सियावर रामचंद्र की जय म्हणत आज प्रधान सेवकांनी जगभरातील रामभक्तांना हाक दिली.
सियावर रामचंद्र की जय म्हणत आज प्रधान सेवकांनी जगभरातील रामभक्तांना हाक दिली..भूमीपूजनाचा सोहळा मंगलमय आणि प्राप्त परिस्थितीत आखीव रेखीव करण्यात कोणतंही न्यून आणि कसर ठेवली गेली नव्हती..चोख आयोजन,पुरेपूर दक्षतेने केलेले धार्मिक विधी..संत मंडळीत महाराष्ट्रातील आचार्य गोविंददेव गिरी महाराज यांचे नेतृत्व उठून दिसत होते पण दुसऱ्या बाजूला शिवसेनेला कोठेच स्थान नव्हते.ज्या वेगाने आणि आवेगाने कै.बाळासाहेब ठाकरे यांनी राम जन्मभूमी आंदोलनात शिवसेनेचा शिरकाव केला होता आणि मला अभिमान आहे त्या कार सेवकांचा, असं म्हणत त्यात सहभागी शिवसैनिक आणि हिंदू युवक,युवतींचा,तमाम सहभागी मंडळींचे जाहीर कौतुक करीत हिन्दुत्व आणि भगव्या राजकारणाची एक न तोडता येणारे अभेद्य असं अदृश्य शक्तीकवच शिवसेनेच्या मागे उभे केले होते ते आज अयोध्येत सर्व शक्तीलोकात विलीन झाले.महाराष्ट्रात अपुऱ्या शक्तीनिशी निर्माण केलेल्या मुत्सद्देगिरी,संजयगिरीच्या जोरावर सत्ता संपादन करण्याचा मोह महत्वाचा की आजच्या राम जन्म भूमीपूजन सोहळ्यातील अविभाज्य सहभाग(जो ऐतिहासिक आहे,येणाऱ्या काळात जागतिक शक्ती स्थळ बनेल,तेथे शिवसेनेच अस्तित्व नसणार आहे..) याचा विचार केला तर विवेकी लोक आजच्या क्षणाला स्वीकारतील.तस पाहिले तर आजच्या कार्यक्रमात ज्यांचा अतिशय आदराने उल्लेख हवा हवा होता,त्या नेत्याचे विस्मरण झाले ज्यात कै अटलजी,कै.बाळासाहेब ठाकरे,कै.प्रमोद महाजन,कै.गोपीनाथ मुंडे,कै.सुषमा स्वराज हे शीर्ष नेते.तसेच विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही. लालकृष्ण अडवाणी यांचा नामोल्लेख केला तो सर संघ चालक मोहनराव भागवत यांनी.प्रधानमंत्री आज वेगळ्याच शक्तीशाली मूड मध्ये होते,त्यांच्या बोलण्यात भावनाशीलता आणि दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून आली.जागतिक स्तरावर अयोध्येच नाव होण्यासाठी जे ही प्रयत्न करावे लागतील,ते करणारच,हा दुर्दम्य आशावाद.सर संघचालक डॉ.मोहनराव भागवत यांच मार्गदर्शन अत्यन्त कणखर आणि ठोस होते.त्यांनी मंदिर उभारणीसाठी आवश्यक पुढील वाटचाल स्पष्ट केली.तत्कालीन सर संघचालक बाळासाहेब देवरस यांची एक आठवण सांगताना भावुक झाले.म्हणाले,राम मंदिर उभारणे दीर्घ सूचनेच काम आहे,मनासारखं व्हायला वाट पाहावी लागेल,तीसेक वर्ष लागतील.त्यांचे बोल खरे ठरले..सर्वाधिक प्रभावी देहबोली आणि कणखर वागण्यातून उठून दिसले ते उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ.संपूर्ण कार्यक्रम व त्याची पूर्व तयारी,आयोजन यावर त्यांची पकड होती हे दिसून आले.उत्तर प्रदेशच्या भौतिक विकासात नियोजित राममंदिर अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावेल, असं सांगताना त्यांनी उत्तर प्रदेश चा समतोल विकास आणि आध्यात्मिक,धार्मिक उन्नती,न्याय पालिका,संविधानासात्मक मार्गातून केलेली वाटचाल याकडे लक्ष वेधले.भूमी पूजनाचा मुहूर्त होता दुपारी १२ वाजून ४४ मिनिटे आणि आठ सेकंद..वैदिक मंत्रोच्चार व त्याला सुरेख निवेदनांची जोड देत कोट्यवधी लोकांना खिळवून ठेवण्याचे काम नेटके घडले.पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी अतिशय भाऊकतेने व तन्मयतेने सर्व विधी यथायोग्य केले.नऊ शिलांचे पूजन आणि वास्तू प्रतिमा पूजन झाल्या नंतर सियावर रामचंद्र की जय च्या जयघोषात राम मंदिराचे यथासांग भूमिपूजन झाल्याचा अतीव आनंद थेट प्रक्षेपण पाहण्याऱ्या कोट्यवधी लोकांना होता तसा तो आनंद उपस्थित मंडळींना ही होता.ज्या मोठ्या मुद्द्यावर निवडणुकीत मते मागितली जायची तो मुद्दा असता पूर्णत्वाकडे निघाला. -सुनील जोशी