नाशिक,दि. 1 फेब्रुवारी : इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे २५ वे ( रौप्यमहोत्सवी ) ग्रामीण साहित्य संमेलन दि. १६ फेब्रु. २०२५ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यानी दिली.
नुकत्याच झालेल्या मंडळाच्या पदाधिकारी बैठकीत संमेलनाची तारीख निश्चित करण्यात आली असून या रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यासाठी तीन ठिकाणावरून मागणी आलेली असून प्रत्यक्ष पाहणी करून एक ठिकाण निश्चित केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ग्रामीण साहित्यिकांमध्ये उत्साह वाढला असून अनेक नवोदित साहित्यिक संपर्क करून साहित्य संमेलनाविषयी विचारणा करीत आहेत. या पुढील वाटचालीत मराठी वाचन चळवळ वाढविण्यासाठी मंडळा तर्फे अनेक नवनवीन साहित्यिक उपक्रम राबविणार असल्याचे सुतोवाच मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर यांनी केले. या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष ग्रंथमित्र बाळासाहेब पलटने, लेखक दत्तात्रेय झनकर , ॲड.ज्ञानेश्वर् गुळवे,रविंद्र पाटील, हिरामण शिंदे,सुदर्शन पाटील आदि मान्यवर उपस्थित होते