दुबई, दि. १० ऑक्टोबर : कोलकाताच्या संघाने पंजाबला शेवटच्या चेंडूवर २ धावांनी पराभूत केले. कोलकताच्या संघाने विजयासाठी दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ २० षटकात १६२ धावांच करू शकला. के.एल. राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी १०० धावांची सलामी देऊनही पंजाबला पराभूत व्हावे लागले.
केकेआरला सुरुवातीच्या क्षणी विकेट मिळाले नसले तरी मोक्याच्या क्षणी गोलंदाजांनी कंबर कसली आणि कोलकाताने पंजाबवर धावांनी मात केली. या मॅचमध्ये कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण कोलकात्याची सुरुवात अत्यंत खराब झाली. १४ रनमध्येच त्यांचे दोन बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण पहिले शुभमन गिल ने ४७ बॉलमध्ये ५७ रन करुन कोलकात्याचा डाव सावरला, तर नंतर दिनेश कार्तिक ने आक्रमक खेळी केली. कार्तिकच्या २९ बॉलमध्ये केलेल्या ५८ रनमुळे कोलकात्याला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.