लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापाठोपाठ दुसऱ्या टप्प्यातही महाराष्ट्रातील नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
मुंबई, दि. २६ : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. देशातील १२ राज्यं आणि एक केंद्रशासित प्रदेशासह ८९ मतदारसंघात मतदान होत आहे. राज्यातल्या ८ मतदारसंघात आज मतदान होत आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापाठोपाठ दुसऱ्या टप्प्यातही महाराष्ट्रातील नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी फक्त ७. ४५ टक्के मतदान झाले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ९.७७ % मतदानाची नोंद झाली आहे. आता पर्यंत ही सर्वाधिक मतदानाची नोंद आहे. अशी आहे मतदानाची लोकसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी परभणी – ९.७७ टक्केनांदेड – ७.७३ टक्केयवतमाळ वाशिम – ७.२३ टक्केवर्धा- ७.१८ टक्केअकोला – ७.१७ टक्केअमरावती – ६.३६ टक्के