मुंबई, दि. १९ ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयानं आज या प्रकरणी निकाल दिला.
न्यायालय राज्यातील प्रकरणं सीबीआयकडेच का देतात? सरकारवर ही वेळ का आली? याचं आत्मपरिक्षण राज्य सरकारनं करावं, असा सल्लादेखील त्यांनी दिला. राज्यातील सरकार हे जनतेसाठी नाही. हे सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचं न्यायालयानं दिलेल्या निकालातून सिद्ध झालं आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे जाणं ही संपूर्ण भारतीयांची भावना होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे देऊन संपूर्ण भारतीयांच्या इच्छेचा आदरच केला आहे, असं मत राणेंनी व्यक्त केलं आहे.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.