नाशिक दि.31: संपूर्ण जगा ला विश्वबंधुत्वाची शिकवण दिलेल्या स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे भारावलेपण घेऊन नाशिक च्या गणेश पांडुरंग लोहार यांनी पुत्र अथर्व व वेदान्तसह तब्बल साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. भारतीय संस्कृती व योगाचे महत्व लोकांना समजून सांगण्यासाठी लोहार पिता पुत्रांनी ही सायकल मोहीम केली. वैयक्तिक आरोग्याबरोबर सामाजिक आरोग्य अबाधित ठेवणे ,
माझ्या जीवनाला आकार देणारे परमपूजनीय दादाजी,वैदिक परंपरा पुनर्जीवित करणारे श्रीमद आद्य शंकराचार्य, व भारतीय तत्वज्ञान जगासमोर आणणारे स्वामी विवेकानंद यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करण्याच्या भूमिकेतून ही मोहीम राबवण्यात आली.
गणेश पांडुरंग लोहार व त्यांची मुले अथर्व व वेदांत या तिघांनी नाशिकमधून १० ऑक्टोबर २०२० ला सकाळी ६ वाजेपासून सायकलिंगला सुरुवात केली. दररोज सरासरी १५० ते २०० कि.मी. चे सायकलीन्गचे टार्गेट होते. साधारणत: ३५०० कि.मी.चे अंतर २५ दिवसात पूर्ण करण्याचा मानस होता व त्यात त्यांनी यश मिळविले. नाशिक-मंचर-पुणे-सातारा-कागल-कित्तूर-हावेरी-चित्रदुर्ग-तुम्कुरू-होसूर-सालेम-अरावाकुरुची-मदुराई-तिरुनेलवेली-कन्याकुमारी-व्वायाकाल-कालडी-तीरुरांगडी-कान्नापुराम-उडुपी-मुर्धेश्वर-कित्तूर-कागल-सातारा-मंचर-नाशिक असा प्रवास पूर्ण करून आजच ते नाशिकमध्ये परत आले. हा सर्व अद्भूत अनुभव होता अशी भावना लोहार पिता पुत्रांनी लोकशाही आघाडीचे प्रतिनिधी प्रथमेश महाजन यांच्याशी बोलताना व्यक्त केली.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.