लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता.
रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान आहे.
पोलीस अधिकाऱ्यांना बदलत्या काळात नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण गरजेचे आहे. प्रशिक्षण घेताना मानसिक स्वास्थ्य कायम राखणेदेखील महत्वाचे आहे.
कोरोनाची अद्यापही तिसऱ्या लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी अधिक काळजी घेऊन लसीकरण करून घ्यावे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना अतिवृष्टीचे संकट आले. अशा परिस्थितीत शासन, प्रशासन विविध समस्यांचा सामना करत परिस्थितीवर मात करते आहे.
अतिवृष्टीचा फटका महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसला आहे. राज्यावर आलेल्या नैसर्गिक संकटाशी लढताना राज्य सरकार हे खंबीरपणे जनतेच्या पाठीमागे उभे आहे.
प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंतही विद्यार्थी असावी आणि विद्यार्थी असण्याची दोन उद्दिष्टे आहेत. त्याच्यामध्ये एक तुम्ही शिकत राहतात,
सोर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
एम. ए. (हिंदी) एम. एड. झाल्या व नाशिकच्या बी एड कॉलेजमध्ये अनेक वर्ष अध्यापनाचे काम केले. त्याच कॉलेजच्या प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या.
घराच्या पाण्याच्या टाक्या ओव्हर प्लो होणार नाही याची दक्षता घ्यावी त्याच बरोबर टाक्या ओव्हर प्लो होऊ नये यासाठी व्हॉल्व व लेव्हल सेंस्सरचा वापर करावा
महापौर सतिश कुलकर्णी यांनी सोमवार (दि.१२) पाणी पुरवठा विभागाच्याअधिकार्यांसमवेत आढावा बैठक घेतली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ‘समृद्धी लेबर बजेट 2022-23’ अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
संस्कृत भाषा सभा, नाशिक तसेच संस्कृत भाषा प्रसार कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
आदिवासी भागातील बांधवांना कोरोनावरील उपचार व लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करणे खूप कठीण काम होते.
महानगर भाजपाच्या उभारणीत आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करण्यात बंडोपंतांचे योगदान मोलाचे आहे.
नाशिक येथील रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ स्टेशनने (सीआरएस) दोन पुरस्कार मिळवले आहेत.
गंगापूर धरण येथील बोट क्लबला राज्याचे क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी भेट दिली.
पवार यांनी नाशिक जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
नवरा-बायकोत झालेल्या किरकोळ वादानंतर दोघांनी धक्कादायक पाऊल उचलले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी मदत होईल, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
येणाऱ्या काळात किमान जमिनीवर अधिक क्षेत्रफळ निर्माण करण्याची आवश्यकता राहणार आहे.
पिक स्पर्धा योजनेतील विजेत्या २५ शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
आज देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
1985 पेसा कायद्यानुसार ज्या गावांचा समावेश पेसा कायद्यात करण्यात आलेला नाही.
ग्रामिण पोलीसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळावर छापा मारला असता १० पुरूष आणि १२ महिला मद्यधुंद तसेच बिभत्स असल्याचे आढळून आले.
खावटी अनुदान वाटप योजनेचा प्रत्यक्ष लाभ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या पुर्नपरीक्षेसाठी राज्यात एकूण 86 परीक्षाकेंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणार्या नाशिकमधील इगतपुरीचे निसर्गसौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून उठते
केंद्र सरकारच्या सल्लागार समितीमार्फत देखील डेल्टा प्लस या विषाणूच्या अनुषंगाने राज्य शासनास काळजी घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या.
आम्ही मराठा समाजाची पाच मूक आंदोलने जाहीर केली होती. कोल्हापूरनंतर नाशिकला आंदोलन झाले.
शहर व परिसरातील असंख्य पर्यावरण प्रेमी या मोहिमेत सहभागी होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे आणि करत आहे.
प्रतिष्ठानचे सचिव तथा प्रधानाचार्य रविंद्र पैठणे यांनी प्रास्तविक केले.विश्वास देवकर यांनी सूत्रसंचालन व मानपत्राचे वाचन केले.
तक्रारदारांनी एका नामांकित कुरिअर कंपनीमार्फत नाशिक येथे कुरिअर केले होते.
नाशिक पुणे सेमी हास्पीड रेल्वे मार्ग हा देशातील पहिलाच मार्ग असणार आहे.
कष्ट, इच्छाशक्ती, एकांतवास, सकारात्मक विचार, तंदुरुस्ती यामुळे मन, विचार सकारात्मक होतात.
ज्ञान मिळविणे,दुःखावर उपाय शोधणे यातून स्वतःबद्दल प्रश्न निर्माण झाल्याने सिद्धार्थाने गृहत्याग केला.
जिल्ह्यातील कडक लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम गेल्या आठ दिवसात दिसून आला आहे.
जिल्हापातळीवर गठीत करण्यात आलेले कृती दल या अनाथ झालेल्या मुलांचा आधारस्तंभ म्हणून कार्य करणार आहे.
मनपा प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांच्या सहाय्याने कोविड रुग्णाची होणारी लूट थांबविण्यात यश आले आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नवीन रुग्णवाहिका मिळाव्यात त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सायंकाळी ५.३० नंतर नाशिक शहरात विविध ठिकाणी पाहणी केली.
बिटको रुग्णालयात १०० बेडचे रुग्णालय सुरू करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागास देण्यात आल्या आहेत.
राज्यात किमान २० ते २२ लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोस द्यायचा आहे.
उद्योगांसाठी नाशिकमधील लॉकडाऊन म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार अशी असून या निर्णयाचा भाजपा उद्योग आघाडीने तीव्र शब्दात निषेध केला आहे.
जिल्हा प्रशासनसाने १२ मे ते २२ मे या कालावधीत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकार व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात आवश्यक सर्व प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात येत आहे.
अमोल रमेश जाधव आणि नीलेश सुरेश धामणे या दोन तरुणांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे.
महिला व बाल विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.
नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी 21 एप्रिल 2021 हा सून्न करणारा दिवस ठरला.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानाने रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुक घेण्यात आली.
शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या होत्या.
1 मे या महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे प्रातिनिधीक स्वरूपात मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
भाजप नेत्यांनी रुग्णांना योग्य त्या सोयी सुविधांची मदत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आवश्यक त्या सोयी सुविधा मिळऊन देण्यासाठी प्रयत्न केले.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन, कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) च्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
ऑक्सिजन दुर्घटनेत मृत झालेल्या 22 रुग्णांपैकी 16 मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
केंद्राने रेमडेसिवीर इंजेक्शनचा डबल कोटा केल्यामुळे डबलच्या हिशोबाने तसे वाटपसुद्धा सुरू करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
नाशिक जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या 27.826 मेट्रिक टन ऑक्सिजनपैकी चार मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा धुळे जिल्ह्यास देण्यात येणार आहे.
ऑक्सिजनचे व्यवस्थापन करताना देखभाल, दुरूस्त सोबतच ड्युरा व जम्बो ऑक्सिजन सिलेंडरचीही व्यवस्था करण्यात यावी.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबई येथील निवासस्थानी उपचार घेतले.
नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक गळतीच्या घटनास्थळी कृषिमंत्री श्री. भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली.
नाशिक महानगरपालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक गळतीच्या ठिकाणी भेट देऊन घटना स्थळाची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पाहणी केली.
खा. भारती पवार, आ.राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, आ सरोज अहिरे, महापालिकेचे पदाधिकारी नगरसेवक तसेच वैद्यकीय अधिकारी यांनीही भेट देत परिस्थितीची माहिती जाणून घेत संबंधितांना सूचना दिल्या.
ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने व्हेंटिलेटर वर असलेले रुग्ण तात्काळ मृत्युमुखी पडले ही नाशिक ची घटना मन विदीर्ण करणारी आहे.
कोरोनाविरुद्धचा लढा एकजुटीने लढला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली ही घटना अतिशय दुःखद घटना आहे.
डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील मोठ्या ऑक्सिजन टाकीला बुधवारी (दि.२१) गळती लागली. राजेश टोपे म्हणाले की, मला मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक बाबीमुळे ही दुर्घटन घडली आहे.
महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये असलेल्या ऑक्सिजनचा टाकीला लिकेज झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
ग्रामीण भागातील रुग्णांना खाजगीत उपचार घेणे शक्य होणार नसल्याने डी.सी.एच.सी सक्षम करण्यात याव्यात.
नाशिकच्या वोकहार्ड रुग्णालयात एका वृद्धाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
कोरोनारुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात बिटको व जिल्हा सामान्य रुग्णालयाला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट देवून पाहणी केली.
देवसाने हे गाव दिंडोरी तालूक्यात असून ते पक्क्या डांबरी सडकेने दिंडोरीला जोडलेले आहे. गोगूळ हे सुरगाणा तालुक्यातील डांगराळे भागातील गाव आहे.
अर्थशास्त्रातल्या अनेक व तांत्रिक संकल्पनांचा अर्थ सांगून त्यांचे मानवी जीवनाशी साधर्म्य व जीवनातील त्यांची उपयुक्तता त्यांनी उलगडली.
मध्यरात्री दोन वाजता केलेल्या या कारवाईत शहरातील हाय प्रोफाइल घरातील तरुण-तरुणींना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली.
30 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दीक्षांत सोहळा आटोपून राज्य शासनाच्या सेवेत पोलिस उपनिरीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत.
नाशिक शहरातील राणाप्रताप चौक, उत्तमनगर, पवननगर, त्रिमुर्ती चौक, सिडको, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड, रविवार कांरजा या भागातील गर्दीच्या ठिकाणांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेले निर्बंधाचे आदेश व्यवसाय व गर्दी नियंत्रण यात समन्वय साधणारे असल्यामुळे त्याची कठोर अंमलबजावणी करावी
६० वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ या वयोगटातील व्याधी असलेल्या नागरिकांना ही लस मोफत देण्यात येत आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळात नागरिकांनी आधार कार्ड घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
भूमिपूजन झालेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाची सात मजली इमारत ही शहराच्या मध्यवर्ती भागात साकारणार आहे. या इमारतीची क्षमता 310 विद्यार्थ्यांची आहे.
महसूल विभागाच्या ई फेरफार प्रकल्पातील सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी सामान्य नागरिकाला सोप जावे म्हणून महाभूमी हे https://mahabhumi.gov.in संकेतस्थळ विकसित करण्यात आले.
उद्या भाजप पक्ष सत्तेतून बाहेर पडला, तर आज ते आता ज्या आंदोलनाला विरोध करीत आहेत, तीच आंदोलने त्यांना त्या वेळी करावी लागतील. हा देश लोकशाहीप्रधान आहे.
भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची माहिती दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून विभागीय स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दृष्टिबाधित व दिव्यांगांना आत्मविश्वासाने जगण्याचे शिक्षण देणाऱ्या सर्व प्रशिक्षकांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग व दृष्टिबाधित मुलींनी रोप मल्लखांबाचे दाखवलेले प्रात्यक्षिक सर्वांना प्रेरणा देणारे आहे.
महोत्सवांमध्ये नाशिक जिल्ह्यात ग्रेप हार्वेस्टींग महोत्सव, नांदूर मधमेश्वर महोत्सव, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा भागात काजवे महोत्सव तसेच धुळे जिल्ह्यात लळींग किल्ला महोत्सवाचा समावेश आहे.
बाहेरून येणाऱ्या प्रतिनिधीची निवास, अल्पपोहर, भोजन इत्यादी व्यवस्था संयोजन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.
पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने कार्बन फूटप्रिंट बँकची संकल्पना राज्यपालांना आवडली व नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे कौतुक केले.
राज्यातील सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शासन व प्रशासनातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आपले प्रजासत्ताक अधिक मजबूत करावे.
संपूर्ण निवडणूक यंत्रणेच्या सहभागातून जगातील सर्वात मोठी व प्रगल्भ अशी लोकशाही निर्माण झाली आहे.
आजपर्यंत बेळगाव-नाशिक या मार्गावर थेट विमानसेवा / ट्रेनची उपलब्धता नसल्याने बेळगाव-नाशिक थेट हवाई सेवा सुरु करण्यासाठी अनेक अर्ज प्राप्त झाले होते.
महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली होती. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
नाशिक येथे प्रस्तावित पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी आणि त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
प्रादेशिक परिवहन विभागामार्फत तयार करण्यात आलेली रस्ता सुरक्षा मार्गदर्शिक पुस्तिका सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असल्याने ही पुस्तिका सर्वांपर्यंत पोहचविण्यात यावी.
बैठकीपूर्वी श्री देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रांगणातील विविध भागांना भेट देऊन त्याबद्दल माहिती घेतली.
नाशिक विभागातील 40 केद्रांवर लसीकरणाची सर्व तयारी झाली असून लसीकरण मोहिमेची सुरवात झाली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनारुग्णांची कमी होतांना दिसत असून रुग्णसंख्या पंधराशे पेक्षा खाली आलेली आहे. जिल्ह्यातील मृत्युचे प्रमाण देखील कमी आहे.
डॉ. अनिल अवचट यांना संधी दिल्यास साहित्य संमेलनाचा मान उंचावेल आणि संमेलन लोकाभिमुख होईल.
सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, पुणे या कंपनीची ‘कोविड शिल्ड’ लसीचे 9 लाख 36 हजार 50 डोसेजेस राज्यासाठी प्राप्त झाले असून त्यापैकी नाशिक जिल्ह्यासाठी 43 हजार 440 डोसेजेस आज प्राप्त झाले आहेत.
लसीकरण केंद्रांवर आवश्यक तापमान निश्चित करून व्हॅक्सीन व्हॅनच्या सहाय्याने आज प्राप्त झालेल्या लसी वेळेत पोहचविण्यात येणार आहेत.
पुणे आणि नाशिक दोन्ही जिल्हे कृषी क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रात समृद्ध आणि पुढारलेले जिल्हे आहेत.
२०१४ला ते नसतानाही सत्ता आलीच होती. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक पक्षात, पक्षविस्तार होतच असतं,' असं म्हणत पक्षांतर केलेल्या नेत्याबाबत फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
विवेकानंद केंद्राच्या रामवाडी येथील मुख्यालयात कार्यकर्त्यांनी सकाळी १०८ सामूहिक सुर्यनमस्कार करून "योग साधनेचा यज्ञ" करत विवेकानंदांना अभिनव पध्दतीने अभिवादन करण्यात आले.
१९९१ सालापासून जनस्थान पुरस्कार दिला जात आहे. येत्या १० मार्चला नाशिकला मधु मंगेश कर्णिक यांना पुरस्कार दिला जाणार आहे. एक लाख रूपये, सन्मानचिन्ह, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूपआहे. .
एम्प्लॉयर लॉग इनमध्ये युजर आय डी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ईआर रिपोर्ट मधील ई - आर या ऑप्शनवर क्लीक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
महोत्सवासाठी पेंढारकर व फाळके कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. याच महोत्सवातून प्रेरणा घेऊन फाळके व पेंढारकर कुटुंबीय एकत्रित येऊन एक कलाविषयक उपक्रम वर्षभर राबविणार असल्याची घोषणा "कलातीर्थ"च्या व्यासपीठावरून करण्यात आली.
नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मधल्या काळात थोडी फाटाफूट झाली होती. इकडे तिकडे झालं होतं.
संस्था बंद करून ती चेन्नई किंवा अन्य ठिकाणच्या शाखेत वर्ग करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.
लसीकरणाच्या पहिल्या फेरीत जिल्ह्यातील एकूण 18 हजार 135 शासकीय व 12 हजार 480 खाजगी संस्थामधील आरोग्य कर्मचारी यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले.
भाजपा नाशिक महानगर कायदा आघाडी कार्यकारिणी शहराध्यक्ष गिरीष पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, कायदा आघाडी संयोजक ॲड.श्याम घरोटे यांनी जाहीर केली.
राज्यात आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा आणि वसतिगृहे असलेल्या जमिनी काही प्रमाणात भाडेपट्ट्यावर आहेत
नाशिक बोट क्लब सुरू झाला हा उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून बोटींबाबत विशेष दक्षता घ्या.
कोरोनातून जे रुग्ण बरे झाले आहेत त्या रूग्णांमध्ये वेगवेगळे आजार आढळून येत असल्याने त्यांच्या उपचारासाठी शहरी व ग्रामीण भागात पोस्ट कोविड सेंटरची व्यवस्था करण्यात यावी.
कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक जानेवारीपासून कांद्याची निर्यात खुली करण्याचे आदेश जारी केले.
शेअर बाजारात आज दिवसभर अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासीम, श्री सिमेंट, बजाज फायनान्स आणि आयशर मोटर्स या कंपन्यांच्या समभागात तेजी दिसून आली.
मराठी माध्यमातून गणित लेखन करण्याचा त्यांना आनंद होता. गणित अभ्यासाची व शिकवण्याची आवड होती
जिल्ह्यात दररोज प्राण्यांबाबत काही प्रमाणात घटना घडत असतात, या घटनांमध्ये अनेक वेळा निष्पाप प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असतो.
आगामी काळात भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक मंडळी प्रवेश करणार आहेत. सत्ताधारी पक्षांतील अस्वस्थता लक्षात आल्यानेच या पक्षांचे नेते भाजपा आमदार फुटणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत.
आदिती तटकरे यांनी ग्रेप पार्क रिसोर्टची पाहणी करून गंगापूर येथील बोट क्लब प्रकल्पास देखील भेट दिली. तसेच राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी बोटींगचे पहिले तिकीट काढून बोटींग पर्यटनाच्या पहिल्या मानकरी ठरल्या.
पीक पद्धतीतील बदलांमुळे राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका आणि बाजरीचे उत्पादन घेतले आहे. खरीप हंगाम २०२०-२१ साठी केंद्र शासनाने ४ लाख ४ हजार ९०५ क्विंटल मका खरेदीस महाराष्ट्राला मान्यता दिली आहे.
पालकमंत्री, कृषिमंत्री, जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी तसेच शासकीय यंत्रणेच्या सर्व विभागांच्या समन्वयातून कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यास यश मिळाले आहे.
नवीन लोकसंख्या विचारात घेऊन जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी आरक्षणनिश्चितीच्या संदर्भात शासनास उपाययोजना सुचविणार आहे.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि इषा झा या दोघांविरोधात पुण्यात खूनाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. शहरातील चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
एकाच वेळी नाशिकचे चार तरुण लष्करात अधिकारी बनल्यामुळे नाशिकच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच अशा प्रकारची ऐतिहासिक घटना नोंदविली गेली आहे.
भारतातील युनिसेफ इंडिया आणि DFC India यांनी भारत सरकार निती आयोग यांच्या मार्फत इस्पॅलियर स्कूलचा रेडिओ इस्पॅलियर प्रोजेक्टची नियुक्ती केली.
नाशिक जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दीष्टांपैकी जमीन महसुलीचे उद्दीष्टे 28.48 टक्के तर गौण खनिजाचे 38.65 टक्के इतके पूर्ण झाले आहे. उर्वरीत उद्दीष्ट्ये पूर्ण करण्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून महसूल वसुलीचे उद्दीष्ट्ये पूर्ण करावे.
खा. शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल कार्यक्रम स्थळी नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांच्या गरजा व मागणी विचारात घेवून पाणी आवर्तनांचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
खा. ऊदयनराजे भोसले, खा. संभाजी राजे भोसले, शहाजी राजे भोसले (जिंतीकर) आदींनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
या राज्यस्तरीय रक्तदान शिबिरात तब्बल ५०० रक्ताचे युनिट ज्या ११ ठिकाणी रक्तदान शिबीर संपन्न झाले. पुढच्या वेळी हा आकडा आपण १००० च्या वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू असा मानस समता सैनिक दलामार्फत व्यक्त करण्यात आला.
कोरोनाबाधितांची संख्या सप्टेंबर महिन्यापर्यंत काही प्रमाणात कमी झाली होती. परंतू दसरा, दिवाळी या सणानंतर दररोज साधारण 80 ते 100 ने रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे पहिली लाट संपलेली नाही.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील शालीमार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी विनम्र अभिवादन केले.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक व इतर विविध क्षेत्रात अतुलनीय मौलिक कार्य करून बाबासाहेबांनी आपले खरे राष्ट्रप्रेम दाखवून दिले.
लोकशाही आघाडी सिद्धान्त दिवाळी विशेषांकाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नक्षलीविरोधी मोहिमेवरून परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला.
लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना सरसकट वीज बीलं देण्यात आली आहेत. या वाढीव बिलांच्या विरोधात आता मनसे सामान्यांच्या सोबतीने रस्त्यावर उतरली आहे. राज्य सरकारने सामान्यांना वीज बिलामध्ये सूट द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या या ७ वर्षीय रुग्णाची एक लहान बहीण होती, जीची स्टेम पेशी जन्माच्या वेळी साठवली गेली होती (कॉर्डच्या रूपात) ती १००% जुळली जाईल आणि भविष्यात त्या रूग्णासाठी वापरता येईल या आशेने...
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रमुख अधिकारी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना, वृत्तपत्रांचे संपादक यांच्याशी माझी पालकमंत्री या नात्याने साधक-बाधक चर्चा झाली आहे.
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत अनेक निकष ठरविण्यात आलेले आहेत. ज्या जिल्ह्यांनी सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा २० जिल्ह्यांना आज राष्ट्रीय पुरस्काने सन्मानित करण्यात आले.
जीवनातील आनंद, यश, सकारात्मकतावाढवणारे रंग-चित्रमय पार्श्वभूमी असणारे कॉफी टेबल बुकच्या स्वरुपातील हे पुस्तक ग्रंथालीतर्फे प्रकाशित करण्यात आले.
नाशिकमध्ये हि दिवाळीच्या खरेदी करिता सर्व नागरिक घराबाहेर पडताना योग्य काळजी घेताना दिसत नाही. खरेदी करिता प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोना विषाणू पुन्हा आपले डोके वर काढू पाहत आहे.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९४.९४, टक्के, नाशिक शहरात ९५.३७ टक्के, मालेगाव मध्ये ९३.०६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.७९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.१३ इतके आहे.
कोरोना काळात महसूल विभागाचा उत्पन्नाच्या कामांवर परिणाम झाला होता. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून सर्व महसूल अधिकाऱ्यांनी महसुलाच्या वसुलीवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.
आता दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून आपण आता त्याचा सामना करण्याची भूमिका स्वीकारली आहे. या संकटात केंद्र सरकार, राज्य शासन यांनी जे ठरवले, लोकांनीही त्याचे अनुकरण केले.
यावेळी प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
नाशिक दि.31: संपूर्ण जगा ला विश्वबंधुत्वाची शिकवण दिलेल्या स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे भारावलेपण घेऊन नाशिक च्या गणेश पांडुरंग लोहार यांनी पुत्र अथर्व व वेदान्तसह तब्बल साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.
डॉ.विनय ठकार यांनी नाशिक जिल्ह्यात अनेक आधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी वैद्यकीय व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.
तीन दिवसांपासून कांदा लिलाव ठप्प आहेत. लिलाव बंद असल्यानं शेतकऱ्यांचं मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली.
उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या अद्ययावत न्यूक्लिअर मेडिसीन विभागाची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली व त्यातील सेवा सुविधांची माहिती घेतली.
ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व कवीवर्य कुसुमाग्रज यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले.
वनांचा विस्तार आणि संरक्षणासाठीही त्यांनी मोठे काम केले होते. त्यामुळे कुसुमाग्रजांनी त्यांना वनाधिपती ही उपाधी दिली होती.
महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी माजी मंत्री प्रशांतदादा हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत "आजची प्रसारमाध्यमे आणि समाज" या विषयावर व्याख्यान झाले.
भारतीय अन्न महामंडळाने स्वतःकडे १०.९४ लाख मेट्रिक टन गहू आणि ४.८९ लाख मेट्रिक टन तांदूळ याचा अतिरिक्त साठा करून ठेवला आहे.
केंद्र सरकारमार्फत कोरोनाच्या कालावधीत सर्वच राज्यांना अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा करण्यात येत आहे. आणि सद्यस्थितीत लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी नागरिकांनी कोरोनाच्या सर्वनियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
नाशिक रोड येथील इंदिरा गांधी चौक , नारायण बापू नगरात सेवा प्राय: बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या धर्मार्थ दवाखान्याचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
सद्यस्थितीत ७ हजार ६१७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १ हजार ५५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाउंडेशनतर्फे ग्लोबल हॉस्पिटलचे मंगळवारी जामनेर येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
वेब चर्चासत्रात कोरोनाच्या संकट काळानंतर जाहिरात व्यवसाय, वृत्तपत्रे, व्यवस्थापन, एजन्सीज्, व्यवसायातील अडचणी, भवितव्य, विविध योजना आदी विषयांवर चर्चा व मंथन करण्यात आले.
राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत महिलांची मानसिक कोंडी व छळ होत असल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने वाढल्या आहेत.
भाजपाच्या सत्तेत कृषीमंत्री होतात मग शेतकर्यांना काय दिलात याचे आत्मपरीक्षण करावे आणि नंतर लोकनेत्यावर बोलण्याचे धाडस करावे अशा शब्दात महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षाच्या पूनर्विनियोजनातून २८ कोटी ३५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गर्दी न करता आपापल्या विभागात कोरोनाबाबत आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम तसेच जनजागृतीपर उपक्रम राबवावे असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले आहे.
कोरोनाशी दोन हात करत असतानाच अन्य विषयांकडे देखील लक्ष पुरवून जिल्हा केरोसीन मुक्त झालेला आहे ही बाब अत्यंत समाधानकारक असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले आहे.
नाशिक जिल्ह्याला 25 मेट्रिक टन ऑक्सिजन म्हणजे 4 हजार सिलेंडर दररोज लागणार असून विल्होळी येथील ऑक्सिजन प्लँटद्वारे 2 हजार ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यात येणार आहे.
कोरोनाकाळातील प्रलंबित असणाऱ्या कामांना गती देवून कामे वेळेत पूर्ण करण्याबाबतच्या सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मुंबई केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर नाशिक बिटको रुग्णालयामध्ये सर्व आजारांचे निदान होईल अशा सुविधा निर्माण करण्यात येऊन सर्व आजारांवर एकाच छताखाली रुग्णांना उपचार कसे मिळतील या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे.
१ हजार ५१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील ७४ हजार ११२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ८ हजार ७६० रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये २१९ ने घट झाली आहे.
ट्रु केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे 100 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. ट्रु केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये कोरोनाच्या उपचारांबरोबरचं इतरही आजरांवर उपचार केले जाणार असल्याने स्थानिक नागरिकांना या लाभ होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील अनेक पर्यटन ठिकाणांमध्ये विवेदा द वेलनेस व्हिलेज या ठिकाणाची भर पडली आहे. या प्रकल्पाच्या बांधकामात नैसर्गिक साधनांचा वापर करण्यात आल्याने येथे सकारात्मक ऊर्जा जाणवते.
नाशिक स्थित भारतीय बनावटीची विमाने बनविणाऱ्या "हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड " या कंपनीमधील एक कर्मचारी दीपक शिरसाटकडे ५ सिमकार्ड आणि ३ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
ऑनलाईन अर्ज करताना शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, खाते उतारा, मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखला अपलोड करणे आवश्यक आहे.
महामंडळातर्फे असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार इतर मागासवर्ग प्रवर्गातील तसेच तो नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असावा. त्याची वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे असावी
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमासह इतरही केसेस ज्या जिल्ह्यात प्रलंबित असतील त्यांनी येत्या 15 दिवसात त्या केसेस निकाली काढाव्यात.
मुंबई विद्यापीठाने पोलिसांकडे तक्रार केली असून अनेक तज्ञ मंडळी याचा शोध घेऊन मुळापर्यंत जाणार आहेत अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली़.
योजनेच्या नोडल अधिकारी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रदेशिक अधिकारी अमर दुरगुळे यांची नेमणूक जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी केली.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग ग्रामीण भागातील मुलांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचवण्यासाठी कंबर कसून प्रयत्न करीत आहे.
बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी असणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रश्न कसा सोडवतात, हे पाहणे महत्वाचे आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत व राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे विविध श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
शासकीय शुल्क हे फक्त कोविड उपचारासाठी आहेत परंतु पेशंटला इतर आजारांवरही उपचार करावे लागतात.
नाशिक शहरातील खासगी कोविड रुग्णालयांवर नाशिक महापालिकेने स्वतंत्रपणे ऑडिटर नेमले आहेत. अवाजवी फी आकारू नये म्हणून शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणेच फी आकारावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.
उत्पादित होणाऱ्या मालाला देश-विदेशात बाजारपेठ मिळावी, येथील मालाची जलदगतीने आयात-निर्यात व्हावी यासाठी जालना, वर्धा, नाशिक तसेच सांगली येथे ड्रायपोर्ट विकसित केले जात आहे.
सामाजिक आरक्षणाविषयी आजपर्यंत घडलेल्या घडामोडींचा उहापोह करतांना मंडल आयोगाने केलेली मराठा समाज पुढारलेला आहे ही शिफारस धादांत खोटी आणि वस्तुस्थिती नाकारणारी असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले.
गणपती उत्सव साजरा करण्याबाबत जसे परिपत्रक शासनाने काढले होते त्याचप्रमाणे या सणाबाबत देखील लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येईल.
या बैठकीत झालेल्या चर्चेत आमदार माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, नितीन पवार, सरोज आहेर, डॉ. राहुल आहेर यांनी सहभाग घेतला.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांच्या सर्वेक्षण व मान्यतांचा महिन्यातून एकदा आढावा मंत्रालय स्तरावर घेण्यात येतो.
नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पांची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्राधान्याने ते पूर्ण करा जेणेकरून त्याचा फायदा मराठवाड्याला देखील होईल. यामध्ये मांजरपाडा सह प्रवाही वळण योजनांसाठी प्राधान्य देण्यात यावे
मुक्त विद्यापीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू होते. परंतु मधल्या कालखंडात युजीसी ने त्यांना तांत्रिक कारणास्तव सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली नाही.
राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नाशिक जिल्ह्यांच्या ती एक चिंतेची बाब झाली आहे.
यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी खासदार शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतून आजच्या २५ वर्षांपूर्वी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
दक्षता पथकामार्फत या दुकानाची अन्नधान्याच्या दर्जाबाबतची तसेच इतर बाबींची संपूर्ण तपासणी केली
कोरोनाकाळात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये,यासाठी ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरु करण्यात आली. ग्रामीण भागात व आदिवासी भागात नेटवर्कची समस्या असल्याने तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ पुरेशा प्रमाणात घेता येत नाही.
सुप्रीम कोर्टाने मोठ्या घटनापीठाकडे जाण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र ती देताना अनपेक्षितपणे नोकरी आणि शिक्षणात कायद्याच्या अमलबजावणीला स्थगिती दिली असून एक संभ्रम निर्माण झाला आहे.
नाशिक ग्रामीण ३२५, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ६०८ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १३२ व जिल्हा बाहेरील २६ अशा एकूण १०९१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
कोरोनाचे संकट वाढत असताना पुनश्च हरिओम म्हणत जनतेचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
जिल्ह्यात विविध हॉस्पिटलमधील बेडसची उपलब्धता नागरिकांना कळावी यासाठी सुरु करण्यात आलेल्या covidbed.ilovenagar.com या पोर्टलचेही त्यांनी कौतुक केले.
एम.आय.डी.सी. सातपूर, नाशिक येथील 1973 मध्ये बांधण्यात आलेल्या इमारतीचे अशासकीय संस्थेद्वारे संरचनात्मक लेखापरिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) केले असता ही इमारत धोकादायक असल्याचे सांगितले आहे.
नाशिकमध्ये कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लिक्विड ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.
भाजपा सातपूर मंडलाची कार्यकारिणी मंडलाचे अध्यक्ष अमोल इघे यांनी जाहिर केली.
विश्वास नांगरेंच्या जागी नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती संकलित करणाऱ्या कार्यकर्त्यांनी फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे घातले होते.
विभागीय आयुक्त कार्यालयातील समितीदालनात विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नवनिर्वाचित विभागीय आयुक्त श्री. गमे बोलत होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २९ हजार ४२१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ७ हजार ०९३ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ८७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
आंदोलन नाशिक महानगरातील शहरातील प्रमुख मंदिरासमोर, जैन मंदिर, गुरुव्दारा व बैध्द स्मारक परिसरात हे आंदोलन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश व भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
बोराडे यांच्या निधनाने नाशिकरोड, जेलरोड भागात शोककळा पसरली आहे.
नाशिक शहरात ८४.४३ टक्के, मालेगाव मध्ये ६६.४४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.९५ टक्के आहे.
आज जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या माहितीनुसार ७०८ जण बरे होऊन घरी गेले आहे. तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून राधाकृष्ण गमे ५ डिसेंबर २०१८ ला रूजू झाले होते. त्यानंतर त्यांचे नाशिक शहराला स्मार्ट बनविण्यात मोलाचे योगदान आहे.
नियुक्तीबददल भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री आ.गिरीश महाजन यांनी अभिनंदन केले आहे.
२२ मार्चपासून ते आजपर्यंत १९ हजार ३२ जणांवर मास्क वापरला नाही म्हणून कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात जिल्हा रुग्णालय प्रशासनाने जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँक कक्षेत प्लाझ्मा निमिर्तीला सुरुवात केली होती.
शहारातील झोपडपट्टी भागातील बाधित रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.
आजपर्यंत जिल्ह्यात २९ हजार ३३५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
पावसाची संततधार कायम असल्याने गंगापूर धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढत असून धरणात ९३.३३ टक्के जलसाठा आहे.
चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण तर पाचोरा-भडगावचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.
कोर्ससाठी पात्रता इयत्ता आठवी पास, तर मोटार अँड आमेंचर रिवायडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज या कोर्ससाठी पात्रता इयत्ता 9 वी पास आहे.
स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईसह इतर शहरांमध्ये नाशिक ११, ठाणे १४, पुणे १५ यांचा समावेश आहे.
इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी ३० जागा आहेत.
सिक्कीम या संपूर्ण राज्यामध्ये केवळ सेंद्रिय शेती केली जाते. पूर्णतः सेंद्रिय शेती करणारे हे जगातले पहिले राज्य आहे.
Ban on the manufacture, sale and use of plastic national flags
Prohibition order issued for Godavari pollution
Distribution of crop loan of 1 thousand 362 crore to 52 thousand 132 farmers in Nashik district
२०१६ ते आजपर्यंत ३ हजार ७५६ गुन्ह्यांची नोंदीनुसार ८२ हजार ५०० रूपयांचा दंड वसुल; उपायुक्त रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली गोदावरी प्रदुषण नियंत्रण समितीची ऑनलाईन बैठक
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १५ हजार २८१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला
राज्यात आज ६७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ५८ हजार ४२१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.३३ टक्के एवढे झाले आहे.
कोविड रूग्णांची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे.
नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदी अंबादास खैरे यांची फेरनिवड करण्यात आली
दरवर्षी जागतिक आदिवासी गौरव दिन आपण मोठ्या जल्लोषात खुल्या मैदानात साजरा करत असतो. परंतु कोरोनाचा वाढत प्रादूर्भाव लक्षात घेता आपण हा दिवस ऑनलाईन पध्दतीने साजरा करतोय.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे वसंतस्मृती कार्यालयात आदिवासी बांधवांचे जननायक बिरसा मुंडा यांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेस सुरेश खेताडे, प्रा.परशराम वाघेरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
आदिवासी उपयोजना क्षेत्रात 49.18 लक्ष क्विंटल धान रु. 1 हजार 815 या किमान आधारभूत किमतीने केंद्र शासनाच्या दराने खरेदी करण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १४ हजार १६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला
तळागाळातील नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना योग्य न्याय द्या, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता स्वाब घेतल्यानंतर अहवाल तत्काळ प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यामध्ये प्रयोगशाळा अधिक वाढवणे विचाराधीन होते.
नाशिक जिल्हा हा कृषी साठी अत्यंत महत्वाचा जिल्हा असून देशातील पहिली रेल्वे नाशिक मधून सुरू होत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १२ हजार ८१२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
‘पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार -अजित पवार मुंबई दि. ४ अॉगस्ट - कोरोना’चे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने पुणे - नाशिक हा रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करु असा विश्वास व्यक्त करतानाच या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
विशेष बातमी जन्मतः नेत्रहीन असलेल्या स्वातीने दहावीला मिळवले 82% गुण नाशिक दि.2आॅगस्ट 2020 :- यंदाचे इयत्ता दहावीचे निकालात विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम गुणवत्ता प्राप्त केली आहे. नाशिक येथील मातोश्री रामप्यारी बाई सारडा कन्या विद्यामंदिर ची विद्यार्थिनी कुमारी स्वाती गजानन जाधव हिने इयत्ता दहावीला 82% गुण मिळवले आहेत. कु. स्वाती ही जन्मतः दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. खूप मोठे होण्याची जिद्द असलेली स्वाती त्यासाठी मन लावून अभ्यास करते, नियमित शाळेत जाते तसेच ती छानपैकी गाणे ही म्हणते. शरीराच्या अडचणींवर मात करून स्वाती जास्तीत जास्त आत्मनिर्भर राहते. स्वातीची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तिला उच्च शिक्षण घेण्याची जिद्द आहे. त्यासाठी तिला मार्गदर्शन व आर्थिक मदत मिळण्यास महत्वपूर्ण ठरणार आहे. शुक्ल यजुर्वेदीय मध्यंदिन ब्राह्मण संस्थेने तिचे अभिनंदन केले आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक, दि.२ ऑगस्ट २०२० (जिमाका वृत्त ) जिल्ह्यातील तालुकास्तरावर बेडची संख्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असून प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी ऑक्सिजन सेंटर निर्मिती करण्यात यावी व मुबलक ऑक्सिजन बेडची उपलब्ध करून देणेयात यावेत, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
खाजगी गुंतवणुकीतून देणार भावली धरण परिसरातील पर्यटनाला चालना : जलसंपदा मंत्री जयंत पाटील
नागरिकांनी नियमांचे पालन केले तरच कोरोनाला अटकाव शक्य; रुग्णांची संख्या आटोक्यात राहण्यासाठी कोमॉर्बीड रुग्णांची नियमित तपासणी सुरू ठेवावी - छगन भुजबळ
मुंबई विभागीय टीमने इगतपुरी येथे एका प्रवासी महिलेला मध्यरात्री प्रसूती साठी केली मदत नाशिक,दि.26जुलै 2020:कोविड १९ संकटात, गर्भवती महिलांसह अनेक गरजू रूग्णांच्या जीवनात रेल्वे सक्रिय भूमिका बजावत आहे. दि. २६.७.२०२० रोजी रात्री ३.१५ सुमारास ०१०९३ मुंबई-वाराणसी विशेष ट्रेन इगतपुरीला येणार होती तेव्हा प्रवास करणार्या व प्रसवपीडा होणा-या प्रियांका नावाच्या गर्भवती महिलेला मदत करण्यासाठी इगतपुरीचे उप स्टेशन मॅनेजर श्री अवधेश कुमार यांनी तातडीने मदतीसाठी इगतपुरी येथील रेल्वे आरोग्य केंद्राला माहिती दिली.
खाजगी गुंतवणुकीतून देणार भावली धरण परिसरातील पर्यटनाला चालना : जलसंपदा मंत्री जयंत पाटील नाशिक, दि. 25 जुलै 2020 (जिमाका वृत्तसेवा): संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात संसर्ग बाधितांची संख्या देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत खाजगी गुंतवणुकीतून भावली धरण परिसरात पर्यटनाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका येथे दौऱ्यावर आले होते
वैतरणा धरणाची अतिरिक्त जमीन मुळ मालकांना परत देण्यासाठी शाश्वत प्रयत्न करणार :जलसंपदा मंत्री जयंत पाटील
वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होवू देणार नाही - जयंत पाटील थेट वैतरणा धरणावर जाऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली शेतकऱ्यांशी चर्चा...
*एचएएल हॉस्पिटल मध्ये कोरोनाचा शिरकाव *5 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण *तरटाऊनशिप मध्ये 2 रुग्ण
अल्पसंख्याक विभागाच्या अनुदान योजनांसाठी मुदतवाढ देण्यात आली असून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांनी केले आहे.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन, नाशिक शहर पोलिस आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कवायत मैदान येथे एकता दौडचे आयोजन करण्यात आले.
नाशिक पूर्व मधून माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी हातातून घड्याळ काढत शिवबंधन बांधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
नाशिक-पुणे महामार्गावरील दत्तमंदिर चौकात उभ्या असलेल्या एका कारची पुढील काच फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 3 लाख 80 हजाराची रोकड लंपास केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी उपनगर पोलीसांत अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमाच्या वतीने शुक्रवारी 'राष्ट्रीय आयुर्वेद दिन'साजरा केला गेला. आरोग्याची देवता श्री धन्वंतरी यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी आयुर्वेद दिन साजरा केला जातो. यंदा'दीर्घायुष्यासाठी आयुर्वेद ही संकल्पना राबवली जात आहे.
लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित रांगोळी स्पर्धेतून स्पर्धकांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रदूषणविरहीत दिवाळी साजरी करण्याचा मानस रांगोळीतून व्यक्त केला.
विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील अनेक विदयमान आणि वर्षानुवर्ष सत्ता राखलेल्यांना नाशिककरांनी घरचा रस्ता दाखवला आहे. तर काही आमदारांना आपल्या जागा राखण्यात यश आले आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हयात 2 जागा वाढल्या आहेत, तर मालेगावमध्ये एमआयएमचा प्रवेश झाला आहे.
शेतकरी संघटना आणि नंतर स्वाभीमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून स्वत:चा रयत क्रांती संघटना स्थापन करणाऱ्या आणि विदयमान सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री असलेल्या सदाभाऊ खोतांच्या पक्षाने विधानसभेत पहिल्याच खेपेला आपले खाते उघडले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 5 पर्यंत सरासरी 54.53 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक आयोगाच्या ॲपवर देण्यात आली आहे. पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पहिल्या दोन तासांत अवघे दीड ते दोन टक्के मतदान झाले होते
नाशिक, ता. 21 : नाशिकमध्ये आज 100 वर्षांच्या आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला. सखुबाई नामदेव चुंबळे असे त्यांचे नाव आहे. 1960 पासून ते आजपर्यंत 14 विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नाशिकव्यतिरिक्त राज्यातील अनेक भागांत मतदानाचा उत्साह दिसून आला. ज्येष्ठ, अपंगांनी आवर्जून मतदानात भाग घेतला.
राज्यात सगळीकडे निवडणुकांची धामधूम सुरू असून येत्या २१ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करून येणाऱ्या नागरिकास दाढी कटिंग मध्ये ५०% सूट दिली जाणार आहे.
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना नाशिक शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. परिणामी शेवटच्या काही शिल्लक तासांच्या प्रचारावर पावसाचे सावट पडण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिकचे पोलिस निरीक्षक आणि नाशिक पश्चिम जिल्ह्याचे निवडणूक अधिकाऱ्याची बदली केली
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता नाशिक शहरातील जय गुरुदत्त लॉन्स, औरंगाबाद रोड येथे सत्संग आणि गृहदेवता पूजन, पालखी मिरवणूक आदी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्या भटके विमुक्त संघटनेचे माजी अध्यक्ष व शहर कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस प्रकाश महादू जाधव यांची नुकतीच राजेश पायलट किसान संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी रामकेश गुज्जर यांनी प्रदेश अध्यक्ष राजकुमार यांच्या सुचनेनुसार करण्यात आली.जाधव यांनी आगामी काळात शेतकरी कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढून न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संकल्प केला.
नाशिक महानगर पालिकेतर्फे पंचवटीत अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविण्यात आली. शहरात सर्व ठिकाणी ही मोहीम सुरु राहणार असल्याचे मनपाने कळविले आहे.
आजच्या विद्यार्थ्यांसाठी समर्थांचे विचार पोषक वातावरणनिर्मिती करण्यात मोलाची भूमिका पार पाडू शकतात. त्यांच्या विचारांची जोड विद्यार्थी आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास करण्यास लागल्यास आयुष्य यशस्वी बनू शकते असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या डॉ विनिता परांजपे यांनी केले.
नाशिक -34 मराठा फ्रेंड रेजिमेंट नाशिक येथे सद्या कार्यरत असलेले किल्लेधारूर तालुक्यातील धुनकवाड गावचे रहिवाशी नाथा छत्रगुण यादव यांचं शनिवारी रात्री नाशिकला ड्युटीवर जाताना संगमनेर ते नाशिक महामार्गावर अपघाती निधन झाल्याने गाव व पंचक्रोशीत शोककळा पसरली.
आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या रसायनविरहीत विषमुक्त भाज्यांची ओळख शहरातील नागरिकांना व्हावी म्हणून सोशल नेटवर्कींग फोरमच्या वतीने नाशिक येथील कुसूमाग्रज प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ खा. डॉ अमोल कोल्हे दोन दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर नाशिक,दि.१० ऑक्टोबर:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार दि.११ व शनिवार दि.१२ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेणार आहे. तसेच रॅली व रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटी गाठी घेणार आहे. शुक्रवार दि ११ ऑक्टोबर रोजी डॉ. अमोल कोल्हे यांची आमदार दीपिका चव्हाण यांच्या प्रचारार्थ सकाळी ११ वाजता नामपूर ता. बागलाण येथे सभा होणार आहे.
सेना विमानन कोरला ‘राष्ट्रपती निशाण’ प्रदान नाशिक, दि. 10 : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते भारतीय सेना विमानन कोरला प्रतिष्ठेचे समजले जाणारे सन्मानाचे ‘राष्ट्रपती निशाण’ प्रदान करण्यात आले. भारतीय सेना विमानन कोरच्या सैनिकांनी राष्ट्राची प्रतिष्ठा आणि गौरव वाढविण्यात विशेष योगदान दिल्याचे गौरवोद्गार यावेळी राष्ट्रपतींनी काढले.
गेली ५ वर्षे सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारने कांद्याची निर्यात बंदी करून “शेतकऱ्यांचे मरण हेच युती सरकारचे धोरण” असल्याचे सिद्ध केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केला आहे.
नाशिकरांनी २७ चित्रे व शिल्पे साकारतांना अनुभवली नाशिक : पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप व नाशिक आर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शंकराचार्य न्यास व संस्कार भारती नाशिक यांच्या विशेष सहकार्याने प्रख्यात भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ बुधवार, २ ऑक्टोबर रोजी एक दिवसीय प्रत्यक्ष व्यक्ती चित्र/ शिल्प स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते, सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून अनेक युवा चित्रकारांनी व शिल्पकारांनी सहभाग नोंदवला होता त्यातील निवडक २३ चित्रकार व ५ शिल्पकार यांचे प्रत्यक्ष व्यक्तीचित्र व शिल्प स्पर्धा कुर्तकोटी सभागृह , जुना गंगापूर नाका, नाशिक येथे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या कालावधीमध्ये मोठया उत्साहात संपन्न झाली, सदर स्पर्धा राष्ट्रीय पातळी ची असून त्याच्या अंतिम फेरी निवडी साठीची ही दुसरी फेरी स्पर्धकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आली होती,
माध्यम प्रतिनिधिनसाठी ब्रह्माकुमारी मुख्यालयात महासंमेलनाचे आयोजन : नाशिकचा उत्स्फूर्त सहभाग माउंट आबू/आबू रोड, येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या शांतिवन कॉम्प्लेक्स मध्ये अखिल भारतीय मीडिया संमेलना चे आयोजन दि. 20 ते 24 सप्टेंबर दरम्यान करण्यात आले. यात नाशिक येथून प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या विविध प्रसार माध्यम प्रतिनिधींनी सहभाग घेतला. '