एकाच कुटुंबातील चार जणांचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना नांदगाव तालुक्यातील वखारी येथे घडली आहे.
नांदगाव दि ७ ऑगस्ट : एकाच कुटुंबातील चार जणांचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना नांदगाव तालुक्यातील वखारी येथे घडली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ माजली आहे.मृतांमध्ये समाधान चव्हाण,भरताबाई चव्हाण या पती-पत्नीसह त्यांचा ६ वर्षाचा मुलगा गणेश चव्हाण आणि ४ वर्षाची आरोही चव्हाण यांचा समावेश आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरू आहे.