मुंबई, दि. १९ ऑगस्ट : अनेक माध्यमातून सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी जोर धरत असतानाच सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आज सुनावणी झाली. त्यानुसार, सीबीआयने या घटनेचा तपास करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन, न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा निर्णय, या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्याच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे, असे म्हटले आहे.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.