भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान ४०० पारचा नारा दिला होता.
दिल्ली, दि. ४ : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तसेच इंडिया आघाडीला १५० ते १७० जागा मिळतील, असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं. असं असलं तरी NDA ४०० पार की I.N.D.I.A बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान ४०० पारचा नारा दिला होता. संपूर्ण प्रचारात भाजपाच्या नेत्यांनी ४०० पारच्या नाऱ्यावर नेत्यांनी भर दिला. मात्र, निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे आकडे समोर आल्यानंतर एनडीए ४०० पार करणार नाही तर ३७५ पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.