 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत.
आघाडी सरकारने जाणीवपूर्वक बंद ठेवलेल्या राज्यातील सार्वजनिक परिवहन सेवेच्या एसटी कर्मचा-यांना जून पर्यंतचे वेतन अदा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सन २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी कोरोनामुळे परदेशातून किंवा भारतातून ऑनलाईन शिक्षण घेत असतील तर त्यांनाही फेब्रुवारी २०२० ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत शैक्षणिक फी व निर्वाह भत्ता मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. समाज कल्याण आयुक्त पुणे यांना याबाबत राज्य शासन स्तरावरून आदेश पारित करण्यात आला असून, शैक्षणिक फी व निर्वाह भत्ता देण्याच्या या निर्णयास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील निर्णायक लढाईची सुरुवात 9 ऑगस्ट 1942 या क्रांतिदिनी झाली. म
जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या शौर्याचे, कार्याचे, त्यागाचे स्मरण करुन राज्यातील जनतेला आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात काही वृत्तवाहिन्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टार्गेट करायला सुरूवात केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी गोगलगायीसंदर्भात पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला पाठवलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला.
सप्ताहात सहभागी स्टार्टअप्सपैकी उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली असून त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा ही संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामाचे कार्यादेश देण्यात येतील
स्वातंत्र्य चळवळीला निर्णायक दिशा देणारा आजचा दिवस असून या दिवसाचे स्मरण म्हणून अॉगस्ट क्रांती मैदान येथे महात्मा गांधीच्या स्मृती स्तंभास व लढयातील क्रांतीवीरांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जावून अभिवादन केले.
केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
राज्यातील वनविभागाचा मंत्री या नात्याने आदिवासी समाजाला वन तसेच वनक्षेत्र याबाबत दिलेले संविधानिक हक्क व अधिकार यांचे संरक्षण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
भाजपमध्ये निवडणुकीआधी गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन जाहीर केला जाईल.
सुशांत सिंग प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी शिवसैनिक आंदोलन करत आहे लोकांचे लक्ष मुख्य विषयाकडून वळवायचं त्यासाठी हा वाद पेटवला जात आहे.
भाजपमध्ये गेलेले अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येण्यास उत्सुक असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेटाळला आहे.
राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.
राज्यात लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या जिम सुरू व्हाव्यात यासाठी बॉडी बिल्डर आणि जिम मालक संघटना पदाधिकारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, उद्योग व्यवसाय, बेरोजगार तरुण तसेच समाजातील विविध घटकासाठी चांगले निर्णय घेतले असून राज्यावरील कोरोनाच्या संकट काळात मोठ्या हिमतीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले आहे.
MLA Atul Bhatkhalkar criticizes the mva government
उत्कृष्ट सेवेची महाराष्ट्र पोलिसांची गौरवशाली परंपरा कायम असून यापुढेही ती सुरु राहील असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
१२,६०८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३६४ मृत्यू
शेतकऱ्यांना या समस्येतून कायमस्वरूपी कसे मुक्त करता येईल याकडे लक्ष देण्यात येईल.
‘उमेद’ अभियानातील स्वयंसहायता गटांनी कोरोना संकटकाळात जागतिक बाजारपेठेत तग धरण्याच्या दृष्टीने स्वतःच्या व्यवसायामध्ये आमूलाग्र बदल करावा.
विरोधी विचारसरणीच्या पक्षांमध्येही त्यांच्याबद्दल श्रद्धा, आदर होता. ते महान लेखक होते. पत्रकार होते. संवेदनशील कवी होते.
महाराष्ट्रातील मंदिरं हे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून बंद आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात देखील बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था आजही कृषी क्षेत्रावरच अवलंबुन आहे. या कृषी संस्कृतीत शेतकऱ्याच्या बरोबरीने बैल राबत असतात.
लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मुंबई महापालिकेने दोघांनाही होम क्वारंटाईन राहण्यास सांगतिले आहे.
शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशा नंतर आता येत आहेत शिव दवाखाने. इथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाऊंडर असतील.
न्यायालयानं अथवा केंद्र सरकारनं माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९अ प्रमाणे आदेश दिले, तर फेसबुक त्या व्यक्तीला ब्लॉक करू शकते.
शासनाने कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले आहे.
राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या एसटीच्या मोकळ्या जागेवर इंडियन ऑईलच्या सहकार्याने सर्वसामांन्यांसाठी पेट्रोल-डिझेल/एल.एन.जी. पंप उभारले जाणार आहेत.
पॅरिस करारानुसार औद्योगिक कारणांमुळे होणारे पर्यावरणातील बदल टाळण्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राद्वारे होणारे प्रदूषण टाळणे आवश्यक आहे
न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा निर्णय, या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
राज्यातील सरकार हे जनतेसाठी नाही. हे सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचं न्यायालयानं दिलेल्या निकालातून सिद्ध झालं आहे
नागरिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्प कोणताही विकास करतांना स्थानिकांशी संवाद साधने आणि प्रकल्पाच्या बाबतीत पारदर्शीपणा आवश्यक असतो
कॅप्टन अमोल यादव यांनी मोठ्या कष्टाने भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांचे प्रात्यक्षिक देखील यशस्वी झाले आहे.
२३ मार्चपासून कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती.
राष्ट्रवादीचे नेते आ. रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेवर थेट बोलणं टाळलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते आ. रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेवर थेट बोलणं टाळलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते आ. रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेवर थेट बोलणं टाळलं आहे.
शासनावर आर्थिक भार न लादता १०० युनिटपर्यंत वीज घरगुती ग्राहकांना मोफत देण्याबाबत, वीज वहन व निर्मिती याचा खर्च कमी करणे यावर सविस्तर चर्चा झाली.
देशाची सेवा विचारात घेता सर्व आजी, माजी सैनिकांना भावनिक दिलासा देणे व त्यांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतला
बाळासाहेब ठाकरे स्मार्ट ग्राम प्रकल्पाचीदेखील या प्रकल्पास जोडणी करावी जेणेकरून शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करता येईल.
बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पद्धतीने वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत.
डॉ. दाभोलकर वैद्यकीय तज्ञ होते. आंतरराष्ट्रीय किर्तीचे कबड्डीपट्टू, शिवछत्रपती पुरस्कारविजेते खेळाडू होते.
सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे.
महाराष्ट्र पोलीस दल भरती प्रक्रियेच्या २०१४ व १६ या वर्षातील पात्र पण निवड न झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने भरती केली आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने लाभ आणि एकूणच शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडू शकतील का ते पाहण्याची गरज आहे.
पश्चिम घाट जैवविविधतेच्या संरक्षणाबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पश्चिम घाटातील 62 गावांचा ड्रोन सर्व्हे करणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट व घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मर्यादित असावी.
कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडू नये याची काळजी राज्य शासन आणि पणन महासंघाने घेतली आहे.
कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाकडून गेली अनेक महिने कॉलर ट्यूनच्या माध्यमातून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे.
काही सार्वजनिक गणेश मंडळांनी सामजिक प्रबोधन व आरोग्य शिबिरे घेण्याचे नियोजन केले आहे.
आज फक्त भारतापुढे नाही, तर जगासमोर कोविड-१९ चे संकट उभे राहिले आहे.
राज्य शासनाने महसूल कर्मचारी संघटनेची ही मागणी मान्य केली आहे.
राष्ट्रीय अकादमीच्या धर्तीवर अकादमीचा विकास करण्यासाठी त्या – त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमून त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे
जालना येथे कौशल्य विकास अभियानातंर्गत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक आहे.
मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना 35 किलो धान्य प्रतिशिधापत्रिका 2 रुपये प्रति किलो दराने गहू व 3 रुपये प्रति किलो दराने तांदूळ वितरित करण्यात येत आहे.
अनुकंपा नोकरीसाठी पात्र असलेल्या या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाअभावी नोकरी गमवावी लागू नये यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.
शहरातील कोविड रूग्णांकरीता त्वरित निदान आणि रिकवरी वाढविण्यासाठी मदत होणार आहे, असे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली.
यावर्षी जवळपास ८० उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परिक्षेत सुयश प्राप्त करुन महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल.
विद्यार्थ्यांची परीक्षा कोविड-19 परिस्थितीला अनुसरून सुरक्षित वातावरणात घेण्यात आली.
पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधानपरिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठका आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.
राज्यात पंचवीस हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांची संख्या साधारपणे तीनशेच्या आसपास आहे.
प्रत्येक तालुक्यात वन विभाग आणि महसूल विभागाच्या जागेवर वनराई उभारण्यात येणार आहे.
प्रत्येक तालुक्यात वन विभाग आणि महसूल विभागाच्या जागेवर वनराई उभारण्यात येणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील 79 उमेदवारांचा गौरव समारंभ पार पडला.
विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
कोरोनामुळे महावितरणच्या महसुलात मोठया प्रमाणात घट झाली आहे.
इतर मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाची टक्केवारी व संख्या याची सविस्तर आकडेवारी सादर करावी.
संपूर्ण देशात कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
करमाफी ही मालवाहतूक करणारी वाहने, पर्यटक वाहने, खोदकाम करणारी वाहने, खाजगी सेवा वाहने, व्यावसायिक कॅम्पर्स वाहने, स्कूल बसेस या वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना लागू राहणार आहे.
सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
देशातील सर्वात प्रगत आणि आघाडीचे राज्य असलेल्या महाराष्ट्रासमोर, कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट अभूतपूर्व आहे.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता असल्याचे म्हटलं आहे.
एका ग्रामपंचायतमध्ये एका वेळी ५ सिंचन विहीरी मंजूर करता येतील अशी मर्यादा यापूर्वी घालून देण्यात आलेली होती.
सभागृह तसेच विधानभवन इमारत येथे सर्व खबरदारीच्या उपाययोजना कार्यान्वित करण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कर्णबधिर दिव्यांगांना अत्याधुनिक श्रवणयंत्र, दिव्यांगांना कृत्रिम अवयव, ज्येष्ठ नागरिकांना विविध आवश्यक साहित्य आदी उपलब्ध करून देण्याचे निश्चित झालेले आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.
ट्विटच्या माध्यमातून जे टीकाटिप्पणी करत आहेत, त्यांनी भान ठेवावं. 30 सप्टेंबरच्या डेडलाईनबाबत बंधन नाही.
शहरी भागासाठी संचालक, आरोग्य सेवा (शहरी), उप संचालक-२ पदे, सहायक संचालक-४ पदे अशी ही नवी यंत्रणा असणार आहे.
सफाई कामगारांच्याबाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल व सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल.
उच्च न्यायालयाने आदेशित केल्याप्रमाणे सीजीपीए ( CGPA) पद्धतीने निकाल जाहीर करून पदवी देण्यासंदर्भात निर्णय घेतला होता.
कोरोना काळात मंदिरे बंद असल्याने भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येत नव्हते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक योजनांना निर्बंध लागलेले असून राज्याची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे.
सर्व जिमचालकांनी एकत्र येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे ठरविणे आवश्यक आहेत.
15 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतचे लघुउद्योग सुरू करण्यासाठी 15 टक्के मार्जिन मनी वितरीत करण्यात येईल.
कोरोनाचे आणि आर्थिक संकट दूर करण्याचे श्रीगणरायाला निरोप देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं साकडं... नियम पाळून, संसर्ग टाळून, शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी मानले सर्व गणेशभक्तांचे, गणेशमंडळांचे जाहीर आभार मुंबई, दि. १ सप्टेंबर - अनंत चतुर्दशीनिमित्त श्रीगणरायांना निरोप देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “विघ्नहर्ता श्रीगणराया जगावरचं कोरोना संकट दूर कर...सर्वांना सुखी ठेव... सर्वांना उत्तम आरोग्य दे...शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घरात सुबत्ता येऊ दे...महाराष्ट्राला आर्थिक संकटातून बाहेर काढून पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर नेण्याचं बळ आम्हा सर्वांना दे...” असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातले आहे.
मिशन बिगीन अगेन : खालील बाबींना असेल आता मुभा मुंबई, दि. ३१:- खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक, हॉटेल, लॉजचे कार्यान्वयन याबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) मुंबई, दि. ३१ : ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अनेक बाबींमध्ये सूट देत व अर्थचक्रास गती देण्यासाठी २ सप्टेंबर २०२० पासून खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय यापुढे आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक, हॉटेल, लॉजचे कार्यान्वयन याबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जारी करण्यात येणार आहे.
पुण्यात दरवर्षी तीस तास चालणारी मिरवणूक यंदा टाळण्यात आली. मानाच्या गणेशमंडळांनी यंदा तीन तासात गणेशमूर्तींचं भक्तीभावाने विसर्जन केले.
परीक्षा सहज, सोप्या पद्धतीने कशा घेता येतील यावर विचार करावा. कुलगुरू यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्यावे
कोरोनामुळे सध्या सर्वच जण अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आदीजण वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन पुन्हा आपले आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी आतातरी घराबाहेर बाहेर पडावं, असं म्हणत भाजप नेते अतुल भातळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
प्रस्तुत सामंजस्य करारावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाच्या वतीने उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळेव सीडबीच्या वतीने उपव्यवस्थापकीय संचालक व्ही.एस.व्ही राव यांनी स्वाक्षरी केली.
नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात आतापर्यंत घनकचरा आणि स्वच्छतेसंदर्भात झालेल्या कामाची माहिती दिली.
नोव्हेंबर, 2020 पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांच्या हस्ते आयुष इम्युनिटी क्लिनिक होमिओपॅथी आयुर्वेद युनानी ऑनलाईन उद्घाटन सोहळा आज पार पडला.
या बैठकीत विद्यापीठांनी परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्या संदर्भातील तयारी पूर्ण करावी. या बरोबरच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया वेळेत पूर्ण करुन अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर अशा विद्यार्थांच्या परीक्षेचेसुद्धा नियोजन करण्यात यावे. या संदर्भात चर्चा करण्यात आली.
राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत महाराष्ट्रातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पद्धतीत बदल करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारांच्या नाव नोंदणीसाठी शासन निर्णय जारी केला होता.
राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणार आहे. अधिवेशनाला अवघे तीन दिवस उरलेले असतानाच नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.
वनविभागाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार रस्त्यांच्या बांधकामासंदर्भात प्रत्येक प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविणे बंधनकारक झाले आहे.
सहकार व पणन या खात्यांचा अतिरिक्त कार्यभार दिनांक 3 सप्टेंबर,2020 संपुष्टात आला आहे. सहकार व पणन विभागाचा कार्यभार आता पूर्ववत बाळासाहेब पाटील यांच्याकडे आहे.
एमटीडीसीने सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे पर्यटकांना आपल्या आरोग्याची काळजी घेत अतुलनीय महाराष्ट्रातील सौंदर्य पाहता येणार आहे.
मुंबईत राहणाऱ्या स्मिता झगडे गेली ७ वर्ष ड्रायव्हिंग स्कूलमधे चारचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देत होत्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोठी चळवळ उभारली. त्यामुळे स्वच्छतेविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली.
केंद्र शासनाच्या निर्भया निधी योजनेअंतर्गत राज्यातील न्याय सहाय्यक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आठ विभागीय व पाच लघु प्रयोगशाळा कार्यरत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे संकट लवकर जाणार नाही, अशा इशारा दिला आहे. त्यामुळे यापुढेही आपल्याला अधिक दक्षता घ्यावी लागेल.
संबंधित जिल्ह्यांमध्ये होणारी धान खरेदी केंद्र शासनाच्या विहित निकषांनुसार होत आहे. याबाबतची खात्री जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी करावी. तसेच धान खरेदीनंतर प्राप्त होणारा तांदूळ साठविण्यासाठी गोदामांची उपलब्धता सुनिश्चित करावी.
महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगीन अगेनच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर शासन अनेक निर्णय घेत असताना, पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी हा कार्यक्रम उपयोगी ठरेल. या कार्यक्रमात ईंटर्नना एमटीडीसीच्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभव मिळणार आहे.
राज्यात १ लाख ९ हजार ५१३ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी ग्रामीण क्षेत्रात ७६ हजार २१, आदिवासी क्षेत्रात १८ हजार १ आणि नागरी क्षेत्रात १५ हजार ४९१ अंगणवाडी केंद्रे आहेत.
पुढील आठवड्यात राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत वेबिनारद्वारे बैठक घेऊन एमआरईजीएस व नरेगा योजनांमधील रोजगाराच्या संधी बाबत चर्चा करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे.
मोझरी हे ठिकाण आदिवासीबहुल क्षेत्राच्या समीप असल्याने आदिवासी क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींसाठी प्रशिक्षण देण्यास आदर्श ठिकाण राहील.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० ही सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आलेली आहे. सदर परीक्षेचा निकाल दिनांक २३ मे, २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंत्रालयीन प्रशासकीय गतिमानतेबरोबरच नागरिकांना सुविधा देण्यासाठी तक्रार निवारण आणि स्थानिक समस्यांबाबत सोशल मीडिया टिकेटींग सारखी प्रणाली, चॅट-बॉट सारख्या गोष्टी वापरण्याबाबत सूचना केल्या.
राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा, सचिव राजेंद्र भागवत यांनी सर्वोच्च्य न्यायालयाच्या आदेशाबाबत माहिती दिली.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, समाजाची बाजू मांडणारे वकील,अभ्यासक यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीसी) संवाद साधला व त्यांच्या या न्यायालयीन लढाईच्या अनुषंगाने सूचना ऐकून घेतल्या.
ऑक्सिजन टँकर्सना प्रतिबंध नाही सध्या राज्यात 1000 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होते मात्र गरज 500 मेट्रिक टन इतकी आहे. सध्या उत्पादन पुरेसे असले तरी पुढिल काळात गरज पडू शकते
आजच्या राष्ट्रीय अभियंता दिनी मंत्री जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतींना वंदन करत रायगडाच्या बांधकामाची स्तुती केली आहे.
बाजारात मागील काही दिवसांत कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले असताना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने अचानक निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी व निर्यातदारांनाही मोठा फटका बसला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात राज्यातील १८४ पोलीस व २० अधिकारी अशा एकूण २०४ पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.
खासदार शरद पवार यांनीसुद्धा काल केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदीसंदर्भात चर्चा केली. तसेच राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे.
भारतीय घटनेतील 73 व्या घटना दुरुस्तीनंतर भारतीय घटनेच्या कलम 243 नुसार पंचायत राज संस्थांना महत्त्वपूर्ण अधिकार देण्यात आले असून केंद्र व राज्य सरकारच्या बहुतांशी विकास योजना या पंचायत राज संस्थामार्फत राबविण्यात येतात.
पोलीस शिपाई संवर्गातील 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येत आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या 4 मे 2020 च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
पुण्यासह नाशिक आणि मराठवाड्यातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून आवाज दाबण्याचे प्रयत्न सुरु आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’ योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यक्षेत्रात जाऊन सेवा देतात, तसेच आश्रमशाळेत तपासणीचे काम करतात.
देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी मराठवाडा मुक्ती संग्रामात लढलेल्या वीरांचा देश नेहमीच ऋणी राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीरांचा गौरव केला.
“मराठवाडा मुक्तीच्या प्रदीर्घ लढ्यात अनेक ज्ञात – अज्ञात देशभक्त व्यक्तींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
मराठा समाजाचे आरक्षण टिकावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. परंतू पोलीस भरतीत १३ टक्के जागा ठेवण्याबाबत कायदेशीर बाब तपासून पाहणार, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे.
इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष-संघटना असा भेदभाव असूच शकत नाही.
महाराष्ट्रचे दिग्गज नेते आणि भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंह यांचं निधन झालं आहे. आज सकाळी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्यावतीने पर्यावरणपूरक हातकागदाची निर्मिती केली जाते. १९४० पासून ही संस्था हातकागद उत्पादनात अग्रेसर आहे.
1984 साली ह्या इमारतीचे बाधंकाम झाले असून रात्री अचानक ह्या इमारतीचा एक भाग कोसळला. रात्री साडेतीनच्या दरम्यान सगळे लोकं झोपेत होते आणि त्याचदरम्यान ही घटना घडली आहे.
जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून श्री. शिंदे यांनी तिथेही भेट देऊन जखमींची विचारपूस केली, तसेच उपचारांबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली.
मुंबई- नाशिक महामार्गावर माणकोली येथील उड्डाणपुलाच्या ठाणे दिशेने डाव्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार होते.
आशालता वाबगावकर यांनी आपल्या सोज्वळ आणि सहज अभिनयामुळे चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटविला होता. विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी समर्थपणे साकारल्या. त्यांच्या निधनाने एक अष्टपैलू कलावंत हरपला आहे.
आशालताताई या शास्त्रीय संगीताचं ज्ञान, जाण असलेल्या चतुरस्त्र अभिनेत्री होत्या. कोकणी, मराठी, हिन्दीसह त्यांनी शंभरहून अधिक नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय केला.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे हे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे अभ्यासक, अनुयायी होते.
कोरोनोत्तर काळात पर्यटन क्षेत्राला निश्चितच चांगले दिवस येतील. याअनुषंगाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग विविध निर्णय घेत आहे.
सुप्रीम कोर्टाने स्थगिती मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच मराठा नेत्यांनी १० ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
महिला व बालविकास विभागाच्या सर्व जिल्हा कार्यालयांना स्वतंत्र इमारत उपलब्ध करुन देण्याचा विषय मंत्री ॲड. ठाकूर यांनी सर्वोच्च प्राधान्यक्रमावर घेतला आहे.
केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष सुशीबेन शहा यांच्यासह घरेलू कामगार महिलांच्या शिष्टमंडळाने मंत्री ॲड. ठाकूर यांची भेट घेतली.
आरोग्यसेवेत ‘फार्मासिस्ट’चे स्थान अढळ आहे. ‘फार्मासिस्ट’च्या सहभागाशिवाय रुग्ण रोगमुक्त होणं शक्य नाही. प्रत्येक आजारांचे कारण शोधून त्यावर प्रभावी औषध तयार करणे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय सेवाव्रती आणि कुशल संघटक होते. त्यांनी मानव आणि राष्ट्र कल्याण यांना सर्वोच्च मानले. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना ट्रीटमेंट करताना काही अडचण असल्यास टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी.ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील याकडे लक्ष द्यावे.
भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेले संगीताचे वरदान ‘एसपीं’नी आपल्या सुरांनी आणखी झळाळून टाकले. त्यांनी सोळा भाषांतून हजारो गाणी गायली.
कोल्हापूर जिल्ह्याने नो मास्क, नो एन्ट्री असा उपक्रम राबायला सुरुवात केली असून दुकानदार, व्यावसायिक, व्यापारी यात सहभागी केले आहेत
राज्यातील 16 जिल्ह्यातील आदिवासी भागातील 1 लाख 21 हजार स्तनदा माता व गरोदर महिलांना प्रति दिन 25 ग्रॅम आणि 6 लाख 51 हजार बालकांना प्रति दिन 18 ग्रॅम दूध भुकटीचे वितरण अमृत आहार योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे.
आवश्यकता वाटल्यास आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात योजनेच्या आणखी प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी शासनास निदेश दिले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.
अधिसूचना राज्यपालांनी संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील परिच्छेद ५, उपपरिच्छेद १ अंतर्गत असलेल्या प्राप्त अधिकारांचा वापर करून काढली आहे.
महिला सक्षमीकरणासाठी विचारांचे आदान प्रदान आवश्यक असून त्यासाठी लवकरच ऑनलाईन बैठक करण्यात यावी, असे मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.
सारी व आयएलआय रुग्ण अधिक काटेकोरपणे शोधा असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले तसेच सर्व्हेक्षण पथकांचे अहवाल दररोज विस्तार अधिकारी व इतर वरिष्ठ यंत्रणांनी तपासावे अशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे.
१०% अनुकंपा धारकांची सन २०१९ मधील भरती यापूर्वीच मंजूर झालेली असल्याने १५ पदे वगळून आता १२४ अनुकंपा धारकांची संवर्गनिहाय पदभरती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे
पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर तसेच राहुल गांधी यांची कॉलर पकडून त्यांना अटक केल्यानंतर देशासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
खासदार संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन युवकांनी आत्महत्येचा निर्णय घेऊ नये असं आवाहन केलंय.
महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व स्वावलंबन या त्रिसूत्रीचे स्मरण होते. महात्मा गांधींनी जीवनात स्वच्छता, गोरगरिबांची तसेच रुग्णांची सेवा व ग्रामविकासाला विशेष महत्व दिले होते.
अनेक दिवसांपासुन आयुक्तालयाची मागणी होती. शहरांच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही अत्यावश्यक बाब होती. या शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
कोव्हिड-१९ च्या परिस्थितीमुळे महसूल विभागाची यंत्रणा व्यग्र असल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी महसूलच्या मूळ कामाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी.
राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील १२ शहरांमध्ये मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी सध्या बचतगट योजना राबविली जाते.
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर तसेच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी उत्तर प्रदेशमध्ये पाठवावे, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ट्विट करुन केली आहे.
मराठा आरक्षणासाठी कपिल सिब्बल यांच्या सारख्या निष्णात वकिलांशी चर्चा करत आहे. आत्महत्या करणे हा मार्ग नाही, असे आवाहन पवारांनी मराठा तरुणांना केले आहे.
अभियानात राज्यात उत्कृष्ट काम करणारे विभागीय आयुक्त, ३ जिल्हाधिकारी आणि ३ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. तसेच योग्य नियोजन करून ग्रामीण आणि शहरांमधील अपघातप्रवण क्षेत्रे निवडावेत. व त्यावर दीर्घकाळ व तात्पुरत्या उपाय योजना केल्या जाव्यात.
वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिन्दी विद्यापीठाने गांधीजींच्या १५१ व्या जयंती वर्ष समारोपानिमित्त ‘दीपोत्सव’ तसेच ई- पुस्तकाचे प्रकाशन आयोजित केले होते.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत स्वामीजींचं मोठं योगदान आहे.
महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेन्द्र भागवत यांनी विधानभवन परिसरातील असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
एकनाथ शिंदे यांची दुसरी कोविड १९ चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर डॉक्टररांनी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे.
सध्याची राज्यातील कोविड-19 परिस्थिती पाहता आपल्या प्रत्येकासाठी मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक झाले आहे. अद्ययावत मानसिक आरोग्य संकुल उभारणे ही काळाची गरज आहे.
भारतासोबत व्यापार-वाणिज्य वाढविण्यात येणाऱ्या अडचणी तसेच त्यावरील संभाव्य उपाय नमूद करून आपणास टिप्पणी दिल्यास आपण समस्यांचा परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा करू.
केंद्र सरकारने जीएसटी भरपाईसाठी राज्यांना दिलेले दोन्ही पर्याय हे राज्यांना आर्थिकदृष्ट्या डबघाईत टाकणारे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या विविध सेलमध्ये एलजीबीटी हा नवीन सेल सुरू करण्यात आलाय.
अफगाणिस्तानची मुंबईतील पहिली महिला वाणिज्यदूत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून झाकिया वर्दक यांनी आपल्या कार्यकाळात भारत आणि अफगाणिस्तानमधील उद्योग-व्यापार वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे संगितले.
सांगली आणि सोलापूर येथे झालेल्या महिला अत्याचार प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी वेबिनार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, सांगलीचे पोलीस अधिकारी दीक्षित गेडाम उपस्थित होते.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित ‘दिशा’ कायदा अंमलबजावणी तसेच महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
महाराष्ट्र आणि अफगाणिस्तान यांच्यात कृषी क्षेत्रातील विविध बाबींवर चर्चा झाली. या क्षेत्रातील माहिती आणि प्रशिक्षित विद्यार्थी आदान प्रदान कार्यक्रम आदी मुद्दे चर्चिले गेले.
६ डिसेंबरला शासनातर्फे मार्गदर्शक सूचना देण्यात येतील त्यानुसार यावर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर न जाता घरातूनच अभिवादन करावे.
विधानभवनात आयोजित आढावा बैठकीत आदिवासी विकास विभागातील महामंडळाच्या खरेदी प्रक्रिया, कौशल्य विकास योजना, प्रकल्प कार्यालयामार्फत न्युक्लिअस बजेट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि आस्थापना यांचा सविस्तर आढावा घेतला.
राज्यात 26 जानेवारी, 2020 रोजी शिवभोजन या महत्त्वाकांक्षी योजनेचा आरंभ करण्यात आला. त्यानुसार केवळ 10 रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली.
राज्यात मुंबई, नागपूर, नांदेड आणि उस्मानाबाद अशी चार शासकीय आयुर्वेद महाविद्यालये असून यातील पदव्युत्तर विद्यार्थी निवासी योजनेंतर्गत सेवा बजावत आहेत.
बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होते. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली.
२०११ ला रिझर्व्ह बॅंकेने हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं होतं.
मंत्रालयात सन 2020-21 खरीप हंगामातील धान खरेदी बाबतीत आढावा बैठक घेण्यात आली.त्यावेळी मंत्री श्री भुजबळ बोलत होते.
सन 2019 मध्ये देशात हिंसाचाराच्या एकूण 4.17 लाख गुन्ह्यांची नोंद झाली. तर राज्यात 2019 मध्ये हिंसाचाराचा गुन्हे दर केवळ 36 होता आणि राज्य 11 व्या क्रमांकावर होते.
कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि विविध घटकांशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मराठा समाजाच्या भावना समजून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला याबद्दल मराठा समाजाच्या वतीने सरकारचे सर्वप्रथम आभार, असं संभाजीरांजेंनी म्हटलं आहे.
ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तात्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करावी. याच पद्धतीने निधीसाठीही मागणी करताना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चित करावीत.
लेण्याद्री परिसरात भाविकांना मुख्यत्वे पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह वापरासाठी उपलब्ध होतील यासाठी तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. तसेच, रोप-वे साठी हेलिपॅड जिथे आहे त्या परिसरात जागेसाठीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा.
धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी खूप जुनी आहे. त्यामुळे या विषयाची कोंडी फोडण्यासाठी करता येतील, ते सर्व प्रयत्न केले जातील.
राज्यातील मंदिर सुरु करण्याबाबत सध्या आम्ही हळूवारपणे पावले उचलत आहोत. अनेकजण हे सुरु झालं, मग ते का नाही, असे प्रश्न विचारत आहेत
कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर हा प्रकाशनसोहळा ऑनलाईन माध्यमातून पार पडला. अस्मिता चांदणे आणि दीपक चांदणे यांच्या प्रतिमा प्रकाशनाने हा हायकूसंग्रह प्रकाशित केला आहे. सरदार जाधव यांचे मुखपृष्ठ आहे.
प्रेसवर नियंत्रण आणायचं आहे असं माझं अजिबात मत नाही. एकमेकांवर टीका करा ती केली पाहिजे. आम्ही सत्तेत आहोत म्हणून जरुर करा परंतु शिवीगाळ होणार असेल तर मात्र आवाज उठवला गेला पाहिजे.
आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून! कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल
घरगुती कामगारांची कामगार कायद्यान्वये नोंदणी, त्यांच्या मुलांचे शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण देणे आदींच्या अनुषंगाने ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे थेट प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे.
आपल्या घटनेच्या प्रस्तावनेतच सेक्युलर हा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे.यामुळे,सर्व धर्म समान असल्याची ग्वाही मिळते.मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला या घटनेच्या या तत्वानुसार वागणे आवश्यक आहे.
वाहनांसाठी इंधन म्हणून बायोडिझेल विनापरवाना विकण्यात येत असल्याने आयकर आणि वस्तु व सेवा कराची चोरी होत असून, शासनाच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसूलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अभियानाच्या अनुषंगाने चर्चा झाली तसेच कॅगचा अहवाल आणि सरकारकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करून खुली चौकशी करावी यावर एकमताने निर्णय घेण्यात आला.
देशाचे माजी राष्ट्रपती, थोर अणुशास्त्रज्ञ, विद्यार्थीप्रिय शिक्षक, दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांचा आज जन्मदिवस.
चौकशीतून ही खरच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल, अशी टीका भाजपवर रोहित पवार यांनी केली आहे.
अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले आहेत.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने कहर केला असून बळीराजावर आता बास रे वरुणराजा. अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
मुंबईत नुकत्याच झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून त्या अनुषंगाने वीज क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचा आढावा ते घेत आहेत.
शारदीय नवरात्रोत्सवाची आजपासून सुरुवात होत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुंम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार ‘एसओपी’तील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने आज या सुविधेचे उद्घाटन झाले. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
यावेळी ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील, तसेच शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतील.
फिल्ड सेल्स एक्झिक्युटीव्ह, यास तात्काळ अटक करण्यात आले. आरोपीने इतरही व्यावसायिकांचे पेटीएम अकाऊंटचे पासवर्ड चोरून ते गैरकामासाठी वापरल्याचे पुढे येत आहे
इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी स्वतंत्र घरकुल योजना अस्तित्वात नाही. इतर मागास प्रवर्गाकरीत प्रस्तावित सावित्रीबाई फुले घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यात घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील १०६१ पोलिस अंमलदारांना पोलिस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले.
यूएसचे प्रतिनिधी आणि मनसे चिटणीस अखिल चित्रे यांच्यात बीकेसी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून बैठक झाली. त्यानंतर अॅमेझॉनने मराठी भाषेचा अॅपमध्ये समावेश करण्यास तयारी दर्शविली.
पोलिस स्मृतिदिन संचलन समारंभ देखील पार पडला. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.
मी आजपर्यंत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यावर व्यक्तीगत टीका केली नाही. विरोधीपक्ष नेता असल्यामुळे सरकारवर टीका केली होती, असंही खडसे म्हणाले.
आम्हाला शेवटपर्यंत आशा होती एकनाथ खडसे पक्षात राहतील पण त्यांचा निर्णय झाला असावा.
एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला, हे दुर्दैवी आहे. त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. माझ्याबाबत तक्रारी असतील तर त्यांनी वरिष्ठांकडे जायला पाहिजे होते.
या समितीमधील सर्व सदस्य हे वीज क्षेत्राशी निगडित असून काही सदस्य विद्युत अभियांत्रिकी अध्ययन क्षेत्रातील तर काही सदस्य प्रत्यक्ष कामाशी संबंधित असलेले आहेत.
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून राजकीय प्रतिस्पर्ध्यांविरोधात विविध यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला.
यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार आहे. पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावर होणार नाही आहे.
कोविड काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ कार्यक्रमासारखेच ‘माझा महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र’ विचार पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
सीबीआयला तपास करताना यापुढे राज्यसरकारची परवानगी घ्यावी लागणार असल्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केल्यानंतर भाजपाच्या पोटात गोळा उठला आहे.
मी आयुष्याची 40 वर्ष भाजपसाठी काम केलं. एकाएकी पक्ष सोडावा असं मला कधीच वाटलं नाही.
भाजपासाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करणार आहे. भाजपा ज्या वेगाने वाढवला, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवू.
उपमुख्यमंत्री हे ‘देवगिरी’ निवासस्थानाहून व्हीसीद्वारे सर्व बैठकांसाठी उपलब्ध असून त्यांच्या गृहविलगीकरण काळातही राज्य शासनाची निर्णयप्रक्रिया सुरु राहील.
राज्याने पूर, गारपीटग्रस्त शेतकरी, चक्रीवादळ आणि कोरोना यासारख्या संकटाचा सामना करत नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना मदत केली आहे.
राज्य शासनाने 2019 मध्ये नवीन औद्योगिक धोरण तयार केले असून यामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले आहे.
रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनास अधिसूचित केलेल्या जागेच्या भूसंपादनास भूधारकांच्या व तेथील संघटनेचा प्रचंड विरोध असल्याने तेथे मोजणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही.
गीता जैन यांच्यासोबत मीरा भाईंदर महानगरपालिकेतील काही नगरसेवकही प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढणार आहे.
10 ते 12 आमदार संपर्कात आहेत, असं जयंत पाटील म्हणाले होते. परंतु एकही आमदार, माजी आमदार एकनाथ खडसेंसोबत गेला नाही.
दसरा हा आनंदाचा, उत्साहाचा सण आहे. ‘दसरा सण मोठा… नाही आनंदाला तोटा…’ असं आपल्याकडे म्हटलं जातं.
लढवय्या महाराष्ट्र अशी आपली ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणुच्या विरोधातील लढ्यातही आपण सर्व भेद बाजुला ठेवून एकवटले आहोत.
विनायकदादा पाटील यांनी सरपंच म्हणून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर पंचायत समिती सभापती, आमदार आणि मंत्री असा त्यांचा चढता राजकीय आलेख राहिला.
मेळाव्यात उद्धव ठाकरे काय राजकीय भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लागले होते. अपेक्षेनुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तडाखेबंद भाषणातून विरोधकांवर चौफेर हल्लाबोल केला.
समित ठक्करला नागपूर पोलिसांनी गुजरातमधील राजकोटमधून अटक केली आहे. समित ठक्करला ट्रांजिट रिमांडवर नागपूरला आणण्यात आले असून आज न्यायालयात दाखल केले जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बेडकाची उपमा राणे आणि त्यांच्या दोन मुलांना दिली होती. यावर नारायण राणे भडकले असून त्यांनी भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात येणार असून प्रती दहा लाख लोकसंख्येमागे 70 हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी तयार आहे.
७ ऑक्टोबर रोजी घटनापीठाचे गठन करून त्यासमोर अंतरिम स्थगिती निरस्त करण्याच्या अर्जावर सुनावणी करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती.
आरबीआय ने ९ लाख ठेवीदार खातेदारांचे हित डोळ्यासमोर ठेवून येस बँकेच्या धर्तीवर प्रस्ताव तयार करावा. आयुष्यभराची पुंजी बँकेत ठेवली, बँक बुडाल्याने मानसिक धक्का बसून तसेच खचून काहींचा मृत्यू झाला आहे.
बैठकीमध्ये महापारेषणच्या भविष्यातील योजना, ट्रान्समिशन चार्जेस, प्राधान्यक्रमाने हाती घ्यायच्या उपाययोजना आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय आरोग्य मिशन ही केंद्र सरकारची योजना, केंद्राच्या निधीतून पण, राज्य सरकारमार्फत त्याची अमलबजावणी केली जाते.
राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात शरद पवार यांनी म्हटले आहे की, जनराज्यपाल असा उल्लेख भारतीय संविधानात आढळत नाही,
मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कालच जालना येथे सर्वोच्च न्यायालयात पुन्हा अर्ज करण्याचे सूतोवाच केले होते.
प्रश्न खूप आहेत, पण त्याबाबत काही तरी निर्णय घेणं गरजेचं आहे, एक दोन दिवसात या विषयावर निर्णय घ्यावा, कोरोना संकट काळात अनेकांचे रोजगार गेले, पैसे नाहीत त्यात बिल कसे भरणार?
संरक्षण दलातील शौर्यपदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना नागरी भागातील घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्याची तरतूद नगर विकास विभागाने केली आहे.
भूसंपादित केलेल्या मालमत्तेचा पुनर्विकासास चालना देण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येईल उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 3 ते 5 वर्षाची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला मिलाद उन नबी त्यांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो.
मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपले निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
केंद्र शासनाने 23 ऑक्टोबर 2020 रोजी जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 03 अन्वये आदेश काढून कांद्याचा जीवनावश्यक सूचित समावेश केला आहे.
या सप्ताहामध्ये कोविड-१९ रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या सर्व सुचनांचे अनुपालन करून पक्षांचे महत्त्व, स्थलांतर व अधिवास, संरक्षण, संर्वधन याबाबत जागृती करण्यात येईल.
गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत.
लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे. याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. आमच्या नेत्यांनी ऊर्जा मंत्र्यांची भेट सुद्धा घेतली.
जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ईद-ए-मिलाद’ सण साजरा करण्यात यावा.
फक्त 25 मे.टन साठवणुकीच्या मर्यादेमुळे सध्या एपीएमसीमधील कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणे थांबवले असून त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होत आहे.
देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात व स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत इंदिराजींनी दिलेले योगदान, केलेल्या त्यागाबद्दल देशवासीय त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञ राहतील.
देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे लाखो अनुयायी असून, ते बंजारा समाजाचे शक्तिस्थान होते. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी-तांड्यावर शोककळा पसरली आहे.
डॉ. रामराव बापू महाराज यांना कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठातून डी. लिट. पदवी देऊन सन्मानित केले होते.
हा लढा आपल्या सर्वांचा आहे. मराठाभाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
टाटा वीज कंपनीच्या अंतर्गत असलेली मुंबईची आयलँडिंग यंत्रणा 12 ऑक्टोबरला मुंबईला बाहेरून येणारा वीजपुरवठा बाधित झाल्यावर कार्यान्वित होणे गरजेचे होते.
रोहित पवार यांनी लोकल रेल्वे सुरू करण्याबाबत थेट केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर टीका केली आहे.
ठाकरे सारकरपूर्वी महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या फडणवीस सरकारच्या अनेक निर्णयांना महाराष्ट्र सरकारनं मातीमोल केलं आहे.
भविष्यात पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास चालना देणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने शासनामार्फत या वाहनांसाठी आतापर्यंत विविध सवलती देण्यात आल्या आहेत.
संपूर्ण राज्यात बाटलीबंद पाणी पुरविण्यासाठी मे. शेळके बेव्हरेजेस प्रा.लि. पुणे (Oxycool) या संस्थेची निवड करण्यात आली असून, सर्व बस स्थानकावर ६५० मिलीलिटर व १ लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये हे ‘नाथजल’ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
मुंबईसोबत टाटा हे नाव एक ब्रॅण्ड म्हणून जोडले आहे. मुंबईसाठी वीजनिर्मितीसाठी अनेक प्रकल्प त्यांनी पहिल्यांना सुरू केले. मुंबई अंधारात जाऊ नये यासाठी 1981 साली आयलँडिंग यंत्रणेचे काम टाटा पॉवर कंपनीने केले होते.
कोरोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. यासाठी उद्योग खात्याचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आज केंद्राच्या पत्रानं एक गोष्टी स्पष्ट झाली आहे. अहंकारी प्रवृत्तीनं घेतलेल्या निर्णयामुळं मुंबईकरांना त्याच्या दुष्परिणामांचा सामाना करावा लागत आहे.
ज्या कामासाठी ती जागा मागत आहोत, ते काम लोकांचंच आहे. मीठागराच्या अशा अनेक जागा आहे. त्या डावलण्यात आल्या आहे. आपण बाजूला कुठे तरी मिठागर करु शकतो, असं किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय.
खरं म्हणजे ती जमीन महाराष्ट्राची आहे. ज्या राज्याची जमीन असते त्यावर पहिला अधिकार हा त्याच राज्याचा असतो. भाजपचे नेते कोणत्या आधारावर टीका करतायत.
भाजपला मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा असल्यानंच हे कटकारस्थान सुरु आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. ग्रामीण आरोग्याचा त्या कणा आहेत.
अंबरनाथ शहरात अनियमित पाणीपुरवठा होत आहे, अंबरनाथ शहराची लोकसंख्या लक्षात घेता पाण्याच्या मागणीपेक्षा पाणीपुरवठा जास्त आहे. तरीही शहरात पाणीटंचाई जाणवत आहे.
मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. भेसळ विरोधातील मोहीम अधिक तीव्र करताना भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना श्री. पाटील यांनी दिल्या.
तीनही वीज कंपन्यांचा मालकी हक्क असलेल्या जमिनींची नोंद करणे, या जमिनी नावावर करणे, तसेच तिन्ही वीज कंपन्यांनी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधणे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी गरजेचे असल्यावर डॉ. राऊत यांनी यावेळी भर दिला.
महिलांच्या जीवनमानात बदल होण्यासाठी उद्योगशीलतेत वाढ करत ‘विकेल ते पिकेल’ या धर्तीवर आधुनिक बाजारपेठेच्या मागणीशी उत्पादननिर्मितीची सांगड घालावी लागेल.
ऊर्जा विभागाअंतर्गत राज्य प्रेषण केंद्राची बैठक ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी एस टी यू कडे प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला.
भिक्षेकऱ्यांसाठी राज्यात महिला व बालविकास विभागांतर्गत पुरूष व महिला भिक्षेकरी यांच्याकरिता एकूण आठ भिक्षेकरी स्वीकार केंद्रे कार्यरत आहेत.
आज दुपारी ३ वाजता कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्यावतीने हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला. सुमारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ सुनावणी चालली.
विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी आज महाविकास आघाडी सरकार मधील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे बंद पाकिटात सुपूर्द केली आहेत.
राज्यात चोरट्या मार्गाने दुसऱ्या राज्यातून अनेक मार्गांनी गुटखा येत असून त्याला पायबंद घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुसह्य होण्यासाठी मेट्रोच्या प्रकल्पांना गती दिली जात आहे. मेट्रो मार्गिका ४ आणि ४ अ साठी केएफडब्ल्यू संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात जास्त रक्कमेचे कर्ज आहे.
फोर्स वन एक समर्पित असे दल आहे. त्यामध्ये ऐच्छिक म्हणजे स्वत:हून जवान सहभागी होतात. ते खडतर प्रशिक्षण घेतात. परिश्रम करतात. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.
रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली होती.
इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अनर्ब यांना अटक करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अन्वय यांनी अर्णब आणि इतर दोघांची नावे लिहीली होती.
कर्मचाऱ्यांच्या राहिलेल्या उर्वरित २ महिन्याच्या वेतनापैकीसुद्धा एक महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून, बाकी एक महिन्याचे वेतनही कर्मचाऱ्यांना लवकर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ॲड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही 10 सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.
राज्य महामार्ग परिवहन सेवेतील (एसटी) कर्मचाऱ्यांची सध्या परवड सुरू आहे. ह सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही.
भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या आदिवासी समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक चळवळ सुरु केली.
राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
भारतीय विमा कर्मचारी संघटना आणि स्थानिक लोकाधिकार समिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून अलिबाग येथील वरसोली गावात न्यु इंडिया इन्शुरंस कंपनीचे ‘दैवत’ नावाचे विश्राम गृह बांधण्यात आले असून त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-लोकार्पण करण्यात आले.
शासनामार्फत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्याचे पालन करावे, असे श्री.देशमुख यांनी म्हटले आहे.
तिब्रेवाल यांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी Esplanade, मुंबई यांच्या न्यायालयाकडून 5 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मनोरी येथे 25 ते 30 एकरामध्ये हा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव असून 200 एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प भविष्यात क्षमता वाढविण्यासाठी सोयीस्कर आहे.
ईडीने नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीचं पथक सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचलं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.
प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर १० ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
जयसिंगराव गायकवाड यांनी सुरुवातीपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले होते.
आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,' अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
कायम स्पष्ट राजकीय भूमिका घेण्यासाठी ते ओळखले जायचे. आपल्या भूमिकांशी ठाम राहणे, पक्षहित सर्वात प्रथम ठेवणे, देशभरातल्या नेत्यांशी सुसंवाद या त्यांच्या कामाच्या खास बाबी होत्या.
मागील अनेक वर्षांपासून मी खासदार अहमद पटेल यांच्याशी संपर्कात होतो. विविध कामानिमित्त त्यांच्या भेटीगाठी व विस्तृत चर्चा होत असत. आपल्या जबाबदारीविषयी त्यांची कटिबद्धता विलक्षण होती.
ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे हे पंढरपुरातील तनपुरे महाराज आश्रमाचे विद्यमान अध्वर्यू असून वारकरी परंपरा आणि गाडगे महाराजांची परंपरा याचा समन्वय साधणारे संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात.
राज्यपालांनी सोसायटीच्या ग्रंथांची पाहणी केली. तसेच संविधान दिन आणि 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.
दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालय येथे राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
शौर्याला वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. २६ नोव्हेंबर हा शौर्यदिन. या दिनी शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना वंदन व नतमस्तक. हा दिवस आपण विसरू शकत नाही.
भारतामध्ये लोककला शास्त्रशुद्ध पद्धतीने केवळ मुंबई विद्यापीठात शिकविले जाते. आदिवासी लोककला आणि पारंपरिक गायन, नृत्य आणि वादकाचे शिक्षण दिल्याने लोककला जोपासल्या जात आहेत.
प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी म्हणाले, “सार्वजनिक व खासगी सहभागाचे मॉडेल म्हणून प्रोजेक्ट मुंबईने नेहमीच समाजातील प्रत्येक श्रेणीसाठी व विशेषतः महत्त्वाच्या श्रेणींसाठी काम केले आहे.
भारतीय संविधान हे आपल्या सर्वांसाठी गौरवशाली असे आहे. भारतीय संविधानाचा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे संविधान म्हणून आदराने उल्लेख केला जातो.
मी शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचं हिंदुत्व मानतो. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय. मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. आणि ते त्यांनी ९२-९३ साली करून दाखवलं.
उद्धव ठाकरेंचा अभ्यास नाही. त्यांना कामकाजाची माहिती नाही. मंत्रालय कुठे आहे, हेदेखील त्यांना माहिती नव्हतं. शरद पवार यांनी अचानकपणे उद्धव ठाकरेंच्या नावाचा नावाचा प्रस्ताव ठेवला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने नव्हते, त्यांना कधीही मराठा समाजाला आरक्षणाला समर्थन दिलेलं नाही. सुप्रीम कोर्टात चांगले वकील नेमण्याची गरज आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं. पत्रकार अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निकालावरून राज्यात सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
भारतनानांचे नेतृत्व हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेच्या सुख-दु:खांशी एकरुप झालेले नेतृत्व होते. मतदारसंघातल्या गावागावात, घराघरात त्यांचा लोकसंपर्क होता. पंढरपूर-मंगळवेढ्यातल्या दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासह भागाच्या विकासासाठी त्यांनी तळमळीने काम केले.
सर्वेक्षण पथकात दोन सदस्य असतील. त्यात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांचा समावेश असणार आहे. ग्रामीण भागातील सर्व घरांचे तर शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद आहे.
महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरात सरकारने चांगले काम केले आहे. उद्धव ठाकरे हे जनतेला मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्राला लाभले आहे.
धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले.
शहरातील विविध जातीवाचक वस्त्यांची नावं हद्दपार करून त्यांना महापुरुषांची नावं दिली जाणार आहेत. वस्त्यांना दिलेली जातीवाचक नावं योग्य नसल्याचं मत काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं.
बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्ह्यातील सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना या निर्णयाबाबत कळविण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाने विद्यापीठामधील शासनमान्य पदावरील 148 कर्मचाऱ्यांच्या बदल्या/पदोन्नत्या विना अनुदानित पदावर केलेल्या आहेत ही बाब लक्षात घेता सकृतदर्शनी त्यांच्या सेवेत खंड पडला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर काम करीत असून अतिवृष्टी, चक्रीवादळ कोरोना याकाळात नागरिकांना विविध उपाययोजनांनी दिलासा देण्याचे काम केले आहे.
या अधिवेशनासाठी येणाऱ्या राज्यातील दोन्ही सभागृहातील आमदारांसह विधानभवन आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.
पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये
मराठा आरक्षण प्रकरणी राज्य शासनाचे वरिष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी सरन्यायाधीशांसमक्ष तातडीने घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकताही विषद केली होती.
पराभवातून काही गोष्टी घेण्यासारख्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. सरकार पाडण्यासंदर्भात आता आम्ही बोलण्यापेक्षा कृतीवर भर देऊ.
भारतरत्न डॉ .बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणाला आणि एकूणच त्यांच्या कार्याला मी विनम्रपणे अभिवादन करतो आणि सर्वांनी शिस्तीचे पालन केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार नाही.
भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे रवी पटवर्धन यांनी रंगभूमी असो चित्रपटसृष्टी वा दूरचित्रवाणीचा छोटा पडदा या सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवला.
बाबासाहेबांना वाचनाचा आणि ज्ञानार्जनाचा प्रचंड व्यासंग होता. पण यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. ज्ञानार्जनासाठी त्यांच्या वाट्याला आलेल्या अडचणी, कष्ट यापुढे कोणत्याही व्यक्तीच्या, गोरगरीबांच्या वाट्याला येऊ नयेत यासाठी शासन कार्य करेल.
ध्वज निधीला योगदान देणे ही भावना महत्त्वाची आहे; किती योगदान देतो हे महत्त्वाचे नाही, असे सांगून ध्वज निधीला सढळ हस्ते योगदान देण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
आज शेतकरी रस्त्यावर आहे, आज तो स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलण्यास का तयार झाला आहे याचा राजकीय मतभेद बाजूला ठेवून शांत डोक्याने विचार केला तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील याची खात्री आहे
विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित या शपथविधी कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रीमंडळातील विविध विभागांचे मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते.
महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी दोन विधेयके विधिमंडळात मांडण्यात येतील.
लसीकरणासाठी विविध स्तरावर समन्वय यंत्रणा करण्यात आली आहे. राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे.
दरम्यान, सावरा यांचं पालघर भागात कार्यक्षेत्र होतं. विष्णू सावरा यांनी फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती.
ईडीला चौकशीसाठी पुन्हा बोलवायचंच असेल तर फक्त फोन केला तरी हजर राहीन, त्यासाठी समन्स देण्याची गरज नाही असं विधान करतानाच त्यांनी ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं आहे.
या अधिसूचनेत सुचवल्याप्रमाणे बदल झाल्यास राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त हजारो मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा जुनी पेन्शन मिळण्याचा अधिकार संकटात येणार होता.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून नेदरलँड आणि महाराष्ट्रातील संबंध अधिक वृद्धींगत होतील. पर्यावरण रक्षणासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात काम होत आहे.
‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी रक्तदान करून त्याद्वारे नागरिकांना रक्तदान करण्याचा संदेश दिला.
एका गव्यास पुणेकरांनी मारून दाखवले. पुणेकरांनी हेसुद्धा करून दाखवलं. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले. भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे.
राज्य शासनाचे हे मोठे आणि नाविन्यपूर्ण पाऊल आहे. महाराष्ट्रात सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट पायाभूत पूरक वातावरण असलेले देशातील सर्वाधिक औद्योगिकरण असलेले महाराष्ट्र राज्य आहे.
डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
छायाचित्र मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे मंत्रालयात आयोजित करण्यात आली.
बाजारात ब्रेल किट, श्रवण यंत्र, कृत्रिम अवयव, बॅटरीवर चालणारी व्हील चेअर अशी दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार अनेक प्रकारची सहाय्यक उपकरणे उपलब्ध असतात
गोपीनाथ मुंडेंनी मला एक राजकीय मंत्र दिला, संघर्ष करायला आम्ही जे शिकलो ते गोपीनाथरावांमुळेच शिकलो. गोपीनाथराव मला एकच गोष्ट सांगायचे.
ईडीने माझ्या घरी मारलेल्या छापेमारीत पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं असा खोटा दावा केला जात आहे. काही वृत्तवाहिन्या मुद्दामून असं वृत्त देत असून ते हास्यास्पद आहे. असे म्हटले आहे.
ओबीसी आरक्षणात कोणताही वाटेकरी स्वीकारणार नसून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
विधिमंडळ अधिवेशनाला कोरोनाचा फटका बसला आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना कोरोनाचा प्रसार नुकताच सुरू झाला त्यामुळे हे अधिवेशन गुंडाळावे लागले होते.
राज्यातील महिलांवरील अत्याचाराची घटना कमी करण्यासाठी आणि बलात्कारांना शिक्षा देण्यासाठी हैद्राबाद सरकारच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने 'शक्ती' कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानपरिषदेच्या कामकाजास सुरुवात झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून देण्यात आला.
निती आयोगाने शाश्वत विकासाच्या 17 उद्दिष्टानुसार राज्यांचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार राज्यांनीही कृती आराखडे तयार करणे अपेक्षित आहे. शाश्वत विकासासाठी उद्दिष्टे ही व्यापक स्वरुपात आहेत.
कुस्ती ही महाराष्ट्राची शान आणि मान आहे. महाराष्ट्राने कुस्तीला लोकाश्रय आणि राजाश्रय दिला. या कुस्तीवर महाराष्ट्राचे नाव कोरण्याची किमया ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांनी केली.
श्रीपती खंचनाळे साहेब बेळगावच्या एकसंबा गावातून कोल्हापूरात आले आणि कोल्हापूरचेच होऊन गेले. कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या कुस्ती चळवळीशी एकरुप झालेलं त्यांचं व्यक्तिमत्व होतं.
राज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 30 डिसेंबर 2020 पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
सोलापूर जिल्हयातील परतेवाडी येथील युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणा-या ग्लोबल टिचर प्राईझ पुरस्कारासाठी डिसले गुरुजी यांची निवड करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी कमी करून दोन दिवसांचा करण्यात आला. त्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकार प्रश्नांपासून पळ काढतंय
कोरोना संकटामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. आपण करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे. चीननं १५ दिवसांमध्ये त्यांच्याकडे रुग्णालय उभारलं याचं सर्वांना कौतुक आहे.
राज्यावर आलेले ‘कोरोना’चे संकट अभूतपूर्व आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या प्रत्येक घटकाने या संकटाचा खंबीरपणे सामना केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा नवनिर्वाचित सदस्य गोपिचंद कुंडलिक पडळकर यांचा विधानपरिषदेत संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी परिचय करुन दिला.
‘ज्युवेनाईल जस्टीस इन्फर्मेशन सिस्टीम’च्या (जेजेआयएस) च्या डॅशबोर्ड व माहिती व्यवस्थापन पद्धतीद्वारे बालकांची काळजी घेणाऱ्या संस्था, बाल कल्याण समिती, बाल न्याय बोर्ड (जेजेबी) यांचे सनियंत्रण व संबंधित बालकाची नोंद व पाठपुरावा करण्यात येणार आहे.
गडचिरोली, ठाणे, चंद्रपूर, रत्नागिरी, नांदेड, सिंधुदुर्ग, जळगाव, लातूर, रायगड, नाशिक, अहमदनगर, वर्धा, जालना, कोल्हापूर या जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
मलबार हिलवरील वर्षा तसेच इतर मंत्र्यांचे बंगले हे खूपच जुने झाले असून आवश्यक ती दुरुस्ती व नूतनीकरण गरजेचे होते असे सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे.
विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी स्पोर्टस सायन्स, स्पोर्टस टेक्नॉलॉजी व स्पोर्टस कोचिंग व ट्रेनिंग हे ३ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत.
अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर ८० तासांचे सरकार आले त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार टिकवता आले असते. त्यांच्या आमदारांना त्यांनी सांभाळलं असतं तर सरकार टिकले असते', असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
तत्कालीन राज्य सरकारच्या घाईघाईत ३२९० कोटी रुपयांचा एलबीटी माफ करण्याच्या चुकीमुळं राज्याचं २८००० कोटींपेक्षा अधिक नुकसान झालं. ही चूक झाली नसती
राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीची जुनी निवृत्ती वेतन योजना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून या योजनेला अडथळा ठरणारी १० जुलै २०२० ची अधिसूचना मागे घेतली आहे.
'कांजूरमार्गला ४० हेक्टर जागा सरकारला मिळाली होती. ती जागा ओसाड आहे, कांजूरमार्गला मेट्रोच्या ३, ४ आणि ६ मार्गिकेच्या कारशेड करण्यात येणार होत्या.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या संवादाला लक्ष्य केलं आहे. 'प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही.
मुंबईतल्या मेट्रो कामाची पाहणी मी आज करणार आहे. या आधी कोस्टल रोडची पाहणी मी केली होती. राज्यातील विकास कामांवर माझे स्वत:चे लक्ष आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई मेट्रोच्या अंधेरी एल-सेव्हन स्थानक, अकुर्ली मेट्रो स्थानक, दहिसर रेल्वे उड्डाण पूल (मेट्रो रेल ब्रिज), चारकोप मेट्रो डेपो आणि डी.एन. नगर मेट्रो स्थानक येथे भेट देऊन कामांची पाहणी केली.
गायीची सेवा करणे ही श्रद्धेची भावना असून गायीच्या जतन व संवर्धनासाठी गऊ भारत भारती चांगले कार्य करीत आहे. ही कौतुकास्पद बाब आहे.
स्थानिक पातळीवर कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होतात का याचा अभ्यास टास्क फोर्समधील डॉक्टरांनी करावा. नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे उपचाराची पद्धत याबाबत टास्कफोर्सने अभ्यास करावा.
विधान परिषदेत मतदान करणे, ती निवडणूक लढवणे किंवा एखाद्या सदस्याला अनुमोदन करणे हा इतर सदस्यांचा संविधानिक अधिकार होत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे तसे निकाल आहेत.
कोविड-१९ चे संकट जगावर असताना सुद्धा महाराष्ट्रात उद्योग विभागाने कमी कालावधीत 2 लाख कोटींचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हा समाधान, अभिमान वाटेल असा क्षण आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने अनेकांना आपण पक्षात अडगळीत फेकल्यासारखी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे बरेच पदाधिकारी नाराज आहेत.
उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन देशाच्या अॅटर्नी जनरलांना नोटीस बजावून कायद्यातील या अस्पष्टतेवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांची चार तासांहून अधिक काळ ईडीकडून चौकशी झाली. पूर्वेश सरनाईक आज नोटीस देऊनही ईडीसमोर हजर झालेले नाहीत.
एमएमआरडीएने आर्थिक गुन्हे शाखेला दिलेलेल्या अहवालात 2013 ते 2017 आणि 2017 ते 2020 या सहा वर्षातील निविदा प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला.
अवैध धानवाहतूक करणारी वाहने जप्त करावीत. धानाच्या नोंदी काटेकोर व्हाव्यात, परराज्यातील धान राज्यात येणार नाही यासाठी संबंधित विभागीय आयुक्त व पोलिस महानिरिक्षकांनी भरारी पथके नेमून आवश्यक कारवाई करावी.
राज्यातील सर्व नागरिकांना, ग्राहकांना नव्या ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी, तयार असलेल्या कार्यप्रणालीची सक्षम पद्धतीने अंमलबजावणी करावी लागेल.
ग्रामीण भागात महसुली गावांना लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन स्वस्त धान्य दुकाने मंजूर करणे तसेच रद्द करण्यात आलेल्या दुकांनासाठी जाहीरनामे काढण्यात यावे
शिंदे यांच्या विरोधात जव्हारमध्ये जादूटोणा केला जात असल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुकांना काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित ताकदीने सामोरे जाणार असल्याचे सांगितले होते.
मनसेचे कोंढवा प्रभाग अध्यक्ष अमित जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली हे तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यानुसार ’नो मराठी, नो अॅमेझोन’ म्हणत कार्यकर्ते आक्रमक झाले होते.