All News

राज्यात २४ तासात १३ हजार १६५ नवीन कोरोना रुग्ण आढळले; ३४६ मृत्यू

राज्यात २४ तासात १३ हजार १६५ नवीन कोरोना रुग्ण आढळले; ३४६ मृत्यू

  • राज्यात ‘कोरोना’तून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या साडेचार लाखाच्या उंबरठ्यावर


मुंबई, दि.२० ऑगस्ट : राज्यात आज ९०११ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०९ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ४६ हजार ८८१ रुग्ण बरे झाले आहेत. आज १३ हजार १६५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६० हजार ४१३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले १३,१६५ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३४६ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११३२ (४६), ठाणे- २३७ (५), ठाणे मनपा-२४१ (९), नवी मुंबई मनपा-३५२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-३८६ (१२), उल्हासनगर मनपा-२० (३), भिवंडी निजामपूर मनपा-२६ (२), मीरा भाईंदर मनपा-१४० (३), पालघर-२३७(८), वसई-विरार मनपा-१८२ (६), रायगड-२७० (४), पनवेल मनपा-२२७ (३), नाशिक-२३१ (२), नाशिक मनपा-५२० (३), मालेगाव मनपा-२५ (१), अहमदनगर-२९६ (७),अहमदनगर मनपा-३०७ (६), धुळे-३० (२), धुळे मनपा-५८ (१), जळगाव-४९६ (८), जळगाव मनपा-१०९ (१), नंदूरबार-३८, पुणे- ६६० (२१), पुणे मनपा-१२३३ (३८), पिंपरी चिंचवड मनपा-७९५ (२७), सोलापूर-३९९ (१५), सोलापूर मनपा-६७ ,सातारा-२८६ (९), कोल्हापूर-३८७ (१३), कोल्हापूर मनपा-१४७ (२), सांगली-९६ (६), सांगली मिरज कुपवाड मनपा-२२३ (१२), सिंधुदूर्ग-१४ (२), रत्नागिरी-४३ , औरंगाबाद-१७८ (१),औरंगाबाद मनपा-३६८, जालना-१५०, हिंगोली-३५(१), परभणी-४८, परभणी मनपा-५६ (३), लातूर-५० (१), लातूर मनपा-८१(२), उस्मानाबाद-३०६ (६), बीड-२६३ (२), नांदेड-१०३ , नांदेड मनपा-८३, अकोला-४५ (१), अकोला मनपा-१५ (१), अमरावती-३०, अमरावती मनपा-८१, यवतमाळ-५८ (१०), बुलढाणा-७२, वाशिम-१३ , नागपूर-१८० (३), नागपूर मनपा-८१७ (२३), वर्धा-५९ (१), भंडारा-४३ (४), गोंदिया-३४ (१), चंद्रपूर-६१, चंद्रपूर मनपा-४, गडचिरोली-१३, इतर राज्य ९ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३३ लाख ३७ हजार ८४८ नमुन्यांपैकी ६ लाख २८ हजार ६४२ नमुने पॉझिटिव्ह (१८.८३ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ६२ हजार ४५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ०९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३४६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के एवढा आहे.

Advertisement

test2 Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd IBPS