IMG-LOGO
राष्ट्रीय

यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सरकारविरोधात ठिय्या आंदोलन

Sunday, Jul 28
IMG

एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे काही यूपीएससीचे विद्यार्थी अडकले होते.

नवी दिल्ली, दि. २८  : मुसळधार पावसामुळे राजेंद्र नगर परीसर जलमय झाला असून याठिकाणी असलेल्या कोचिंग सेंटरच्या तळघरातही पाणी शिरले. त्यामुळे याठिकाणी असलेले लोक अडकले. अग्निशमन दलाला सायंकाळी ७ वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आतमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचे फोन बंद दाखवत असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.हा परिसर यूपीएससी परीक्षेच्या कोचिंग सेंटरसाठी ओळखला जातो. इथे शेकडो यूपीएससीची शिकवणी देणारे वर्ग आहेत. यापैकीच एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे काही यूपीएससीचे विद्यार्थी अडकले होते. त्यापैकी दोन विद्यार्थींनींचा मृत्यू झाला असून आणखी एक व्यक्ती दगावली आहे. त्यासाठी घटनास्थळी अद्याप शोधकार्य चालू आहे. तर इतर विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  या दुर्घटनेत श्रेया, तान्या आणि नेविन या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. श्रेया ही उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगरमधील रहिवासी आहे. तर तान्या सोनी ही मूळची तेलंगणाची आहे. नेविन डालविन हा केरळमधील तरुण या दुर्घटनेत मरण पावला. ही घटना कशामुळे झाली? यास जबाबदार कोण? याबाबत पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यानंतर दिल्ली सरकारने न्यायादंडाधिकाऱ्यांकरवी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी मुख्य सचिवांना याप्रकरणी २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या बाजूला राजेंद्र नगर भागात राहून यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

Share: