यादरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले.
बारबोडस, दि. ३० : शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले. सामन्यातील अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने दमदार गोलंदाजी केली. भारताला विजयासाठी ६ षटकांत १६ धावांची गरज होती. तर मैदानात मिलर आणि केशव महाराजची जोडी होती. हार्दिकने फुलटॉस चेंडू टाकला जो मिलरने जोरदार फटका लगावला पण सीमारेषेवर उभा असलेल्या सूर्याने आश्चर्यकारक झेल टिपला आणि भारताच्या दिशेने सामना फिरवला. २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन बनला होता. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने विजय मिळवत सर्वांचे स्वप्न साकारले. १७७ धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकांत ८ विकेट गमावून केवळ १६९ धावा करता आल्या आणि भारतीय संघाने ७ धावांनी सामना जिंकला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या विजयाचे सर्वात मोठे हिरो ठरले. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी ६ पेक्षा कमी इकॉनॉमीवर धावा दिल्या आणि २-२ विकेट घेतल्या. त्याचवेळी हार्दिक पांड्याने २० धावांत ३ विकेट घेतले.प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. संथ खेळपट्टीवर पॉवरप्लेमध्ये ३ बाद ३४ धावा अशी परिस्थिती असताना भारतीय फलंदाजांनी दमदार पुनरागमन केले आणि टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये सर्वोच्च धावसंख्या केली. या इनिंगमध्ये विराट कोहलीने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. विराट कोहलीने ५९ चेंडूत ७६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले.