मुंबई, दि. ०३ नोव्हेंबर : केंद्र आणि राज्य सरकार मेट्रोच्या कारशेडवरून आमनेसामने आले असून, मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा मोदी सरकारने केल्यानंतर आता ठाकरे सरकारवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारचा लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे असा कारभार असल्याचा घणाघात भाजप आमदार आशिष शेलारांनी केला आहे.
आज केंद्राच्या पत्रानं एक गोष्टी स्पष्ट झाली आहे. अहंकारी प्रवृत्तीनं घेतलेल्या निर्णयामुळं मुंबईकरांना त्याच्या दुष्परिणामांचा सामाना करावा लागत आहे. मेट्रोच्या विकासात महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती आहे. पहिल्यांदा लटकवणे, अडकवणे, जागा ट्रान्सफर करताना ज्या पद्धतीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होती ती केलेली दिसत नाही. मीठागर आयुक्तांची परवानगी घेतलेली दिसत नाही. अडकवणे, जनतेला भटकवणे आणि चुकीची माहिती देऊन भ्रमित करणे असा त्यांनी निर्णय घेतला आहे.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.