नवी दिल्ली, दि. ३० मे : कोरोनाशी लढण्यासाठी पाहिजे, योग्य हेतू, धोरण, निश्चय. महिन्यातून एकदा निरर्थक बोलणे नाही, अशा शब्दांमध्ये ट्वीट करत राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे. कोरोना साथीला रोखण्यासाठी मोदी यांच्या सरकारकडे कोणतीही रणनीती नाही. लसीकरण मोहीम मोदी सरकारने योग्य पद्धतीने राबविली नाही, तर कोरोना साथीच्या लाटांवर लाटा थडकत राहतील व त्या अधिक भयानक असतील असा इशारा राहुल यांनी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला होता. कोरोना साथ भीषण रूप धारण करू शकते, असा इशारा मी पहिल्यापासून देत होतो; पण त्याकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केले. देशातील लोकसंख्येपैकी फक्त तीन टक्के लोकांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.