मुंबई, दि. २१ ऑक्टोबर : भाजपचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे विधान गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होते. अखेर आज त्या विधानाला पुर्णविराम मिळाला आहे. एकनाथ खडसेंनी भाजपला राजीनामा दिला असून, ते शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे 40 वर्षांपासून काम पाहत आलो. जेव्हा भाजप खेड्यापाड्यात पोहोचली नव्हती. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक नेत्यांसोबत काम करत आलो. आतापर्यंत पक्षात काम करत असताना मला अनेक पदं मिळाली हे मी नाकारत नाही.' असं खडसे यांनी सांगितले.
मी आजपर्यंत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यावर व्यक्तीगत टीका केली नाही. विरोधीपक्ष नेता असल्यामुळे सरकारवर टीका केली होती, असंही खडसे म्हणाले.
भाजप पक्ष सोडण्याचे एकमेव कारण म्हणजे, देवेंद्र फडणवीस हेच आहे. त्यांच्यामुळे आपण पक्ष सोडत आहोत. ते जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर गोंधळ घातला होता. पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते, असा गौप्यस्फोट खडसेंनी केला.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.