मुंबई, दि १९ ऑगस्ट : सुशांतसिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेवर थेट बोलणं टाळलं आहे. पार्थ पवार यांनी काय ट्विट केलं आहे मला माहीत नाही, मात्र हा विषय न्यायालयात गेला होता त्यामुळे आता यावर काय निर्णय घ्यायचा हा सरकारचा विषय आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
पार्थ यांनी ट्विटमध्ये काय लिहिलंय मला माहीत नाही. कोणत्याही गोष्टीचा कुठलाही अर्थ काढता येतो, ते आपल्या विचारांवर असतं. त्यामुळे सुशांतला न्याय मिळाला पाहिजे आणि मुंबई पोलिसांवर मला विश्वास आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.