All News

राज्यात दिवसभरात कोरोनाच्या ७७ हजारांहून अधिक चाचण्या

राज्यात दिवसभरात कोरोनाच्या ७७ हजारांहून अधिक चाचण्या

  • राज्यात आज बरे झाले ११ हजार रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


मुंबई, दि. ८ ऑगस्ट  : राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या सुमारे ७७ हजार ३७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज ११ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६७.२६ टक्के  एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. आज १२ हजार ८२२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४७  हजार ४८  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १२,८२२ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २७५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१३०४ (५८), ठाणे- २३२ (६), ठाणे मनपा-३०४ (१५),नवी मुंबई मनपा-४६६ (६), कल्याण डोंबिवली मनपा-३७७ (१२),उल्हासनगर मनपा-४२, भिवंडी निजामपूर मनपा-२२, मीरा भाईंदर मनपा-२२२ (९),पालघर-१५७ (५), वसई-विरार मनपा-२१७ (९), रायगड-२३७ (१३), पनवेल मनपा-१६४ (४), नाशिक-१४७(५), नाशिक मनपा-५८९ (३), मालेगाव मनपा-५४,अहमदनगर-३४२ (२),अहमदनगर मनपा-२६५, धुळे-१३९ (१), धुळे मनपा-२०१ (७), जळगाव-४६३ (२), जळगाव मनपा-१९३, नंदूरबार-१५६, पुणे- ४३७ (८), पुणे मनपा-१४७५ (३९), पिंपरी चिंचवड मनपा-८९० (२०), सोलापूर-३९६ (६), सोलापूर मनपा-४१ (१), सातारा-१८८ (१), कोल्हापूर-३१४ (८), कोल्हापूर मनपा-२०६ (१), सांगली-७५ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७७ (४), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-८ (४), औरंगाबाद-१८७, औरंगाबाद मनपा-१६६ (२), जालना-२०२ (६), हिंगोली-६, परभणी-४८, परभणी मनपा-२७, लातूर-१२१ (१), लातूर मनपा-१०४, उस्मानाबाद-१९६ (१), बीड-१०७ (३), नांदेड-१२२, नांदेड मनपा-१, अकोला-१८, अकोला मनपा-९ (१), अमरावती-३१, अमरावती मनपा-७०, यवतमाळ-९२ (२), बुलढाणा-१०७, वाशिम-४९, नागपूर-१४३ (१), नागपूर मनपा-३७१ (५), वर्धा-२, भंडारा- ३९, गोंदिया-४१, चंद्रपूर-८, चंद्रपूर मनपा-८, गडचिरोली-३४, इतर राज्य १७.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २६ लाख ४७ हजार ०२० नमुन्यांपैकी ५ लाख ०३ हजार ०८४ नमुने पॉझिटिव्ह (१९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८९ हजार ६१२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ६२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४५ टक्के एवढा आहे.



Advertisement

IBPS IBPS Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam