IMG-LOGO
महाराष्ट्र

Loksabha Election Phase II : राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदान

Saturday, Apr 27
IMG

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत माहिती देण्यात आली.

मुंबई, दि. २७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :➡️ बुलढाणा –  ५८.४५ टक्के➡️ अकोला – ५८.०९ टक्के➡️ अमरावती – ६०.७४ टक्के➡️ वर्धा – ६२.६५ टक्के➡️ यवतमाळ – वाशिम – ५७.०० टक्के.➡️ हिंगोली –  ६०.७९ टक्के➡️ नांदेड –  ५९.५७ टक्के➡️ परभणी – ६०.०९ टक्के

Share: