All News

ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण.. - संजय राऊत

ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण.. - संजय राऊत

पुणे, दि. ३१ ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिदू पुणे राहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो मुंबईत होता. अनेक काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण बाळासाहेबांमुळे मुंबईतून घडत होतं, बदलत होतं. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात आहेत," असं संजय राऊत यांनी म्हटलं. पुढे बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला होणाऱ्या वर्षपूर्तीनिमित्त भाष्य केलं.

 

राज्यातलं ठाकरे सरकार पडणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. हे सरकार पडेल असं दिल्लीतले लोकही सांगत नाहीत.  त्यामुळे आता राज्यातलं सरकार पुढील चार वर्षेही पूर्ण करेल याचा आम्हाला विश्वास आहे, असंही राऊत म्हणाले. राज्यात तीन पक्षाचं सरकार आलं. तेव्हा हे सरकार जास्त दिवस चालणार नाही, असं सांगितलं गेलं होतं. ठाकरे सरकार लवकर कोसळेल अशा पैजा लावल्या होत्या. पण पुढच्या महिन्यात आम्ही आता एक वर्ष पूर्ण करत आहोत, असा टोला राऊत यांनी विरोधकांना लगावला.

Advertisement

IBPS MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd