मुंबई, दि. २१ ऑक्टोबर : माझी नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मला खूप त्रास दिला गेला. मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडतोय, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजप सोडत असल्याची घोषणा केली. एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्ष सोडण्यामागची कारणं आणि आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावर आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला, हे दुर्दैवी आहे. त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. माझ्याबाबत तक्रारी असतील तर त्यांनी वरिष्ठांकडे जायला पाहिजे होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, एकनाथ खडसे अर्धसत्य सांगत आहेत. मला त्यावर बोलायचे नाही. अशा परिस्थितीत कुणाला तरी व्हिलन ठरवायचे आहे. त्यांनी मला ठरवले. मला त्यावर काहीही बोलायचे नाही, भाजपा हा मोठा पक्ष, कुणाच्या जाण्याने किंवा येण्याने पक्ष थांबत नाही. जळगाव जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तेथील जनता भाजपासोबतच आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.