All News

Maratha Resevation : मराठा नेत्यांनी गरीब मराठा समाजावर अन्याय केला : प्रकाश आंबेडकर

Maratha Resevation : मराठा नेत्यांनी गरीब मराठा समाजावर अन्याय केला : प्रकाश आंबेडकर

मुंबई, दि. ५ मे : मराठा समाजाला आरक्षण देण्यात भाजप आणि महाविकास आघाडी सरकार कमी पडलं. राज्यातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं. असे मत वंचित बहुजन विकास आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे. 


राज्यातील श्रीमंत मराठा समाज गरीब मराठा समाजाला जगू देणार नाही. भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील मराठा नेत्यांनी गरीब मराठा समाजावर अन्याय केलाय, असा आरोपही आंबेडकरांनी केलाय. आता गरीब मराठा समाजानं आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायला हवी. श्रीमंत मराठा समाजाच्या मागे जायचं की नाही, हे ठरवायला हवं, असंही ते म्हणाले.

Advertisement

IBPS IBPS test 4 MahaExam