कोरोना साथीच एक वैशिष्ट्य आहे ते असे की आप मरे तो मरे यजमान को भी लेकरं मरे म्हणजे आपल्याला कोरोनाची लागण झाली की आपल्या संपर्कात आलेल्या इतरांनाही त्याची लागण झाली असे समजाच !
कोरोना साथीच एक वैशिष्ट्य आहे ते असे की आप मरे तो मरे यजमान को भी लेकरं मरे म्हणजे आपल्याला कोरोनाची लागण झाली की आपल्या संपर्कात आलेल्या इतरांनाही त्याची लागण झाली असे समजाच !#इतर व्याधी ह्या ज्याला त्यालाच भोगाव्या लागतात म्हणजे दमाची व्याधी झाली तर त्या व्यक्ती पुरतीच तो मर्यादित राहील.घरातील एखादी व्यक्ती कामाशिवाय घराबाहेर पडत असेल तर त्याला घरातील इतरांचा विरोध होतो कारण बाहेर कोरोनाच संसर्ग झाला तर तुम्हालाही होईल व घरातील इतरांनाही होईल यामुळे कोरोनाची भिती इतर सर्व रोगापेक्षा अधिक आहे आणि त्यामुळेच साधा सर्दी पडसे खोकला डोके दुखायला लागलं की कोरोनाचा संशय ! यामुळे कोविड 19 मुळे संपूर्ण जग भीतीच्या दाहशती खाली जगत आहे.#केवळ मास्क वापरुन सामाजिक आंतर ठेवून, गर्दीत न मिसळून बाहेरुन असल्यावर स्वच्छ हात धुवून कोरिनाची लागण होणारच नाही असे छाती ठोकपणे सांगू शकत नाही,या रोगाने गरीब श्रीमंत,लहान मोठा,स्त्री पुरुष, उच्च नीच सामान्य असामान्य असा भेदभाव केला नाही,रूग्ण दगावला तर आप्त स्वकीय, मुलगा बायको,शेजारी पाजारी मित्र कोणीही जवळ सुद्धा येत नाही अंतसंस्कार विधी नाही की मंत्र पठण नाही किती भयानकता आहे नाही का ? कोरोनाच्या मृत्यूची !आणि यामुळेच याची भयंकर भीती कोविड19 च्या मरणाची#या रोगावर कुठलीही लस नाही,औषध नाही या रोगाची उपचार पद्धती नाही,रोगाची हिस्ट्री नाही,वैद्यांना अनुभव नाही परिचारिका गोंधळून गेल्या आहेत केवळ WHO आणि MCIR सांगतील तो प्रोटोकाल पाळायचा आणि दुखणं अंगावर काढायचं आणि रोगप्रतिकारक शक्ती संपली की हे राम म्हणायचं#वर्तमानपत्र पत्रातील,बातम्या, सोशल मीडियावर वरील किस्से, दुरदर्शन वरील विविध प्रकारच्या बातम्या वृत्तांत वैध,हकीम यांचे वेगवेगळे सल्ले नुसता वीट आलाय ! अस वाटत रोज मारण्यापेक्षणा एकदाच मरण आलेलं बर असे आता काही लोक म्हणू लागले आहेत#भरीस भर केंद्र सरकार एक सांगते,राज्य शासन एक सांगते,जिल्हाधिकारी वेगळंच सांगतात,महापालिका तिसऱ्याच आदेश काढतात कधी कधी स्थानिक पुढारी (अधिकार),नसताना तिसरच सांगतो, ऐकायचं तरी कोणाचं ?#कोरोनाच संकट कधी संपेल कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही,कधी लॉकडाऊन लावतील आणि कधी तो उठतील याचा अंदाज नाही,साधा एखाद्याला फोन लावायचं म्हटल की मिनिटभर बिना काम के बाहेर मत निकलो असा सल्ला,तेथेही कोरोनाची आठवण आणि पाठोपाठ भीती#सरकारी रुग्णालयात बेड शिल्लक राहिले नाहीत,खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले की तेथील भरमसाठ फी रुग्ण बेदखल व्हायची पाळी आली आहे,रुग्णालयातील उपचार पद्धती आणि त्यातही किस्से हा आणखी वेगळा आणि गहन विषय आहे#या सर्व पार्श्वभूमीवर वैदयकीय विमा कंपन्या पुढे सरसावल्या आहेत त्यांनी वेगवेगळे प्रॉडक्ट आणले आहेत,माझा एक पत्रकार मित्राने तर सांगितलेला किस्सा तर भयानक आहे त्याच्या सांगण्यानुसार खाजगी रुग्णालये विमारकमेची मर्यादा पेक्षा अधिक बील आकारले जाते आणि रुग्णाची अक्षरशः लूट केली जाते काही गरीब लोकांनी तर दाग दागिने मोडून रुग्णालयाची बील भरली आहेत.खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले की शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सर्व थरातील रुग्णांना मोफत उपचार होणे नियमानुसार आवश्यक आहे तथापि जन आरोग्य योजनेचं नाव काढलं की खाजगी रुग्णालयाचे व्यवस्थापन आमचेकडे बेड उपलब्ध नाहीत असे स्पष्ट सांगतात#यांच्यावर चाप लावण्याचा प्रयत्न शासन स्तरावर होताना दिसतो परंतु त्याला म्हणावे तसे यश अजून आलेलं दिसत नाही.विजय पवार,जिल्हा माहिती अधिकारी(निवृत्त) नाशिकमोबाईल नंबर ९८२२११४९५५