IMG-LOGO
साहित्य संमेलन

इगतपुरीतील २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन पुढे ढकलले

Tuesday, Feb 23
IMG

कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात हे २२वे ग्रामीण साहित्य संमेलन दि.२६ आणि २७ फेब्रु.रोजी होणार होते

वाडीव-हे, दि. २३फेब्रुवारी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अवाहनानुसार इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन काही काळासाठी पुढे ढकलले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली आहे.कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात हे २२वे ग्रामीण साहित्य संमेलन दि.२६ आणि २७ फेब्रु.रोजी होणार होते,साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी जेष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांची निवड करण्यात आली होती.आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर साहित्य संमेलनाचे आयोजन याच प्रमुख पाहुन्यांच्या उपस्थितीत पार पडेल अशी माहिती त्यांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध सामाजिक,राजकीय,धार्मिक कार्यक्रमावर बंधने घालून नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते,या अवाहनास प्रतिसाद देत संयोजकांनी हा साहित्य संमेलन पुढे ढकलन्याचा निर्णय बैठकीअंती घेतला, तसेच पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आठ दिवस अगोदर साहित्यप्रेमीना  कळविन्यात येईल अशी माहिती ही पुंजाजी मालुंजकर,बाळासाहेब पलटने प्राचार्य भाबड़,प्रा.देवीदास गिरी,अँड़.ज्ञानेश्वर गुळवे,दत्तात्रय झनकर,हिरामण शिंदे,यांनी दिली आहे.

Share: