All News

शुद्र राजकारण करणं योग्य नसतं : शरद पवार

शुद्र राजकारण करणं योग्य नसतं  : शरद पवार

मुंबई, दि. २४ नोव्हेंबर : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे, असा आरोप शरद पवारांनी केला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.


महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत.  एवढं मोठं संकट मानवी समाजावर येतं त्यावेळी शुद्र राजकारण करणं योग्य नसतं पण ठीक आहे निराशा ही माणसाला स्वस्थ बसू देत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,' अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

Advertisement

IBPS MahaExam test 4 Highclonoid Softec Pvt Ltd