कोरोनामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होणारा भारत तिसरा देश ठरला आहे.
नवी दिल्ली, दि. 2 जुलै : कोरोना महामारीनंतर देशात लसीकरण सुरू होऊन आता सहा महिने होत आले आहेत; मात्र अजूनही लसीकरण वेगाने होताना दिसत नाही. याचाच मोठा फटका देशाला बसला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होणारा भारत तिसरा देश ठरला आहे.