IMG-LOGO
मंथन

शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या; आदित्य होणार का मुख्यमंत्री?

Thursday, Oct 24
IMG

आमचं ठरलंय असं म्हणत विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती झाल असली, तरी निकालानंतरचा कल पाहता महाराष्ट्राच्या सत्ताकारणात शिवसेना किंगमेकर ठरण्याची चिन्हे आहेत

शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या; आदित्य होणार का मुख्यमंत्री?आमचं ठरलंय असं म्हणत विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती झाल असली, तरी निकालानंतरचा कल पाहता महाराष्ट्राच्या सत्ताकारणात शिवसेना किंगमेकर ठरण्याची चिन्हे आहेत. तसे झाले, तर आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्री होऊ शकतात असा होरा राजकीय जाणकारांना वाटतो आहे.दुपा.12 पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार निवडुकीचा कल स्पष्ट होत असून भाजपा सर्वाधिक जागा मिळवत क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. त्याखालोखाल 64 जागा मिळवत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असून 50 जागा मिळवत राष्ट्रवादी कॉँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे.भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी म्हणजेच 101 जागा मिळत असल्याचे चित्र आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा भाजपाचे संख्याबळ 20 ने घटले असल्याचे चित्र आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला त्याचा फायदा होताना दिसत आहे. ही सर्व स्थिती लक्षात घेता शिवसेनेची 'बार्गेनिंग पॉवर' यंदा वाढली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करताना एक तर शिवसेनेच्या अटी नव्याने भाजपाला मान्य कराव्या लागणार आहेत किंवा वेळ पडल्यास सत्तेवरही पाणी सोडावे लागेल अशी स्थिती होऊ शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.शिवसेनेने जर मागच्या वेळेप्रमाणे ऐनवेळेस ताणून धरले, तर भाजपा राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊ शकते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी ऐन निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात लावलेल्या ईडीच्या नोटीसा आणि त्यांच्याच पक्षातून भाजपात झालेले पक्षांतर यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दुखावले गेले आहेत. परिणामी ही शक्यता यंदा तरी भाजपाला आजमावता येणार नाही. मात्र राजकारणात काहीही घडू शकते या उक्तीच्या आधाराने अतिशय अपवादात्मक स्थितीत ही शक्यता वास्तवात येऊ शकते असे जाणकार सांगत आहेत.भाजपाचा आतापर्यंतचा स्वभाव पाहता त्यांनी प्रादेशिक पक्षांना संपविण्याचाच प्रयत्न केला आहे. राज्यातही त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत असेच राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रातही त्यांना कमी जागा दिल्या होत्या. आगामी काळात शिवसेना भाजपासोबत राहिली, तर कदाचित या पक्षाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुत्सुद्दीपणाने लोकसभा आणि विधानसभेत युतीला मान्यता देऊन शिवसेनेचे तारू सावरले आहे.  मात्र भाजपाचा राग शिवसेनेच्या कार्यकर्तर्े आणि नेत्यांमध्ये अजूनही असून वेळ पडल्यास शिवसेना त्याचा वचपा आता काढू शकते अशी शक्यता आहे. याशिवाय आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती राजकारणात आली असून नमनालाच त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवावे असे सेनेला वाटणे स्वाभाविक असू शकते.भाजपामुळे दुखावलेली राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी ऐनवेळेस शिवसेनेला पाठींबा देऊ शकते, तसेच कॉँग्रेसही पाठिंबा देऊन शिवसेनेच्या झेंडयाखाली सत्ता स्थापन करू शकते. यापूर्वी शिवसेना राष्ट्रवादीचा पुणे पॅटर्न चर्चेत होता, तर स्थानिक पातळीवर मालेगाव महापालिकेत सध्या सेना कॉँग्रेसचा मालेगाव पॅटर्न यशस्वी ठरला आहे. त्यामुळे भविष्यात सेना-राष्ट्रवादी अिाण कॉँग्रेस हे नवे समीकरण आल्यास त्यात आश्चर्य असे काहीच असणार नाही.

Share: