IMG-LOGO
जीवन शैली

मोबाईल कंपन्यांप्रमाणे वॉलेट कंपन्याही बदलता येणार

Friday, May 21
IMG

रिझर्व्ह बँकेने याबाबत काढलेल्या परिपत्रकानुसार ही सुविधा मिळण्यासाठी आणखी एक वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.

सोन्याच्या भावात वाढ; रक्षाबंधनापर्यंत 53 हजार रुपयांपर्यंत जाणार भावमुंबई, दि. २१ मे :  एखाद्या मोबाईल कंपनीची सेवा चांगली नसेल, संपर्कात व्यत्यय येत असेल, तर नंबर कायम ठेवून कंपनी बदलण्याची जशी सुविधा आहे, तशीच सुविधा आता वॉलेट कंपन्यांतही मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेने तसे परिपत्रकच काढले असून त्याचा फायदा आता ऑनलाईन व्यवहार करणार्‍या ग्राहकांना होणार आहे. दरम्यान, सोन्याच्या भावात वाढ होत असून आणखी तीन महिन्यांत भाव 53 हजार रुपये तोळ्याच्या वर जाण्याची शक्यता आहे.रिझर्व्ह बँकेने याबाबत काढलेल्या परिपत्रकानुसार ही सुविधा मिळण्यासाठी आणखी एक वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. 2022 पर्यंत पेटीएम, फोनपे, विप्स वॉलेट आणि मोबिकविक सारख्या मोबाइल वॉलेटवर परस्पर व्यवहार करता येतील. याचा अर्थ असा, की एप्रिल 2022 पासून, मोबाइल वॉलेट वापरकर्ते, ज्यांनी केटीसीचे सर्व नियम पाळले आहेत, ते विविध मोबाइल वॉलेटमधून पैसे पाठविण्यास आणि प्राप्त करण्यास पात्र ठरतील. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे, की कार्ड आधारित पीपीआयसाठी हे कार्ड नेटवर्क इंटरऑपरेबिलिटीद्वारे आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) मार्गे ई-वॉलेटसाठी घेतले जाईल. पीपीआय फॉर मास ट्रान्झिट सिस्टम्सला (पीपीआय-एमटीएस) इंटरऑपरेबिलिटीतून सूट देण्यात येईल. आता मोबाईल वॉलेटचा वापर दोन हजार रुपयांपर्यंतची रोख रक्कम काढण्यासाठी केला जाऊ शकतो. मोबाईल वॉलेटची मर्यादादेखील एक लाख रुपयांवरून दोन लाख रुपये करण्यात आली आहे. या संदर्भातील तक्रारी संबंधित लोकपालच्या कक्षेत येतात.जेव्हा ग्राहक पीपीआय उघडतात, तेव्हा रोख पैसे काढण्यासाठी थोडा वेळ थांबवे लागेल. फसवणूक टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. एप्रिलच्या पतधोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी हे उपाय जाहीर केले. इंटरऑपरेबिलिटीची प्रक्रिया खूपच हळू चालली आहे. सध्या बँकांकडून डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सद्वारे जारी केलेल्या संपूर्ण केवायसी पीपीआयसाठी रोख पैसे काढण्याची परवानगी आहे. आता या नवीन नियमांद्वारे एटीएम, मायक्रो-एटीएम आणि पॉईंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनल्सवर पैसे काढण्यासाठी पेमेंट वॉलेट किंवा प्रीपेड कार्डचा वापर केला जाऊ शकतो.कोरोना कालावधीत सोने आणि चांदीची चमक निरंतर वाढत आहे. सोने पुन्हा एकदा 49 हजारांच्या जवळ पोहोचले आहे. ’इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’च्या वेबसाइटनुसार सोन्याचे दर 48 हजार 593 रुपये तोळा झाले आहेत. चांदीची किंमत प्रति किलो 71 हजार 575 रुपये झाली आहे. या महिन्यात सोन्याचा भाव एक हजार 802 रुपयांनी आणि चांदी तीन हजार 775 रुपयांनी महाग झाली आहे. 30 एप्रिल रोजी सोन्याचे दर 46 हजार 791 रुपये होते, ते आता 48 हजार 593 रुपयांवर आहे. दुसरीकडे 30 एप्रिल रोजी चांदी 67 हजार आठशे रुपये प्रतिकिलो होती. आता ती 71 हजार 575 रुपयांवर पोचले आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये सोन्याचे भाव दोन हजार 601 रुपयांनी आणि चांदी चार हजार 938 रुपयांनी महागली होती. रक्षाबंधनापर्यंत सोने 53 हजारांपर्यंत पोहोचू शकते आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणतात, की कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत पुन्हा एकदा सोन्यात तेजी दिसून येत आहे. त्यांच्या मते रक्षाबंधनापर्यंत सोने 53 हजारांपर्यंत, तर दिवाळीपर्यंत 55 हजारांपर्यंत जाऊ शकते.चीनने संपूर्णपणे क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली आहे. तसेच, सर्व वित्तीय संस्था आणि देयक कंपन्यांनी क्रिप्टोकरन्सी व्यवहाराशी संबंधित सर्व सेवा थांबविल्या आहेत. चिनी सरकारने गुंतवणूकदारांना क्रिप्टो करन्सीस व्यापार करण्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. या व्यतिरिक्त आता गुंतवणूकदार येथून पैसे काढून सोन्यात पैशांची गुंतवणूक करीत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सोने 56 हजार दोनशे रुपयांवर पोहोचले. कोरोना साथीच्या साथीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. सर्वसाधारणपणे असे दिसून आले आहे, की जेव्हा जेव्हा शेअर बाजाराला तोटा होण्याची अपेक्षा असते आणि डॉलरच्या तुलनेत अन्य चलन कमकुवत होते, तेव्हा सोन्याच्या किंमती उसळी घेताना दिसतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,865.07 अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. आगामी काळात ते 1,900 च्या पुढे जाऊ शकते. या महिन्याच्या सुरुवातीस ते प्रतिऔंस पातळीवर 1,770 अमेरिकन डॉलर होते.

Share: