ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून सकाळी सात वाजता फ्रीडम रनला झेंडा दाखवून रवाना केले जाणार आहे.
गेले १२-१३ दिवस विरोधी पक्ष या विषयावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेची मागणी करत आहे. सरकार आता ऐकायला तयार नाही.
आरबीआयने रेपो रेट चार टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के कायम ठेवला आहे.
महाविकास आघाडी, मतदारसंघातील प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करता आली.
दुहेरी इंजिन असलेल्या सरकारने हे सुनिश्चित केले आहे की गरीब, दलित, मागास, आदिवासींसाठी बनवलेल्या योजना जलद गतीने अंमलात आणल्या जातील.
सविस्तर माहिती आणि स्पष्टीकरणासाठी JEE (Main) - 2021 चे परीक्षार्थी 011-40759000 या क्रमांकावर अथवा jeemain@nta.ac.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात.
राहुल गांधी यांच्या दोन फोन नंबर्सची २०१८ ते २०१९ या काळात हेरगिरी केली गेली. राहुल गांधी यांच्या दोन फोन नंबर्सची २०१८ ते २०१९ या काळात हेरगिरी केली गेली. त्याकाळात देशात सार्वजनिक निवडणुका सुरू होत्या.
केरळमधील १४ जणांचे अहवाल चाचणीसाठी पुण्यातील लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. एका गरोदर महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
कोरोनाने देशभरात तीन हजाराहून अधिक मुलांच्या डोक्यावरचे पालकांचे छत्र हिरावून घेतले आहे.
यंदाच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री ठरलेले ३५ वर्षीय निसित प्रामाणिक यांच्याकडे केंद्रीय गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे; मात्र त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे एडीआरच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकांदरम्यान ज्या कूच बिहारमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या, त्या मतदारसंघातून निसिथ प्रामाणिक खासदार म्हणून निवडून आले आहेत. याशिवाय, जॉन बारला, पंकज चौधरी आणि व्ही मुरलीधरन या तिघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.
राजीव शर्मा याला स्थानिक न्यायालयात दाखल केले असता सात दिवसांच्या ईडीच्या कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे.
२०१६ साली फ्रान्सने भारताबरोबर ३६ राफेल फायटर विमाने विक्रीचा करार केला. या करारात भ्रष्टाचार आणि पक्षपात झाल्याचा आरोप होत असून फ्रान्समध्ये आता या व्यवहाराची चौकशी होणार आहे.
भाजप युवा मोर्चाचे पुष्कर सिंह धामी हे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घोषित होऊ द्या त्यानंतर भाजप आपली रणनीती समोर आणेल, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा आता केंद्राच्या अखत्यारित गेला आहे.
संघाचे नवे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लखनऊचा दौरा करणार आहेत.
या उपायांमुळे देशांतर्गत ग्राहकांसाठी खाद्य तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे दर बदलतात.
भारतीय रेल्वेने महाराष्ट्रात भुसावळ जळगाव तिहेरीकरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण केला.
आरोग्य तसेच प्रवास आणि पर्यटन क्षेत्राच्या पुनरुज्जीवनावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
बैठकीमध्ये आम्हा सर्वांच्या वतीने गुलाब नबी आझाद यांनी आपले म्हणणे मांडले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नीने पीडित कुटुंबीयांची माफी मागितली आहे.
या आर्थिक वर्षात एसडीआरएफमध्ये राज्यांना 22 हजार 184 कोटी रुपये देण्यात आले होते.
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्यापक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
भारतात उपचाराधीन रुग्ण संख्येतही सातत्याने घट होत आहे.
लोकशाही आणि स्वातंत्र्य ही भारताच्या सांस्कृतिक सभ्यतेचा भाग आहेत.
70 उत्पादने / ब्रँडमध्ये किमतीत 54 % पर्यंत घसरण नोंदवण्यात आली
या भेटीनंतर ठाकरे यांनी महाराष्ट्र सदन येथे येऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मोदी यांची भेट घेतली.
मोदी यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
येत्या 21 जूनपासून पेंद्र सरकारकडून सर्व राज्यांना मोफत लस पुरवठा केला जाणार आहे.
जागतिक स्तरावर आरोग्य परिस्थिती सामान्य झाल्यानंतर लवकरच उपाध्यक्ष हॅरिस यांचे भारतात स्वागत करण्याची अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
मुले पंतप्रधानांसोबत खुलेपणाने बोलली आणि त्यांनी त्यांच्या चिंता आणि मते मुक्तपणे व्यक्त केली.
आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी देशाचं GDP ऋण ७.३ टक्के इतकं राहणार असल्याची माहिती शक्तीकांत दास यांनी दिली.
85 जणांचा बळी घेणारा हा दारू ठेका अलिगडमधील करसुआ गावात आहे.
हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान दोलनात नकारात्मक परिस्थिती निर्माण होईल.
अस्वास्थामुळे बारावीच्या परीक्षांसंदर्भातील आज घेतला जाणारा निर्णय लांबणीवर जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे.
काही विभागात ( चार विभागांपैकी) सरासरी ताशी 50 किलोमीटरहून अधिक वेग नोंदवण्यात आला.
देशातील लोकसंख्येपैकी फक्त तीन टक्के लोकांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे.
ईडीएलआय योजनेतील विमा लाभात वाढ करून त्याची व्याप्ती ही वाढवली आहे.
देशाचा संकल्प कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी नेहमीच सक्षम होता.
विम्याचा कमाल लाभ 6 लाख रुपयांवरून 7 लाख रुपये करण्यात आला आहे.
जागतिक बाजारपेठेची सरासरी कामगिरी 9.25 टक्के आहे. एका वर्षात त्यांना 49.24 टक्के नफा झाला आहे.
सध्या या वादळाची गती 135 किलोमीटर प्रतितास असून त्याची गती 155 किलोमीटर प्रतितास होण्याची शक्यता आहे.
कामगार, मजुरांची नोंदणी प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. ती गतिमान होणे आवश्यक आहे.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
हेलिकॉप्टरचा मोठा आवाज आणि ऊन यामुळे घाबरलेली गाय वेगाने हेलिपॅडच्या जवळून गेली.
बंगालच्या उपसागरात पूर्व मध्य भागात कमी दबावाचे क्षेत्र निर्माण झाले आहेत.
राज्य सरकारने या सगळ्या प्रकारात घेतलेल्या भूमिकेवर न्यायालयाने आक्षेप घेतला.
ओडिशा सरकारने 30 मेपासून 14 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
देशात या वर्षी स्पुटनिक-व्हीचे 85 कोटीहून अधिक डोस तयार केले जातील.
कोरोना महामारीमुळे अशा मुलांवर मोठा आघात झाला आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
देशभरात नाचक्की झाल्याने उत्तर प्रदेश सरकारने गंगा नदीकाठी मृतदेहांचे दफन करण्यास मनाई केली होती.
अंदमान बेटांजवळच्या सागरी भागावर हा तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एखादा जिल्हा जिंकतो तेव्हाच देश जिंकतो. आपल्या देशात जेवढे जिल्हे आहेत.
नदीकाठच्या वाळूमध्ये मृतदेहाचे दफन करण्यासदेखील प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
मंत्रालय नियंत्रण कक्ष सज्ज असून इतरही जिल्ह्यातील नियंत्रण कक्षांशी त्यांचा व्यवस्थित समन्वय आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राजीव सातव यांच्या जाण्यानं संसदेतील माझा मित्र गमावला.
प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कोरोनातून बरे झाले होते मात्र त्यांना दुसऱ्या एका विषाणूने घेरले होते.
राज्यांनी आकडेवारीचे भय न ठेवता जास्तीत जास्त चाचण्या प्रामाणिकपणे कराव्यात.
किनार्यावर येऊन आदळणार्या लाटांचा तडाखा तिरुवनंतपुरुम येथील जुन्या पुलाला बसला आहे.
हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड ही महाराष्ट्राच्या राज्य सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी दर महिन्याला दोन कोटी कोवॅक्सिन लसींचे उत्पादन करणार आहे.
आपल्यातील अंतर्गत भेदभाव विसरून एकत्र येऊन या संकटाशी लढा द्यावा लागेल.
राज्यातील विविध महानगरपालिकांचे ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
विरोधी पक्षांना बहुमत सिद्ध करत नवे सरकार स्थापन करण्यासाठी गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंतचा अवधी देण्यात आला होता.
राज्यातल्या परिस्थितीवर मी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक दृष्टिकोनातून बोलणात आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चित्रकूटमधील गोळीबाराच्या घटनेप्रकरणी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडून अहवाल मागितला आहे.
मदत करणार्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांना मदत करण्यापासून रोखणे हा मोदी सरकारचा भयानक चेहरा आहे.
मोदी यांनी किसान सन्मान निधीचा आठवा हप्ता जाहीर केला. या वेळी त्यांनी देशवासीयांशी संपर्क साधला असता कोरोना संकटावर चिंता व्यक्त केली.
या भयानक स्फोटात अनेक नमाझ्यांचा मृत्यू झाला आहे, तसेच इतरही अनेकजण जखमी झाले आहेत.
कोणताही राजकीय फायदा मिळण्यासाठी हे निर्णय घेत नसल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांना आधार देणे आणि जबाबदारी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
सध्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवडे इतकं होतं.
वायू गळती झाल्यामुळे आगीचा भडका उडाला, त्यात मजुरांना प्राण गमवावे लागले.
बिग बझार, रिलायन्स, डी मार्ट यांच्याबरोबरच फ्लिपकार्ट, मेझॉनसारख्या कंपन्यांनी आता एकमेकांचे अनुकरण सुरू केले आहे.
सध्याच्या कठीण परिस्थितीत एवढी गुंतवणूक होण्याची शक्यता दिसत नाही.
तरुण वर्ग जास्त प्रवास करत असल्याने त्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या चाचणीत , 0 दिवस आणि 28 दिवस दरम्यान अंतस्नायुमधून लसीच्या दोन मात्रा दिल्या जातील.
ऑक्सिजन वाटण्याची प्रक्रिया एका सूत्राच्या आधारे निश्चित केली जाते.
एक्साइड, अमरराज या देशातील बॅटरी बनविणार्या कंपन्यांना याचा फायदा होणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूपासून वंचित राहू नये
केंद्रीय अर्थमंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे.
भारत दरवर्षी सुमारे 75 हजार कोटी रुपयांच्या खाद्यतेलांची आयात करीत आहे.
सीसीटीव्हीच्या दाव्यानुसार, केवळ तीन मिनिटांत ही रॉकेट सिस्टिम युद्धासाठी तयार होते.
देशात मंगळवारी गेल्या 14 दिवसांतील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या सर्वांत कमी आढळून आली.
माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनीच या बैठकीत शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
पाच राज्यांतील निवडणुकांमधील काँग्रेसच्या पराभवावरही भाष्य केले.
देशातील लोकसंख्येच्या दृष्टीने बँकांच्या शाखांची संख्या वाढवण्याची गरज आहे.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता ही अट पहिल्या हप्त्यासाठी शिथील करण्यात आली आहे.
भारतीय संसदेने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
सर्व कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करत हा समारंभ साध्या स्वरुपात साजरा करण्यात आला.
चार लाख कैदी सध्या तुरुंगात असून त्यांनाही जगण्याचा व आरोग्याचा अधिकार आहे.
रॉकेटचे अवशेष ७२.४७ डिग्री पूर्व अशांश आणि २.६५ डिग्री उत्तर रेखांश या ठिकाणी पडले.
आरोग्य मंत्रालयाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना संपूर्ण देशभर कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीन वेळा हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला.
’सीरम’ही जगाला लसी निर्यात करणारी जगातील मोठी लस उत्पादक कंपनी आहे.
कृती गट केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाशी सल्लामसलत करण्यासाठी स्वतंत्र असेल.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडी सरकार आहे.
प्रत्येक दिवशी सातशे टन ऑक्सिजन दिल्लीच्या रुग्णयांना दिला जावा.
मोदी सरकारने कोरोना परिस्थितीसंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही सोनिया यांनी सुचवले आहे.
कोरोना व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटसचा संशोधकांमार्फत शोध लावला पाहिजे.
बेल्लारीहून होेणारा ऑक्सिजन पुरवठा कर्नाटकने थांबवला आहे.
व्ही. मुरलीधरन हे पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाचे सदस्य आहेत.
कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. अशा परिस्थिती दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये.
दारुसोबत हे औषध प्यायल्याने कोरोनापासून बचाव होतो, असा त्यांचा गैरसमज होता.
गुरुवारी देशात 15 ते 20 पैसे प्रतिलिटर दर वाढवण्यात आले आहेत.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलांवर रिझर्व्ह बँक नजर ठेऊन आहे.
न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं.
कोरोनाच्या दुसर्या लाटेबाबत सरकार आधीपासूनच सतर्क राहीले असते, तर त्यांनी तसे नियोजन केले असते.
निवडणुकीच्या निकालाच्या 48 तासांनंतर झालेल्या हिंसाचारात नऊ कामगारांचा मृत्यू झाला.
२७ फेब्रुवारीनंतर देशात पहिल्यांदाच इंधनाची दरवाढ झाली आहे.
गेल्या 24 तासांत देशात साडे तीन लाखहून अधिक रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या दोन कोटींच्या वर गेली आहे.
वरिष्ठ डॉक्टर आणि परिचारिका यांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ कोरोना नर्सिंगमध्ये परिचारिका वापरल्या जाऊ शकतात.
चामराजनगर रुग्णालयाला बेल्लारी येथून ऑक्सिजन मिळणार होता; मात्र ऑक्सिजन येण्यास उशीर झाला.
सर्व आमदारांची शपथविधी सहा मे रोजी होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली.
लोकांच्या हितासाठी दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लावण्यावर विचार करू शकतात असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं.
आजचा निकाल तृणमूल काँग्रेसच्या बाजूने एकतर्फी होता. अटतटीची लढत झाली. आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपातीपणाची होती.
आसाममध्ये विरोधी पक्षांशी मुकाबला करत भाजपच्या नेतृत्त्वातील आघाडीने सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे.
मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात द्रमुकने 69 जागांवर विजय मिळविला होता.
केरळमध्ये दीर्घकाळ माकपा पोलिसब्युरोचे (1988-2015) सदस्य म्हणन काम केल्यानंतर 2016 मध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी यंदा एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
बंगालमधील कोरोनाच्या केसेस वाढू लागल्यानेच सहाव्या, सातव्या आणि आठव्या टप्प्यातील मतदानाच्या वेळी मतदारांनी ममता बॅनर्जींना भरभरून मतदान केले.
आसामात भाजपने दणदणीत घरवापसी केली आहे. काँग्रेस आणि भाजपत चुरस होती; मात्र भाजपने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली.
हरिद्वारेमधील कुंभमेळ्या कोरोनाचा सुपड स्प्रेडर असून 61 रिटर्न्सपैकी 60 तीर्थयात्रियांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत.
लसीकरणासंदर्भात समानता राखण्यामध्ये आणि लसींच्या योग्य वितरण करण्यामध्ये केंद्र चांगली भूमिका बजावू शकते.
1985च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी अरुण कुमार सिंह यांच्या निधनानंतर बिहारमधील विविध पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
कोरोना नियमांचे पालन करून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी खट्टर रुग्णालयात आले होते.
मोदी सरकारने हे लक्षात घेणे आवश्यक आहे, की लढाई कोरोनाविरोधात आहे, काँग्रेस किंवा अन्य राजकीय विरोधकांविरुद्ध नाही.
कोरोनाच्या संकटावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रावर प्रश्नांचा भडिमार केला.
आपल्या यूट्यूबवर चॅनलवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओद्वारे प्रभाकर यांनी देशातील सद्य परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले.
मतमोजणीची ’ब्लू प्रिंट’ मिळाली नाही, तर मतमोजणीवरही रोख लावण्याचा इशारा उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे.
चार राज्यांमध्ये पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ आणि झारखंडचा समावेश आहे.
शुक्रवारी चमोली जिल्ह्यातील जोशीमठ सेक्टरच्या सुमना क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टी सुरू होती. यामुळे ही घटना घडली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
देशात ऑक्सिजन तुटवड्याचे संकट जाणवत असताना एक मे पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होता येणार आहे.
केंद्र सरकारने एक मेपासून देशात 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने कोरोनाच्या तयारीसंबंधी सध्या सहा राज्यांमधील उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याची दखल घेतली.
महाराष्ट्रात सध्या सहा लाख नव्वद हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर गुजरातमध्ये 84 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
पेट्रोलचा दर प्रतिलीटर तीन रुपयांनी तर डिझेल प्रतिलीटर दोन रुपयांनी महाग होऊ शकते.
देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड आणि आवश्यक औषधांची कमतरता असल्याची दखल आता थेट सर्वोच्च न्यायालयानेच घेतली आहे.
नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याने घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्घटनेत लोकांना प्राण गमावावे लागल्याने मला प्रचंड दु:ख झालं आहे.
नाशिकमधील रुग्णालयामध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीची बातमी ऐकून दु:ख झालं आहे.
देशातील जनतेला धीर देत आणि कोरोना योध्यांचे कौतुक करत वैद्यकीय सुविधा, लसीकरण आणि लॉकडाउनसाख्या महत्वाच्या विषयांवर भाष्य केले.
मशिदीने केलेल्या या अनोख्या मदतीने रुग्णालयात जागा न मिळालेल्या रुग्णांवर मशिदीतील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
राष्ट्रीय पातळीवरील कोविड- 19 लसीकरण धोरणाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात 16 जानेवारी 2021ला करण्यात आली.
उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारलाही फटकारले आहे. जिल्ह्यांना योग्य पद्धतीने रेमडेसिवीरचे वाटप होत नाही.
वलसाडमधील रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मृतदेह पारदर्शक बॅग्समध्ये ठेवण्यात आले आहेत. हे मृतदेह अद्याप कुटुंबीय किंवा नातेवाइकांकडे सोपवण्यात आलेले नाहीत.
गेल्या वर्षीच्या टाळेबंदीच्या काळातदेखील रेल्वे विभागाने अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक सुरु ठेवून पुरवठा साखळी अबाधित राखली आणि आपत्तीकाळात देखील देशसेवेचे कार्य सुरुच ठेवले.
नंदुरबारमध्ये रेल्वेच्या डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कोचमध्ये करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेकडून आयसोलेशन कोचमध्ये एसीचीदेखील सोय करण्यात आली आहे.
दुसर्या देशांना मदत करून आपण किती उदार आहोत, हे दाखवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
राजस्थानात अक्षय तृतीयेला मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असतात. ते रोखण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
काश्मीरचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पाचही दहशतवादी मारले गेले आहेत.
भारत-पाकिस्तान दरम्यानच्या संभाव्य चर्चेशी निगडीत असलेल्या तीन सूत्रांच्या हवाल्याने ब्रिटीश वृत्तपत्र ’फायनान्शियल टाइम्स ’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
यंदाच्या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 10.5 टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला.
राज्यात तीन-चार दिवसांचा किंवा वीकएंड कर्फ्यू लावण्याची गरज असल्याचे मत गुजरात उच्च न्यायालयाने व्य्क्त केले.
मीडिया समूहाचा प्रमुख होण्यासाठी त्यांनी शारदा समूहाकडून मोठी रक्कम घेतल्याचा घोष यांच्यावर आरोप आहे.
केंद्रीय राखीव दलाचे सात कर्मचारी आणि छत्तीसगडचे 15 पोलिस कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत.
दुसरा पर्याय दिसत नसल्यामुळे आता पुन्हा एकदा टाळेबंदी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या जहाजाने तब्बल एक आठवडाभर सुएझ कालव्यातील सागरी मार्ग ब्लॉक केला होता. अखेर अनेक प्रयत्नांनंतर जहाज काढण्यात यश आले.
27 मार्च रोजी केंद्र सरकारने जीएसटी भरपाई म्हणून तीस हजार कोटी रुपये राज्यांना दिले. चालू आर्थिक वर्षासाठी सुमारे 63 हजार कोटी रुपये प्रलंबित आहेत.
या निर्णयाचा फायदा केवळ ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मच्या ग्राहकांनाच न होता मोबाइल बिल किंवा अन्य बिलांसाठीही होणार आहे.
‘एनआयए’ने यासंदर्भात नुकताच एका पोलिस कॉन्स्टेबल आणि एका हॉटेल व्यावसायिकाचा जबाब नोंदवून घेतला. हे दोन्ही जबाब आणि मनसुख यांच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती याआधारे एनआयएने सगळा गुंता सोडवला आहे.
राहुल यांनी आज चेन्नईमध्ये काँग्रेस उमेदवार हसन हारुन यांच्या समर्थनात प्रचारसभा घेतली.
हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशासह काही राज्यांमधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील चार महिन्यांपासून आंदोलन करत कृषी कायद्यांना विरोध करत आहेत.
शरद पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचे वृत्त समोर आले. हे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावले आहे.
पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात मतदान सभांना संबोधित करताना ममता यांनी भाजपला सर्वात मोठा फसवणूक करणारा पक्ष असे संबोधले. मोदींनी शनिवारी ओराकांडी येथील मतुआ समाजाच्या मंदिराला भेट दिली.
या हल्ल्यात अधिकारी यांच्या गाडीच्या चालकाला दुखापत झाली. अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
राज्य सरकारने मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले होते. राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर न्यायालयाने स्थगिती दिली होती.
बांगला देशाच्या स्वातंत्र्य दिनाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मोदी बांगला देशाच्या दौर्यावर आले आहेत. कोरोना काळातील त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.
महिलांच्या बाबतीत हे पूर्णपणे पक्षपाती असल्याचे मत सर्वोच्च न्याायलयाने स्पष्ट केले आहे. हा निर्णय स्थायी कमिशन संदर्भात 80 महिलांच्या याचिकेवर दिला गेला आहे.
सेन्सेक्सच्या टॉप 30 मध्ये केवळ 2 शेअर्स तेजीसह बंद झाले, तर 28 शेअर्स आज लाल चिन्हात बंद झाले. एशियन पेंट्स आणि पॉवरग्रीडच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.
बोबडे यांचा कार्यकाल पुढील महिन्यात अखेरीस म्हणजे 23 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नवीन सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरू केली होती.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंबंधी महत्वाचे आदेश दिले. त्यांना अटक करण्यापूर्वी तीन दिवस आधी नोटीस देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.
सिंग यांनी देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एस. के. कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या दोन द्विसदस्यी खंडपीठाकडे सुनावणी होणार होती.
भाजप खासदारांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे सांगत राज्याचे मुख्यमंत्री या प्रकरणावर मौन बाळगून असल्याचा आरोप केला.
रश्मी शुक्ला यांनी देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती गेल्या वर्षी तत्कालिन पोलिस महासंचालकांना दिली होती
गृहमंत्री देशमुख फेब्रुवारीच्या संबंध महिन्यात कोरोनामुळे रुग्णालय आणि नंतर गृह विलगीकरणात होते.
राज्यातील समाज कल्याण मंत्री मदन साहनी यांनी कबूल केले, की देशात व्यसनाधीन लोकांचे प्रमाण वाढत आहे आणि बिहार याला अपवाद नाही.
चीन जगातील सर्वांत ताकदवान सैन्य असलेला देश ठरला आहे. चीनला 82 गुण देण्यात आले आहेत. समुद्रमार्गे कोणतेही युद्ध झाले तर चीन सर्वात ताकदवान ठरेल आणि युद्ध जिंकेल
मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना शंभर टक्के हटवायला हवे, अशी मागणी यतनाल यांनी केली. येदियुरप्पा यांच्यासोबत निवडणुकांच्या प्रचारासाठी जाऊ शकत नाही.
नव्या कायद्याची अंमलबजावणी केल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची शिफारस समितीने केली आहे.
सिंग यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते
महाराष्ट्रात वसुलीची महाआघाडी आहे. हे प्रकरण केवळ एका मंत्र्यांचे नाही, तर उद्धव ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीचे कार्यकर्ते भिंतींवर चित्र काढत आहेत. त्यात ममतादीदी आपल्या पायाने मला लाथाळत असताना दिसत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासात प्रथमच अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन नागपूर बाहेर करण्यात आले.
मोदी यांनी भाजपच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये सभा घेतल्या. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजल्यापासून एक तासासाठी व्ह़ॉट्सअप डाऊन होते.
भाजपने बंगालच्या अलीपूरद्वार विधानसभा मतदारसंघात अर्थतज्ज्ञ अशोक लाहिरी यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
केंद्र सरकारने दिल्ली सरकारच्या अन्न पुरवठा विभागाच्या सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. तसेच ही योजना सुरू न करण्याचे निर्देश दिले आहेत.
दोन्ही देशांमध्ये तिबेट, हाँगकाँग आणि चीनच्या पश्चिम भागातील शिनझियांग प्रांतात व्यापारापासून ते मानवाधिकारांच्या अनेक मुद्यांवर तीव्र मतभेद आहेत.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. या सर्वांमध्ये आयपॅकचे मेंबर्स आहेत. कुठे तीन तर कुठे चार सदस्य आहेत. हे लोक स्थानिक उमेदवारांसोबत मिळून काम करत आहेत.
पश्चिम बंगालमधील जनता इतकी वर्षे चुकीच्या पद्धतीने सरकार चालवल्याची ममता बॅनर्जी यांना शिक्षा देईल. दीदी म्हणतात ‘खेला होबे’, पण भाजप म्हणते, ‘विकास होबे’, ‘शिक्षा होबे’.
याचिकाकर्त्यांनी पीडितेला सहन कराव्या लागलेला त्रास क्षुल्लक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न झाल्याच्या मताशी सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली.
गेल्या आठवड्यात याच मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली. प्रधान यांच्या रॅलीवर झालेल्या हल्ल्यात एक भाजप कार्यकर्ता गंभीररित्या जखमी झाला आहे.
निवडणूक आयोगाने या आगामी निवडणुकांमध्ये काळ्या पैशांचा दुरुपयोग होऊ नये, म्हणून या राज्यांमध्ये 295 निरीक्षकाची नियुक्ती केली आहे.
तृणमूल काँग्रेस सोडून अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सोवन चट्टोपाधाध्याय आणि बैसाखी बंडोपाध्याय यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी भाजपचा राजीनामा दिला.
सिन्हा यांना सप्टेंबर 2019 मध्ये पंतप्रधानांच्या प्रधान सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले होते. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणूनही कर्तव्य बजावले आहे.
कुशवाह यांनी राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे संयुक्त जनता दलात विलीनीकरण करण्याची घोषणा केली. राष्ट्रीय जनता दलाने कुशवाह यांच्यावर सरड्यासारखे रंग बदलल्याचा आरोप केला.
बंगालच्या मुख्य सचिवांनी सकाळी पहिला अहवाल दिला, ज्यामध्ये ममताच्या दुखापतीचे कारण त्यांना लागलेला कारचा दरवाजा हे होते.
राजन यांनी भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलिअन डॉलर्स करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरही भाष्य केलं. भारताला पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य हे आकांक्षेपेक्षा अधिक आहे.
ममता या नंदीग्रामहून परत आल्यानंतरची त्यांची ही पहिलीच सार्वजनिक सभा आहे.
भारतीय शेतकरी संघटनेचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत शनिवारी बंगालमध्ये दाखल झाले. कोलकात्याच्या भवानीपोरा येथे आयोजित किसान महापंचायतीत ते सामील झाले.
एक फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी वाहन भंगार धोरण 2021 जाहीर केले.
सुपौलच्या राघोपूर स्टेशन हद्दीत येणार्या गद्दी गावात ही घटना घडली. गावात राहणार्या मिश्री लाल साह यांच्या घरातून दुर्गंध येत असल्याची तक्रार गावकर्यांनी सरपंचांकडे केली.
अटलबिहारी वाजपेयींच्या काळात भाजपचा सर्वसाधारण सहमतीवर विश्वास होता; परंतु आजच्या सरकारचा केवळ दडपशाही आणि जिंकण्यावर विश्वास आहे.
राहुल यांनी एक ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल विविध विषयांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मध्य प्रदेशात हॉटेल किंवा अन्य ठिकाणी शे-दोनशे रुपये रोजावर काम करणा-या महिलांना जादा पैसे देण्याचे आमिष दाखविले जात असे.
इंधनाच्या वाढत्या किंमतींच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रधान म्हणाले, की एक मार्च 2014 पर्यंत घरगुती गॅसच्या एका सिलिंडरची किंमत 410 रुपये पन्नास पैसे होती.
स्वामी फटकळ बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांनी नोटाबंदीसह मोदी यांच्या अनेक आर्थिक निर्णयावर टीका केली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या आकडेवारीवर तसेच अन्य बाबतीतही त्यांनी आक्षेप घेतले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात राहून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत कार्यकर्ता म्हणून काम केले आहे.
नंदीग्रामच्या बरतला इथे मतदारांना संबोधित करताना ममता म्हणाल्या, की मी एक हिंदू आहे. जे लोक 70 आणि 30 टक्क्यांचे कार्ड खेळत आहेत, त्यांनी सावध राहावे.
नॅशनल डिफेन्स अॅकेडमी आणि इंडियन नावल अॅकेडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा, यासंदर्भात स अॅड. कुश कार्ला यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
लस घेतल्यावर मोदी यांनी ट्विटर वरून देशातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे.
वाजिद हा फ्लिपकार्ट कंपनीत टीम लिडर म्हणून काम करत होता. तो कंपनीतून बनावट ग्राहकांच्या पत्त्यावर पार्सल मागवायचा.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडली. यात केंद्र सरकारकडून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनादेखील निमंत्रण दिले होते
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार पीएसएलव्ही-सी 51 आणि पीएसएलव्हीचे हे 53वे मिशन आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पाच राज्यातील निवडणुका या अत्यंत आव्हानात्मक आहेत.
अमेरिकेतील घडामोडी गुंतवणूकदारांच्या मनावर परिणाम करून गेल्या. त्यामुळे बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. शेअर निर्देशांकाची स्थिती दोलायमान झाली आहे.
कायदे मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, की एखाद्याने सोशल मीडियावर टाकलेला चुकीचा कंटेट 24 तासांच्या आत काढावा लागेल. चुकीचे ट्वीट किंवा कंटेट कुणी पोस्ट केले, हे जाणून घेणे गरजेचे आहे
जम्मू काश्मीरच्या चिनाब नदीवर स्टीलच्या पायावर उभ्या राहिलेल्या या पुलाची लांबी तब्बल 476 मीटर लांब आहे. रेल्वेमंत्र्यांनी या पुलाचा एक फोटोही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.
सीबीआयने कालीघाट येथील शांतिनिकेतन हौसिंग कॉम्प्लेक्समध्ये रुजिराची दीड तास चौकशी केली. सीबीआयच्या आठ सदस्यांची टीम रुजिराच्या घरी पोहोचली.
कोरोनाच्या संकटातून सावरत असताना कच्च्या तेलाचा वापर वाढला आहे. यावर्षी जुलै पर्यंत कच्च्या तेलाचा वापर कोविडपूर्व पातळीवर जाईल.
विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर बोलताना मुख्यमंत्री व्ही नारायणसामी भावूक झाले. त्यांनी आपल्या सरकारच्या कार्यकाळातील आव्हाने सदनात मांडली.
जानेवारी महिन्यापर्यंत मीना या राजस्थानमधील बांदीकुईच्या उपविभागीय दंडाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना 15 जानेवारी रोजी अटक केली.
हरियाणातील हिसारमधील खरक पुनिया येथे आयोजित महापंचायतीत टिकैत यांनी हा इशारा दिला. या वेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली.
इंधन दरवाढीमुळे येत्या काळात महागाईचा मोठा भडका उडणार असल्याचे अटळ मानले जात आहे. ताज्या दरवाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर आजवरच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत.
शेणापासून वेगवेगळे रंग बनवण्यासाठी एक प्रकल्प उभारण्यासाठी 15 लाख रुपयांचा खर्च येतो. गडकरी यांचे स्वप्न पूर्ण झाल्यास गावातून शहराकडे रोजगारासाठी वाढणारा लोंढा कमी होऊ शकतो.
मुख्यमंत्री वाय.एस.जगमोहन रेड्डी यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी दुःख व्यक्त केले आहे. तसेच तातडीने मदतकार्य करण्याचे आदेशही संबंधित अधिकार्यांना देण्यात आले आहेत.
माझ्या राज्यात हिंसा सुरू आहे. त्यावर आपण काहीच बोलू शकत नाही. या विषयावर जर काही बोलू शकत नाही, तर मग मी त्यापेक्षा माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा देतो, अशी खदखद त्रिवेदी यांनी व्यक्त केली.
एखाद्या शेतक-यानेने अर्ज केल्यानंतर त्याला आधीच्या हप्त्यांचे पैसे मिळतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालबाबत असेच विधान केले आहे.
काल चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सर्वप्रथम सैन्य माघारी सुरू झाल्याचे जाहीर केले होते. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत या संबंधी माहिती दिली.
कोरोना संकटाच्या काळात सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली. कोरोना कर किंवा उपकर लावण्याबाबत माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली.
पश्चिम बंगालमध्ये आपली लढाई तृणमूल काँग्रेसबरोबर आहे; मात्र आपल्याला त्यांच्या छुप्या मित्रांपासूनदेखील सावध राहावे लागणार आहे. डावे, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस हे पडद्यामागे मॅच फिक्सिंग करण्यात गुंतले आहेत.
चक्का जाम आंदोलन सुरू झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना टिकैत म्हणाले, की हे जनआंदोलन आहे. भाकरी तिजोरीत बंद होऊन नये, म्हणून हे आंदोलन आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने भारतात सीटीसी सुविधा 2010 मध्ये सुरू केली.
शेतकरी आंदोलनावरून तोमर यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला. विरोधी पक्ष कृषी कायद्यांना काळे कायदे म्हणत आहेत.
सीआरआर वाढल्याने बँकांच्या व्याजदरावरील दबाव वाढणार आहे. यामुळे बँकाकडून ठेवीदर आणि कर्जातचे व्याजदर वाढवले जाण्याची शक्यता आहे.
कृषी कायद्यांच्या विरोधात शेतक-यांनी 26 जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. त्या वेळी अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिस आमनेसामने आले. दिल्लीच्या काही भागांमध्ये हिंसाचार झाला.
केंद्र सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी रॉकेलवरील अनुदानासाठी दोन हजार 677.32 कोटी रुपयांची तरतूद केली होती.
सरकार किल्लाबंदी का करत आहे? सरकार शेतक-यांना घाबरते का? शेतकरी देशाची ताकद आहेत. त्यांना दाबणेे, मारणे आणि धमकावणे सरकारचे काम नाही.
राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी शेतक-यांच्या मुद्यांवर चर्चा व्हावी, यासाठी नोटीस दिली.
एलआयसी आणि आयडीबीआयमधील निर्गुंतवणुकीमधून सरकार 90 हजार कोटींचा निधी उभा करण्याच्या विचारात आहे,
अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आलेल्या प्रवर्गांचा उल्लेख करत मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने त्यामध्ये कशा प्रकारे तरतुदी करण्यावर भर देण्यात आला आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
या अर्थसंकल्पात प्राप्तिकर माफी मिळावी या आशेवर बसलेल्या मध्यमवर्गाला मोठा धक्का बसला. या अर्थसंकल्पामुळे पगारदार वर्ग निराश झाला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरात अतिरिक्त कर सूट जाहीर केली गेली नाही
स्टार्टअपसाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी भांडवली नफ्यावर टॅक्स हॉलिडे अंतर्गत देण्यात येणा-या सवलतीचा कालावधी एक वर्षाने वाढवण्यात आला आहे. आता 31 मार्च 2022 पर्यंत या नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
मोदी यांनी नव्या वर्षात पहिल्यांदाच मन की बातद्वारे देशावासीयांशी संवाद साधला. दिल्लीत 26 जानेवारीच्या दिवशी तिरंग्याचा अपमान पाहिला. त्यामुळे देश दुःखी झाला.
महाराष्ट्रात संमिश्र सरकार आहे. काँग्रेस केव्हा आपल्याला खुर्चीवरून उतरवेल, याची भीती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. त्या कारणासाठी आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ठाकरे प्रयत्न करीत आहेत.
आगामी आठवड्यात होणा-या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीला गटनेतेही उपस्थित होते. राज्यसभेचे कामकाज सुरळीत पद्धतीने व्हावे, त्यात वारंवार अडथळा येता कामा नये.
ममता यांनी बंगालच्या भूमिला रक्तरंजित केले. बंगालमध्ये घुसखोरी करणार्यांना ममता यांची फूस असल्याचा घणाघात शाह यांनी केला. या घुसखोरांना पश्चिम बंगालचे नुकसान करू देणार नाही.
राष्ट्रपती भवन येथे दरवर्षी मार्च / एप्रिलच्या आसपास आयोजित करण्यात येणाऱ्या औपचारिक कार्यक्रमांमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात.
कालाहांडीचे मनमोहक लोकनृत्य बजासल, फिट इंडिया मूव्हमेंट आणि स्वावलंबी भारतासाठी मोहिमेची झलकही पाहायला मिळाली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील सुरू असलेले संचलन पार पडल्यानंतर शेतकऱ्यांच्या या ट्रॅक्टर मोर्चाला परवानगी देण्यात आलेली आहे.
मला वाटते की शासकीय कार्यक्रमास काही प्रतिष्ठा असावी. हा शासकीय कार्यक्रम आहे. एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही.
भाजप पक्षात अगोदरपासून सक्रिय असणारे आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 च्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसमधून नव्यानेच दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली.
जून 2021 मध्ये काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल अशी माहिती के. सी. वेगणुगोपाल यांनी कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
सोनिया यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस कार्य समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या वेळी त्यांनी अर्णव गोस्वामी यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर हल्ला चढवला.
काँग्रेसच्या एका गटाने गेहलोत यांना राजस्थानमधून दिल्लीला बोलावून घेत अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा पर्याय योग्य असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी बुधवारी सूत्रे हाती घेतली. त्यानंतर आर्थिक पॅकेजला गती मिळण्याची शक्यता आहे.
इराकमधील मोसूल जवळ रविवारी 17 जानेवारीला बॉम्बस्फोट झाला. त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये सुरक्षा दलाच्या सहा कर्मचार्यांचा आणि एक नागरिकाचा मृत्यू झाला.
बुधवारी अमेरिकेला पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये पुन्हा सहभागी करुन घेण्यासाठी एका कार्यकारी आदेशावर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवली आणि हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले. त्यानंतर नऊ डिसेंबरपासून पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणीला सुरुवात झाली.
शेतकर्यांना समितीसमोर जायचे नसेल तर राहू द्या; पण कोणाची प्रतिमा मलिन करू नका. समितीला कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. आम्ही फक्त सूचना देण्यासाठी समिती बनवली आहे
काँग्रेस आणि बदरुद्दीन अजमल यांच्या एआययूडीएफ या पक्षांनी पुढाकार घेत ही आघाडी केली आहे. तसेच या आघाडीमध्ये काही डावे पक्षसुद्धा सहभागी होणार आहे.
अर्णब-दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटिंगही समोर आले आहेत. यामध्ये अनेक कथित धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, देशातील तरुणांमध्ये यासंदर्भात चर्चा घडवून आणण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
संपूर्ण देश विरोधात गेला तरी मी सत्याच्या बाजूने लढत राहील. मी नरेंद्र मोदी किंवा भाजपला घाबरत नाही. मी स्वच्छ चारित्र्याचा आहे.
पुरालिया येथील सभेत भाजप खोटा प्रचार करत असल्याचा आरोप ममतादीदींनी केला. भाजप फेक व्हिडीओ पसरवत, फेक व्हॉटस अॅप ग्रुप बनवत.
लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी केलेल्या चीनने आता आणखी एक आगळीक केली आहे. चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये एक नवीन गाव वसवले असून त्यात जवळपास 101 घरे आहेत.
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत शेतकरी संघटनांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली.
शनिवारी सकाळी दिल्ली एनसीआरमध्ये दाट धुके पाहायला मिळाले. धुक्यामुळे गाझियाबाद ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वेवर 25 छोट्या-मोठ्या गाड्यांची एकामागोमाग एक टक्कर झाली.
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी राष्ट्रपती भवनात कोविंद यांची भेट घेतली.
भूपिंदर सिंह मान भारतीय किसान युनियनसोबत जोडलेले आहेत. कृषीतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. यासोबतच ते अखिल भारतीय शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष आणि माजी राज्यसभा खासदार आहेत.
पाकिस्तान सतत दहशतवादाला खतपाणी घालत आहे आणि दहशतवाद सहन न करण्याचे आमचे धोरण आहे.
आम्हाला समिती स्थापन करण्याचा अधिकार आहे. ज्यांना खरोखरच तोडगा काढायचा असेल, त्यांनी समितीसमोर जावे, असे निर्देश दिले.
रिपब्लिकन पक्ष डेमोक्रॅटिक पक्षाने चालवलेल्या महाभियोगाबद्दल गोंधळात पडला आहे. रिपब्लिकन नेते ट्रम्पच्या विरोधात गेले आहेत.
श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात झाला असून, नाईक यांना गंभीर दुखापत झालीय, तसेच त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना आगमन होण्यापूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग बराच चांगला होता; परंतु कोरोनाने आपल्याला सर्वात जास्त प्रभावित देशांच्या यादीत आणले.
केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले.
मराठा समाज व शासकीय वकिलांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या पाच खाजगी वकिलांच्या समितीचे सदस्यदेखील या बैठकीत ऑनलाईन सहभागी होणार आहेत.
उत्तर प्रदेशात आंतरधर्मीय लग्नानंतर जबरदस्ती धर्मपरिवर्तन केल्यास तब्बल दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आहे.
काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. उत्तर प्रदेशातील आगामी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे.
जून 1991 ते मार्च 1992 या काळात देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री होते. त्यांचे पुत्र भरतसिंह सोळंकी हेही माजी केंद्रीय मंत्री आहेत.
श्रीविजया एयर बोइंग 737 जकार्ताहून निघाल्यानंतर वेस्ट कलिमनतन प्रांतापासून संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान बेपत्ता झाले.
महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात आग लागल्याची दुर्दैवी घटना अत्यंत वेदनादायी आहे. जीव गमावलेल्या बाळांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे.
महाराष्ट्र राज्यात, सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने व जनहित लक्षात घेता गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थावर 2012 पासून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून अन्नसुरक्षा आयुक्त यांनी बंदी घातलेली आहे.
मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्यासाठी चंद्रप्पा नावाच्या एका मुलाची निवड केली. चंद्रप्पा वाहक आहे आणि तो सिंधूसोबत लग्न करायला तयार झाला.
बघेल यांच्या जोडीला मुकूल वासनिक आणि शकील अहमद असणार आहेत. आसाममध्ये काँग्रेसपुढे भाजपचे आव्हान आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश करणा-या आमदारांविरोधात बसपने आणि भाजपच्या एका आमदाराने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. बसप हा एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे.
काँग्रेसच्या 19 आमदारांपैकी 11 आमदार असे आहेत, ज्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली असली, तरी ते काँग्रेसचे नाहीत. या लोकांनी पैसे देऊन तिकीट घेतले आणि आमदार झाले.
सर्वोच्च न्यायालयात नव्या कृषी कायद्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर वैधतेला विरोध करणा-या सहा याचिका दाखल आहेत. याशिवाय दोन याचिका आंदोलक शेतकर्यांना हटवण्याची मागणी करणा-या आहेत.
बैतूलच्या कोतवाली पोलिस ठाण्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आदित्य शुक्ला यांनी तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी बनकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणात अटक झालेली नाही.
शेतकरी नेत्यांनी सरकारला प्रत्येक बैठकीत ठणकावून सांगितले आहे की, आम्हाला कृषी कायद्यात बदल नको. कायदे मागे घेणार असाल तरच आंदोलन संपेल.
रॅलीनंतर विजयवर्गीय यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ममता सरकारवर निशाणा साधला. आधी पोलिसांनी रॅलीला अनुमती दिली नाही.
सरपंचपदाचा लिलाव होत असून त्यासाठी मोठ्या रकमेची बोली लावण्यात येत आहे, अशी तक्रार आयोगाकडे आली आहे.
वधेरा यांनी लंडनस्थित ब्रायनस्टन स्क्वेअर येथे 1.9 दशलक्ष डॉलर्स किंमतीचे घर विकत घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँडरिंगचा आरोप आहे.
शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून, केंद्र सरकारकडून या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी शेतक-यांसोबत चर्चा सुरू आहे.
प्रादेशिक रेल्वे परिवहन प्रणालीला (आरआरटीएस) कार्यान्वित करणार्या एनसीआरटीसीने चिनी कंपनीला देण्यात आलेल्या कंत्राटाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
बीपीसीएलमध्ये केंद्र सरकार आपला 52.98 टक्के हिस्सा विकणार आहे, त्यासाठी तीन कंपन्या स्पर्धेत आहेत. तथापि, सरकारने नव्वद हजार कोटी मिळवण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे.
कृषी कायदे रद्द करण्याची मागणी जोवर पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतक-यांनी पुन्हा एकदा सांगितले. येत्या सहा जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च आयोजित करण्यात येणार आहे.
आज नवी ऊर्जा, नव्या संकल्पांसोबत आणि नवे संकल्प पूर्ण करण्यासाठी तीव्र गतीने पुढे जाण्याचा प्रारंभ होत आहे. आज गरिबांसाठी, मध्यम वर्गासाठी घरे बनवण्यासाठी नवे तंत्रज्ञान मिळत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरास विरोध जाहीर केल्यानंतर भाजपाला हिंदुत्वाचा घोर लागला आहे.
शासकीय योजनेतून गॅस मिळाल्यामुळे चूल बंद झाली होती; मात्र सध्या गॅसचे भाव गगनाला भिडल्याने ग्रामीण भागातील चुली नव्याने पेटल्या आहेत.
केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहिनुसार, रेग्युलर सेटलमेंट अंतर्गत ’आयजीएसटी’तील 23 हजार 276 कोटी रुपये ’सीजीएसटी’चे 17 हजार 681 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
अरुणाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाने नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे सातपैकी सहा आमदार फोडले. बिहारमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजपने दिलेला धक्का नितीशकुमार यांच्या जिव्हारी लागला आहे.
कोविड लसीच्या नावाखाली फसवणूक करणे ही नवीन पद्धत आहे. आता ही लस बुक करा, ती तुमच्या घरी दिली जाईल, असे सांगून फसवणूक केली जात आहे.
दीर्घकाळाचा विचार केल्यास सोने नेहमी सुरक्षित आणि जास्त परतावा देते. २० वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास सांगतो, की या अवधीत सोन्याने ११०० टक्क्यांहून जास्तीचा परतावा दिला.
पाकिस्तानात राहणारी 64 वर्षीय बानो बेगम35 वर्षांपूर्वी एटा येथील एका गावात तिच्या नातेवाइकांकडे आली होती. त्यानंतर तिने तिथला तरुण अख्तर अली याच्याशी विवाह केला.
मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी 26 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जमावाला चिथावणी देणार्यांचा शोध सुरू असून काही ठिकाणी छापेमारी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
2019 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या मजुरी संदर्भातल्या कायद्यात किमान वेतन आणि वेळेत वेतन देण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली होती.
पक्षांतर कायद्याप्रमाणे संयुक्त जनता दलाचे 25 ते 26 आमदार एकाच वेळी राष्ट्रीय जनता दलात आले, तर त्यांचे सदस्यत्व कायम राहील.
तृणमूल समर्थकांनी या घटनेनंतर शिबपूरमध्ये अनेक मोटारसायकली पेटवून दिल्यात. तसेच बस आणि दुकानांची तोडफोडही करण्यात आली.
खासदार राहिल्यास माझ्या पाठीच्या आणि मानेच्या दुखण्यावर नि:शुल्क उपचार करता येतील, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले होते.
टीआरपी घोटाळ्यामध्ये पोलिसांनी पहिल्यांदा स्पष्टपणे अर्णबचे नाव घेतले आहे. यापूर्वी आरोपींच्या लिस्टमध्ये रिपब्लिकच्या मालकाचे नाव होते. अर्णबचे नाव नव्हते.
केंद्र सरकारने शेतक-यांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. उद्या चर्चेची सातवी फेरी पार पडणार आहे.
काही आमदारांनी पक्ष सोडला, म्हणून काही फरक पडत नाही, जनता आमच्याबरोबर आहे. तुम्ही काही आमदारांना विकत घेऊ शकता.
नेतृत्वाकडून आपले म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याने वासवा नाराज होते. वासवा यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना एक पत्र लिहून आपली नाराजीही कळवली होती.
यूपीएच्या कार्यकाळात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि कृषिमंत्री शरद पवार यांनाही ही कृषी क्षेत्रातील या सुधारणा लागू करायच्या होत्या.
शिवसेनेच्या मुखपत्रातून राहुल गांधी यांच्यावरही भाष्य करण्यात आले होते. राहुल काम करत आहेत; मात्र अजूनही त्यांच्या नेतृत्वात कमतरता आहेत.
साईबाबा मंदिरात १२ हजार जणांनाच दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. पुढील दहा दिवसांतील सर्व ऑनलाइन तिकिटे बुक झाली आहेत.
मोदी सरकारने आठ नोव्हेंबर 2016 रोजी या चलनातून काढून टाकल्या. भारताला हे रुपये काढून नवीन नोटा द्याव्या लागल्या.
केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार जर वाहन चालक परवाना तर पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वेसाठी एक लाख आठ हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत.
जनता संचारबंदी, कोरोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
एक जानेवारीला शेतक-यांनी दिल्ली आणि हरियाणावासियांना नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आंदोलनस्थळी निमंत्रित केले आहे.
भाजीपाला व दुधालाही खर्चावर आधारित हमीभाव मिळण्याची गरज आहे. एक लीटर दुधाला किती खर्च येतो त्याचे मूल्य काढले पाहिजे.
गुजरात विधानसभेच्या 182 सदस्यांच्या निवडणुका 2022 मध्ये होणार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकून बहुमत मिळवले होते.
टाळेबंदी शिथिल होताच जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होऊन पूरक धोरणे अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यास मदतनीस ठरली.
केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आज देशभरातील शेतकर्यांशी संवाद साधला.
मोदी सरकारने शेतक-यांचे ऐकावे. गेल्या 29 दिवसांपासून शेतकरी थंडीत कुडकुडत आंदोलन करत आहेत. संपूर्ण देश हे पाहत आहेत.
मोबाइल अॅपद्वारे सामान्य लोकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे अशा विवेकास्पद अॅपद्वारे होणा-या फसवुकीला बळी पडू नका.
कुतुबमिनारची कुतुवत-इस्लाम मशिद तेथील मंदिरे फोडून बांधली गेली. तेथे 27 मंदिरे होती. या प्रकरणात याचिकाकर्त्यांनी त्यांच्यासमवेत जैन तीर्थंकर वृषभदेव आणि भगवान विष्णू यांना याचिकाकर्ता केले आहे.
2007 मध्ये व्होडाफोनने हचिसन-एस्सार या कंपनीचे 67 टक्के भागभांडवल 11 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केले. व्होडाफोनने नेदरलँड्स आणि केमन बेटांमधील कंपन्यांमार्फत हा भाग घेतला.
इशरत हिच्यावर तिहार तुरुंगात हल्ला करण्यात आला तसेच तिला मारहाण करण्यात आल्याचे या अर्जात म्हटले गेले. तिहार तुरुंगात झालेल्या कथित हल्ल्यादरम्यान इशरत हिच्या डोक्यावर वार करण्यात आले तसेच तिचे कपडेही फाडण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयानेही विनंती केली आहे, की दिल्ली आणि इतर राज्यातील व्यापारी आणि लोकांच्या समस्या लक्षात घेता या प्रकरणातील सुनावणीची तारीख त्वरित निश्चित करण्यात यावी.
‘द डॉन’ च्या म्हणण्यानुसार देशातील बहुतांश भागात थंडीचा कडाका वाढल्याने अंड्याचे भाव ३५० पाकिस्तानी रुपये (सुमारे १६० रुपये) डझनपर्यंत गेले आहेत.
ब्रिटनमधील आघाडीची कंपनी असलेल्या केर्न एनर्जीने 2007 मध्ये भारतात व्यवसायास सुरुवात करताना कर महसूल बुडवल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता.
६९ टक्के नियुक्त्या महिलांच्या झाल्या. पॅरिस सिटी हॉलमध्ये केलेल्या या नियुक्त्यांमुळे २०१३ मध्ये बनवलेल्या नियमांचे उल्लंघन झाले आहे.
देशभरात वीज कंपन्यांची मक्तेदारी आहे. ग्राहकांना कोणताही पर्याय नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांना अधिकार देण्यासाठी नवीन नियम व अंमलबजावणी करणे आवश्यक होते.
परीक्षा रद्द करणे आणि विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करणं विद्यार्थ्यांना भविष्यात अडचणीचे ठरेल. त्यामुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द न करता पुढे ढकलल्या जातील.
मर्यादा पुरुषोत्तम रामाचे मंदिर हे देशाच्या अस्मितेचे मंदिर आहे व त्यासाठी जगभरातील हिंदुत्ववाद्यांनी आधीच खजिना रिकामा केला आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करून काय साध्य करणार?', असा सवाल शिवसेनेने केला आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी अनेकदा चर्चेत येणारे भाजप खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी, भारतात मुस्लिमांना दिला जाणारा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा, अशी मागणी करताना साक्षी महाराज यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यादरम्यान कोणत्याही पद्धतीची व्हीआयपी व्यवस्था तैनात करण्यात आली नव्हती. तसंच सामान्य जनतेला रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणत्याही पद्धतीचा बंदोबस्त किंवा ट्राफीक बॅरियर लावण्यात आले नव्हते.
नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्षातील अंतर्गत मतभेद उफाळून आले असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षात दोन गट पडले आहेत. एका गटाचे नेतृत्व के.पी. शर्मा ओली करत आहेत.
अयोध्येतील प्रस्तावित ठिकाणी मशीद उभारण्याचं काम २६ जानेवारीपासून सुरू करण्याची तयारी देखील केली जात आहे. अयोध्येच्या धन्नीपूर येथील भागात मशीद उभारली जाणार आहे.
नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी बेंजामिन यांनी सर्वांत प्रथम स्वत:वर लस टोचून घेतली. नेतन्याहू यांच्यासह इस्रायलचे आरोग्य मंत्री युली एडेलस्टीन यांनादेखील कोरोनाची लस टोचण्यात आली.
पंतप्रधान मोदींनी मराठीत ट्विट कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे शेतकऱ्यांसाठी लिहीलेलं पत्र वाचण्याचं केलं आवाहन
कोरोना संसर्गाचा धोका अजूनही टळलेला नाही, अशावेळी कोविड पासून सुरक्षित राहण्याच्या नियमांचे पालन करत राहावे असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार मा. गो. वैद्य यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेत आमदारकीचाही राजीनामा दिला.
मोदींचं कार्यालय विकण्यास टाकत याची किंमत त्याची किंमत ७.५ कोटी रूपये ठरवण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.
कायदा लागू झाल्यानंतरही एमएसपी पूर्वीप्रमाणे जाहीर कऱण्यात आला. मला देशातील प्रत्येक शेतकऱ्याला आश्वासन द्यायचं आहे की, एमएसपी बंद होणार नाही आणि संपणार सुद्धा नाही.
केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने संदीप, लवकुश, रवी आणि रामू यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि हत्येचे आरोप केले आहेत आणि हाथरस येथील स्थानिक न्यायालयाने दखल घेतली आहे.
महत्वाच्या क्षेत्रामध्ये आर्थिक पुनरूज्जीवनासाठी राष्ट्रीय पायाभूत सुविधांविषयी गडकरी यांनी आपली मते व्यक्त केली.
कोरोना काळात विमान सेवा देणाऱ्या कंपन्या आर्थिक संकटात आल्या आहेत. एअर इंडिया कंपनीने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक उत्तम योजना आणली आहे.
कोरोना संकटाच्या काळात संसदेत इतक्या घाईघाईत कृषी कायदे मंजूर का केले गेले? राज्यसभेत तर कुठलंही मतदान घेता तिन्ही कृषी कायदे मंजूर झाले. याचा निषेध करतो.
बैठकीतून बाहेर येताच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. "संसदीय समितीने सैन्याच्या गणवेशावर चर्चा करुन वेळ वाया घालवला.
पंतप्रधान मोदी यांनी 27 नोव्हेंबरला फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान जॉन्सन यांना हे आमंत्रण दिले होते. जॉन्सन यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे.
सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी १२ सिलिंडवर अनुदान दिले जाते. मात्र त्यानंतर प्रत्येक सिलिंडर बाजार भावाप्रमाणे खरेदी करावा लागतो.
कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी हिवाळी अधिवेशन घेऊ नये असं अनेकाचं मत होतं. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन थेट जानेवारीत बोलावण्यात येईल.
भाजपने राष्ट्रीय ऐक्याचे तुकडे केले आहेत, निर्लज्जपणे हिंदूंना मुस्लिमांच्या विरोधात भडकवले आणि आता शीख बांधवांविरूद्ध असं करीत आहे.
सुमारे पाऊण तास गूगलसेवा ठप्प होती. सोमवारी सायंकाळी 5.30 नंतर अडथळा येऊ लागला. त्यानंतर रिफ्रेश करूनही माहिती अपडेट होत नसल्याचं दिसून आलं.
संसदेच्या नवीन इमारतीची तुलना चीनच्या विख्यात भिंतीबरोबर करायची आहे का? असा प्रश्न कमल हासन यांनी विचारला.
डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी सरकारनं नीट मधूनही सुट देण्याची तयारी केली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर डॉक्टरांना १० वर्षे शासकीय रुग्णालयात सेवा करावी लागणार आहे. मध्येच सेवा सोडल्यास १ कोटी रुपये दंड डॉक्टरांकडून वसूल केला जाणार आहे.
माझी ममता बॅनर्जींना विचार करावा अशी विनंती आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची मी गंभीर दखल घेतली आहे. कायदा आणि राज्यघटनेवर विश्वास असणारी मुख्यमंत्री असं वक्तव्य कसं काय करु शकते?
हल्ल्याचा डाव रचला होता का? त्यांनी व्हिडीओ कसे काय तयार केले? बीएसएफ आणि सीआरपीएफची सुरक्षा असताना तुम्हाला कोणी हातही लावू शकेल का? असं ममता यांनी म्हटलं आहे.
राज्यातील ४५ हजारांहून अधिक खासगी डॉक्टर त्यात सहभागी होतील, असे 'आयएमए'ने म्हटले आहे.
आपल्या सर्वांना लोकप्रतिनिधी म्हणून हे लक्षात ठेवायला हवं की लोकशाही ही संसद भवनाचा मूळ आधार असून तिच्याबद्दलचा आशावाद आपण कायम ठेवला पाहिजे.
तृणमूल काँग्रेसकडून या प्रकारावर प्रतिक्रिया देण्यात आली असून पक्षाचे नेते मदन मित्रा यांनी सांगितले की, "त्यांचेच गुंड हिंसाचार करत आहेत". आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे.
या प्रस्तावामुळे देशातील सार्वजनिक वायफाय नेटवर्कच्या विस्ताराला चालना मिळेल आणि पर्यायाने ब्रॉडबँड इंटरनेटचा प्रसार होईल, जनतेचे उत्पन्न वाढेल आणि रोजगारवाढ आणि सबलीकरणाला यामुळे मदत होईल.
प्रताप सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चांदोळे यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली . चांदोळे हे टॉप्स समूहाचे भागीदार आहेत.टॉप्स सिक्युरिटी' या समूहाविरोधातील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी सरनाईक कारवाई करण्यात आली.
हे प्रकरण गंभीर आहे आणि मोठे आहे त्यामुळे विस्तृत सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल असे या घटनापीठने म्हटले आहे. पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठापुढे आज सुनावणी पार पडली.
2015 नेपाळमध्ये मोठा भूकंप आला होता. त्यानंतर असं बोललं जात होतं की माऊंट एव्हरेस्टची उंची 8848 मीटर राहिली नाही. यामुळे नेपाळ सरकारने एव्हरेस्टची उंची मोजण्याचं ठरवलं.
युपीए सरकार असताना त्यावेळी तत्कालीन कृषीमंत्री अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचं पत्रात म्हटलं होतं.
९ डिसेंबर रोजी शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात सहाव्यांदा चर्चा होणार आहे. यापूर्वी पाच वेळा झालेल्या चर्चेतून कोणताही निष्कर्ष आलेला नाही. त्यामुळे आता उद्या ९ डिसेंबर रोजी शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याशिवाय देशातील अनेक राज्यांत वेगवेगळे राजकीय पक्ष या बंदला पाठिंबा दर्शवत रस्त्यावर उतरले आहेत. ओडिशातही भारत बंदच्या समर्थनार्थ डाव्या पक्षांनी भुवनेश्वर येथे रेल्वे अडवल्या.
सध्याच्या संसद भवनाचे उद्घाटन १९२७ मध्ये झालं होतं. तत्कालिन परिस्थितीनुसार त्याची निर्मिती करण्यात आली होती. केंद्रीय सचिवालयासह राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंतच्या तीन किलोमीटर परिसराला नवीन रूप देण्यात येणार आहे.
सैन्य दलाच्या हितासाठी योगदान करा. या कार्यामुळे शूर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना बरीच मदत मिळेल.", असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं "वैयक्तीक महत्वाकांक्षेच्या पोटी अशी याचिका केली असल्याची टिप्पणी केली.
महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करतो. त्यांचे विचार आणि आदर्श लाखो लोकांना धैर्य देत आहेत. त्यांनी आपल्या देशासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचं देशाच्या कृषी क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे. या राज्यातील शेतकऱ्यांकडून पिकवला जाणारा गहू आणि तांदूळ केवळ देशातच नाही तर इतर १७ ते १८ देशांना निर्यात केला जातो.
शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना शिवसेनेनं पाठिंबा दिला असून दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्येही शिवसेना सहभागी होणार आहे, अशी माहिती अकाली दलाचे खासदार चंदू माजरा यांनी दिली आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटीश-स्वीडन कंपनी अॅस्ट्राझेन्कासोबत कोविड -19 ची लस निर्माण करण्याचं काम करीत आहेत.
आम्ही आता अहिंसेच्या मार्गावर चालणार नाही हे सरकारने लक्षात असू द्यावं असं शेतकरी संघटनांनी म्हटलं आहे.
शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची केंद्र सरकारसोबत सुरू असलेली चर्चा देखील फोल ठरत असल्याचं दिसून येत आहे. केंद्रासोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते हरविंदरसिंग लखोवाल यांनी ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद'चे आवाहन केले आहे.
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
पाच सदस्यांची समिती नेमून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव ३५ शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी फेटाळला.
गेल्या दोन दशकांतील आकडे आणि कल यानुसार मलेरियाचे लक्षणीरित्या कमी झालेले प्रमाण दाखवतात. 2030 मध्ये मलेरियाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट हे त्या दिशेने केंद्र सरकार करत असलेल्या अविरत प्रयत्नांमुळे साध्य होताना दिसत आहे.
मालवीय यांचा व्हिडिओची सत्यता पडताळण्यात आली तेव्हा त्यांनी केलेला हा दावा सपशेल खोटा ठरला. आंतरराष्ट्रीय माध्यमाद्वारे शेअर केलेल्या घटनेचा हा व्हिडिओ पडताळण्यात आला. यात पोलिसांनी त्या वृद्ध शेतकऱ्याला मारल्याचे निदर्शनास आले.
आपण एक उज्ज्वल आणि अंतर्दृष्टी असलेले , राष्ट्रीय विकासाबाबत उत्साही व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रति शोकसंवेदना. ओम शांती."
रेल्वेने केलेल्या कामगिरीवर भर देत गोयल म्हणाले, “35 वर्षांपूर्वी राजस्थान येथील कोटा-मुंबई मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम झाले
भारताने आयोजित केलेल्या एससीओ सरकारांच्या प्रमुखांच्या 19 व्या परिषदेला आभासी पद्धतीने संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले भारताने नेहमीच दहशतवादाचा निषेध केला आहे.
आपली एक अतिशय प्राचीन काळातली देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती कॅनडावरून परत भारतात येतेय. ही मूर्ती जवळपास 100 वर्षांपूर्वी वाराणसीच्या एका मंदिरातून चोरून बाहेर पाठवली होती, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
उत्तर प्रदेश सरकारच्या या कायद्यानुसार आता आंतरधर्मीय विवाहासाठी 2 महिन्यांची नोटीस द्यावी लागणार आहे. तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी देखील घ्यावी लागणार आहे. जर कोणत्याही तरुणाने आपलं नाव लपवून लग्न केलं तर त्याला 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
राजकोटमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत जी जीवितहानी झाली त्याचे मला अतीव दुःख होत आहे. या दुर्दैवी घटनेत ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांच्याबद्दल मला सहवेदना आहे.
जवळपास 33 रुग्ण उपचार घेत होते. मात्र गुरुवार मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णालयातील आयसीयू विभागात आग लागली. त्यावेळी आयसीयूत 11 रुग्णांवर उपचार सुरु होते.
भारतात दरवर्षी एकूण सुमारे 1.7 कोटी दुचाकींचे उत्पादन होते. यामुळे आता देशात दुचाकी वाहनांसाठी केवळ बीआयएस प्रमाणित दुचाकी हेल्मेट उत्पादित केली जातील आणि विकली जातील.
कर्मचारी स्वयं सेवा (ईएसएस) मॉड्यूल, रेल्वे कर्मचाऱ्यांना डेटा बदलण्याच्या संदर्भात संवादासह एचआरएमएसच्या विविध विभागांशी संवाद साधण्यास सहाय्य करेल.
'वन नेशन वन इलेक्शन' बद्दल गांभीर्याने विचारमंथन आवश्यक आहे. 'वन नेशन वन इलेक्शन' केवळ विचार मंथनाचा विषय नाही ही देशाची गरज आहे
2018 साली काँग्रेसचे खजिनदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. पटेल आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 अ अंतर्गत 29 जून, 2020 रोजी भारत सरकारने 59 मोबाइल अॅप्सवर आणि 2 सप्टेंबर, 2020 रोजी आणखी 118 अॅप्सवर आणखी बंदी घातली होती.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसेच कंटेन्मेंट क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल.
तीन ते चार आठवडे अमेरिकेतील निवडणुकाचे निकाल जाहिर होऊन उलटले असून आपल्या बाजूने निकाल येईल असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प वारंवार व्यक्त करत होते.
आगामी पाच वर्षात स्वयंचलित वाहन उत्पादनामध्ये भारत वैश्विक केंद्र बनावे, यासाठीही सरकार कार्यरत असल्याचे महामार्ग मंत्री गडकरी यांनी सांगितले.
आसामध्ये ते 2001 ते 2016 पर्यंत सत्तेत होते. सलग तीन टर्म सत्तेत असणाऱ्या गोगोई यांची राजकीय कारकीर्द पन्नास वर्षांपेक्षा जास्त होती.
सुरक्षा दलांची ही कारवाई म्हणजे दहशतवादी आणि त्यांचं पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानला इशारा आहे. सुरक्षा दलांनी आता धडक कारवाई केली असू भारतात घुसखोरी करून दहशत माजविणाऱ्यांना सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
पीओकेमधील दहशतवादी तळ नष्ट केल्याच्या वृत्तावर भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे
राजधानी दिल्लीत वाढत्या कोरोना प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली ज्यामध्ये भाजप आणि काँग्रेसनेही भाग घेतला.
मुंबईत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणासाठी सीबीआय चौकशीची मागणी झाल्यानंतर केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू झाला.
यावेळी मुख्यमंत्री भाजपचा व्हावा अशी माझी इच्छा होती. पण भाजपच्या लोकांनी मला मुख्यमंत्री होण्याची विनंती केली.
सिद्धान्त मिडियाचा लोकशाही आघाडी दिवाळी विशेषांक.
आतापर्यंत आलेल्या निकालांमध्ये १४४ जागा लढवणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाला ६५ जागांवर आघाडी मिळाली आहे.
गंगा नदीसंदर्भात सुरु असलेल्या कामांचा उल्लेख करत काशीसाठी या नव्या संधी असून इथल्या घाटांची स्थिती सुधारत आहे, स्वच्छता आणि गंगा घाट सुशोभिकरणामुळे शहराला नवा चेहरामोहरा प्राप्त होत असल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारने आपल्या राज्याच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणास सर्वोत्कृष्ट प्राधिकरण म्हणून सन्मान केल्याने, प्राधिकरणाचे कार्य, महत्व आणि आवश्यकता याची प्रचिती इतरही सर्व राज्यांना होईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे एसईबीसी प्रवर्गाचे नोकर भरतीतील उमेदवार व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रभावित झाले आहेत.
5 नोव्हेंबर 2020 पर्यंत, केंद्र सरकारने आपल्या नोडल संस्थेच्या माध्यमातून, 27,105 लाख मेट्रिक टन मूग, उडीद, भुईमुगाच्या शेंगा आणि सोयाबीनची खरेदी हमीभावानुसार केली आहे.
पर्यावरण आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रांवर जैव-गतिशीलतेचा चांगला परिणाम होण्यासाठी, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा उत्तम वापर केल्याबद्दल जावडेकर यांनी यावेळी प्रमोद चौधरी यांच्या नेतृत्वाखालील चमूचे अभिनंदन केले.
हवाई वाहतूक मंत्रालय दररोज होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेऊन आहे आणि सणासुदीच्या काळात वाहतूक आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे
केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जल क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी वर्ष 2019 चे ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ घोषित झाले आहेत. विविध 12 श्रेणींमध्ये एकूण 88 पुरस्कार जाहीर झाले आहेत.
गोस्वामी यांच्या अटकेची तुलना भाजपने आणीबाणीसोबत केली आहे.
नितीश कुमार हे ६ वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. नितीश कुमार यांनी 2004 मध्ये शेवटची निवडणूक लढवली होती.
अतिशय कमी वेळेत सहा रॉकेट सोडले आणि चाचणीचे उद्दिष्ट साध्य केले. चाचणी केलेल्या रॉकेट्सची निर्मिती मेसर्स इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड, नागपूर यांनी केली असून ज्यांना तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात आले आहे.
हाती आलेल्या निकालावर दोन्ही नेत्यांनी असमाधान व्यक्त केले आहे. मतमोजणीत अनेक ठिकाणी गैर प्रकार सुरू आहे, असा गंभीर आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला
कांजूरमार्गमधील ज्या १०२ एकर सरकारी जमिनीवर मेट्रो ३ चे कारशेड उभारण्यात येत आहे, ती जागा मीठागराची असून मीठ संचालनालय गुजरात केडरचे सनदी अधिकारी गुरुप्रसाद मोहपात्रा प्रमुख असलेल्या डीपीआयआयटीला रिपोर्ट करते.
बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यासाठी १७ जिल्ह्यांमधील ९४ जागांसाठी मतदान होत आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. यासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मधुबनीतील सभांना संबोधित करण्यासाठी पोहोचले होते.
दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यापासून दूर राहा असंही म्हटलं आहे.
कोरोना संकटाच्या वेळी लोकांचे प्राण वाचविणे हि पहिली महत्वाची गोष्ट आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की सरकारने 16 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्टार कॅम्पेनर यादीतील नाव काढून टाकण्याचा जो आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
पंजाबमधील मालवाहतूक खंडित असूनही व्यवसाय वृद्धीसाठी विभागीय पातळीवरील घटकांनी रेल्वे मालवाहतूकीचा वेग दुप्पट करण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी चांगले योगदान दिले आहे.
त्यांचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून, काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यावरून चिमटे काढले आहेत.
एक घोटाळेबाज आणि एक धोकेबाज, बिहारची जनता करणार दोघांचा उपचार! असेही सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच बोले बिहार बदलें सरकार हा हॅशटॅगही वापरला आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अद्ययावत न्याय कौशल केंद्राचे (ई-रिसोर्स सेन्टर) उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते आज झाले.
कोर्टाने कुराणातल्या हादीसचं उल्लेख करत असं मत नोंदवलं होतं की, इस्लाम विषयी माहिती न घेता, त्या धर्मातल्या तत्व आणि शिकवणुकीचा अभ्यास न करता धर्मांतर करणं हे इस्लामला मान्य नाही. कोर्टाचा हा निर्णय दूरगामी परिवर्तन करणारा ठरू शकतो.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात आपले भाषण सुरुच ठेवले होते.
जातीनिहाय लोकसंख्येची गणना व्हावी का यासंबंधी नितीश कुमार यांनी स्पष्ट भाष्य केले नाही. याआधीही ही मागणी नितीश कुमार यांनी केली आहे.
‘गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. केशुभाई एक लोकप्रिय नेते होते आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब आणि वंचितांच्या सेवेसाठी समर्पित केले होते.
एका अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेले आपले केशुभाई,शेतकरी, गरीबांचे दुःख जाणून होते, त्यांच्या वेदना त्यांना माहित होत्या. शेतकऱ्यांचे कल्याण त्यांच्यासाठी सर्वोच्च होते.
सध्या अस्तित्वात असलेली वेग-वेगळ्या टेलिकॉम सर्कलसाठी वेगळ्या इंडेन रिफील नोंदणी क्रमांकाची योजना 31.10.2020 च्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत आहे.
गेल्याच महिन्यात केशुभाई पटेल यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातून ते कसेबसे सावरत असतानाच सकाळी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हरिश यांच्या प्रमाणेच कॅरोलिनचाही हा दुसरा विवाह आहे. ५६ वर्षीय कॅरोलिन ब्रिटीश कलाकार आहे आणि तिला एक मुलगीही आहे.
'मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून राज्य सरकारने स्थापन केलेल्या उपसमितीच्या माध्यमातून आपण प्रामाणिक प्रयत्न केले.
सहभागी वक्त्यांनी सांडपाणी निर्मिती, सांडपाण्यावर प्रक्रिया आणि विद्यमान सांडपाणी प्रक्रिया मूलभूत सुविधांचा क्षमता वापर याविषयी विश्वसनीय माहितीचा असलेला अभाव यावर प्रकाश टाकला.
डॉ तुलसी दास चुघ पारितोषकाचे स्वरुप मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असे आहे. अकादमीच्या वार्षिक परिषदेत पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
शेतकर्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी 27500 मे.टन पोटॅश खताची आयात केली आहे. सामान उतरवण्याचे व पोती भरण्याचे काम केले जात आहे.
राज्ये ही सेवा अधिक व्यापक करत असून तज्ञाद्वारे देण्यात येत असलेली ही सेवा आता ई संजीवनी (एबी-एचडब्ल्यूसी)द्वारे छोटी शहरे आणि ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
मागील आठवड्यात अंखी दास यांची डाटा प्रायव्हसीच्या मुद्द्यावर संसदीय समितीने चौकशी केली होती. यावेळी त्यांची जवळपास २ तास कसून चौकशी करण्यात आली होती.
फेब्रुवारी 2020 मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा यशस्वी झाला होता, त्याच्या आठवणी जाग्या करून त्यांनी पंतप्रधानांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
भारत आणि अमेरिका यांनी यापूर्वी ज्या विषयांवर सहकार्य करण्यासाठी चर्चा केली त्याचाच यापुढेही पाठपुरावा करण्यासाठी उचललेली पावले आहेत.
बाहेरचे उद्योग जम्मू-काश्मीरमध्ये स्थापन करावयाचे आहेत. यासाठी इंडस्ट्रियल लँडमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. पण केवळ राज्यातील जनतेसाठी शेतीची जमीन असणार आहे.
काही काळासाठी राज्य सरकारची बाजू मांडणार वकील मुकुल रोहतगी उपस्थित नसल्याने ही सुनावणी तहकूब करण्यात आली होती. मात्र, आता व्हीसीच्या माध्यमातून रोहतगी उपस्थित झाले होते.
ज्या महान लोकांनी २०११ पासून २०२० पर्यंत हे काम केलंय, त्यांचे फोटो या कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा,' असा टोला गडकरींनी अधिकाऱ्यांना लगावला.
रिलायन्स आणि फ्युचर समूहामधील हा व्यवहार जवळजवळ २५ हजार कोटींचा आहे. अॅमेझॉनने फ्युचर कूपन या कंपनीला एक कायदेशीर नोटीस पाठवली होती.
मुळचे महाराष्ट्रातील नागपूरचे असणारे हरिश साळवेंनी धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे
जेव्हा आपण लोकलसाठी व्होकल होत आहोत तेव्हा जगही आपल्या लोकल उत्पादनांची चाहती होत आहे. असेच एक उदाहरण आहे खादीचे.
'हिंदुत्व हा असा शब्द आहे ज्याचा अर्थ पूजेशी जोडून संकुचित केले गेले आहे. संघाच्या भाषेत या संकुचित अर्थाने हा शब्द वापरला जात नाही.
अलिकडच्या काळात 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 8 पदके जिंकून त्याच वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच पदके जिंकून भारताने टेबल टेनिसमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
सरकारने या आधी 24 जून 2020 रोजी एका अध्यादेशाद्वारे आर्थिक वर्ष 2019-20 (मुल्यांकन वर्ष 2020 -21) साठी आयकर भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवली
गेल्या ३५ वर्षात अमेरिकेत सर्वात कमी कार्बन उत्सर्जन होत आहे. आपली हवा स्वच्छ आहे. पाणी सर्वात स्वच्छ आहे आणि कार्बन उत्सर्जन सर्वात कमी आहे.
दिवस आणि रात्रीच्या परिस्थितीत शत्रूंच्या संरक्षित रणगाड्यावर लक्ष ठेवण्य्साठी डीआरडीओने एटीजीएम नाग विकसित केले आहे.
रिअर ॲडमिरल अँटोंनी जॉर्ज VSM, NM, मुख्य कर्मचारी अधिकारी (प्रशिक्षण) SNC या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला वैमानिकांचा पुरस्कार देऊन गौरव केला.
माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली असून,संसर्गाची पहिली पातळी आहे. ताप नाही. मागील 2 दिवस चांगल्या देखरेखीसाठी पटना येथील एम्स येथे दाखल झालो आहे.
बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसला हरवण्यासाठी आणि बिहारमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपने संकल्पपत्रात 11 मोठ्या घोषणा केल्या आहेत.
३० लाख गैर-राजपत्रित कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. हा बोनस ३७३७ कोटी एवढा असल्याचे जावडेकर म्हणाले.
राज्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांचे मूल्यांकन केल्यानंतर या दोन्ही विशेष अधिका-यांनी 91 विधानसभा मतदारसंघांना अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी चिह्नित केले आहे.
लस विकसित होईपर्यंत बेपर्वाईने वागू नका” हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचे मार्गदर्शक मंत्राप्रमाणे पालन करण्याची विनंती मी प्रत्येकाला करतो.
कोरोना प्रतिबंधक लस येत नाही तो पर्यंत लढा कायम राहिल असे त्यांनी आपल्या संबोधनात म्हटले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आरएलएसीने कलम ३६१ नुसार नोटीस पाठविली होती.
राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांनी काय बोलावं याबाबत ट्विट केले होते. काही मिनिटांमध्येच हे ट्विट सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.
आज संध्याकाळी ६ वाजता देशाला संबोधित करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे दिली.
सरकारकडून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या नियमांची आखणी केली जाईल. यानंतर लवकरच नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होईल
चीनकडूनही बेपत्ता झालेल्या सैनिकाच्या ठावठिकाण्याबाबत विनंती प्राप्त झाली आहे.
गडकरी यांनी या पत्राद्वारे महाराष्ट्रात दरवर्षी पुरामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जीवित आणि वित्तहानीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
अरबी समुद्राच्या पूर्व मध्य व ईशान्य भागात ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील
कपिलदेव कामत मधुबनी जिल्ह्यातील बाबूबरही मतदारसंघातून संयुक्त जनता दलाचे (JDU) आमदार होते.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकात पुढील 12 तासांत 30-40 किलोमीटर ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील.
या प्रकल्पाच्यावतीने अलिकडेच 3,834 मेट्रिक टन फ्लाय ॲश रेल्वेच्या मालवाहू वाघिणीतून दालमिया येथे आसाममधल्या नागाव इथल्या भारत सिमेंट कारखान्याला पाठवली आहे.
काँग्रेस आणि राजदसोबत एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती.
सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोलिंग झाल्यामुळे ही जाहीरात ‘तनिष्क’ला मागे घ्यावी लागली होती. शोरूम च्या मॅनेजरला माफी मागायला जमावाने भाग पाडलं.
लखनौ, दि. १४ ऑक्टोबर: एका महिलेने पुन्हा मंगळवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या महिलेने ज्वालाग्रही साहित्य टाकून स्वतःला पेटविले आहे. या महिलेला चिंताजनक स्थितीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलचे सीएमएस डॉ. एसके नंदा यांच्या म्हणण्यानुसार, महिला नव्वद टक्के भाजली आहे.
निवडणूक आयोगाने बिस्कीट हे चिन्ह बदलून द्यावं, अशी मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली होती.
आगामी सण-उत्सव काळातील अपेक्षित गर्दी टाळण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने सणवारांच्या काळात ‘उत्सव विशेष’गाड्यांच्या 196 फेऱ्या (एकूण 392 गाड्या) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष गाड्या 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात चालवल्या जातील.
भारतीय इलेक्ट्रोनिक्स आणि कॉम्पुटर सॉंफ्टवेअर निर्यात प्रोत्साहन परिषद आणि मेक्सिकोतील समकक्ष संस्थेदरम्यानही एक सामजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
कोरोना लसीच्या चाचणीमध्ये सहभागी असलेल्या काही स्वयंसेवकांना अचानक आजारपण आल्यामुळे या चाचण्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहे.
अमूलनेही या वादग्रस्त चॅनेल्सवरील आपल्या जाहिराती बंद करण्याचे संकेत दिले आहे. काही दिवसांपूर्वी तीन चॅनेल्सचे नाव टीआरपी स्कॅममध्ये माध्यमांत झळकले होते.
322 प्रकल्पांना 12,413 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या बांधकामाचे वाटप करण्यात आले असुन, आतापर्यंत 2931 किलोमीटर रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
पंतप्रधानांनी यावेळी ‘स्वामित्व योजने’च्या लाभार्थींना शुभेच्छा दिल्या. या लाभार्थींना त्यांच्या घरकुलाच्या स्वामित्वाची नोंद असणारे कार्ड देण्यात आले आहे.
सीएसआयआर आणि केपिआयटीने यशस्वीरित्या 10 kWe क्षमतेची स्वयंचलित श्रेणीची एलटी-पीईएमएफसी इंधन सेल विकसित केले आहे, जे सीएसआयआरच्या कृतीतून ज्ञान (know-how) कार्यक्रमावर आधारीत आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याबरोबरच सर्वपक्षीय नेते पासवान यांना अंतिम निरोप देण्यासाठी उपस्थित राहिले.
स्वामित्व ही केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जाणारी योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 एप्रिल 2020 रोजी या योजनेची सुरुवात झाली.
संरक्षण क्षेत्रामधील त्यांचे योगदान अनेकपटींनी वाढले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या सर्व युद्धांमध्ये टीए बटालियनचा सहभाग होता.
भारतीय हवाईदलासाठी तयार करण्यात आलेले ‘रूद्रम’ हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे पहिले रेडिएशनविरोधी क्षेपणास्त्र आहे. यासाठी प्रेक्षपण प्लॅटफॉर्म म्हणून एसयू-20 एमके1 या विमानाचा वापर केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर त्यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
JDU ने बुधवारी त्यांच्या कोट्यातील सर्व ११५ उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीमध्ये गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नाही आहे. उमेदवारी न मिळाल्याने निराश झालेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणुक लढवणार असून याबाबतची माहिती लवकरच राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक जाहीर करतील.
तुम्ही केवळ देशाचे आकाशच सुरक्षित ठेवत नाही तर, आपत्कालीन परिस्थितीत मानवतेची सेवा करण्यात अग्रणी भूमिका निभावता.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, जर कोणी 130 कोटी भारतीयांच्या आकांक्षा खरोखरच समजत असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. आपल्या दूरदर्शी विचारसरणीने ते बलवान, आधुनिक आणि स्वावलंबी असा भारत निर्माण करीत आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर दीर्घकाळापासून असलेले दृढ स्नेहबंध आणि मैत्रीसंबंधीच्या आठवणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाग्या केल्या.
आरोग्य सेवा श्रेणीमध्ये ‘वेल्दी थेरपेटिक्स प्रायव्हेट लिमीटेड’ आणि नागरी सेवा श्रेणीमध्ये ‘तरलटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमीटेड’ला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
केंद्रीय मंत्री श्री. प्रधान यांनी आज आयोजित कार्यक्रमात व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सर्व ४२ सीएनजी आणि ३ सिटी गेट स्टेशन्स जोडली.
या कायद्यांना पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक विरोध असून त्यांनी याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडले आहे.
जागा वाटप जाहीर होताच मुकेश साहनी यांच्या व्हीआयपी पक्षाने नाराजी व्यक्त केली. जागा वाटपात अन्याय झाल्याची भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली.
साडेनऊ किलोमीटरच्या बोगद्यामुळे आता जवळपास 45-46 किलोमीटर अंतर कमी झाले आहे. या बोगद्यामुळे या भागातल्या जीवनामध्ये अमुलाग्र परिवर्तन घडून येण्यास मदत होणार आहे,
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने सगळा देश हादरला आहे. या प्रकरणी योगी सरकार गप्प का असा प्रश्न विरोधक सातत्याने उपस्थित करत आहेत.